महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज , महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे खर्या अर्थाने महात्मा असलेले ज्यांच्या कार्यामुळे , त्यागामुळे आज बहुजन बोलता झाला आहे असे ज्योतिबा फुले , वंचीताना खर्या अर्थाने प्रत्यक्ष आरक्षण देवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा ज्यांनी प्रथम प्रयत्न केले ते रयतेचे राजे श्री शाहू छत्रपती महाराज , तसेच खर्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले व शाहू महाराज यांच्या अत्यंत कडवा संघर्ष करत , दुखी लोकांचा कैवार घेत ज्यांनी २० २० / बावीस बावीस तास ज्ञान साधनेत घालवले व भारताला एक सशक्त अशी राज्य घटना मिळवून दिली , आमच्या सारख्यांचे आयुष्य बदलून टाकले , आमच्या जीवनात अमुलाग्र बदल्ज्यांच्यामुळे घडून आला ते डॉ बाबासाहेब आंबेडकर . . . . या सर्व महान आदरणीय विभूतीना अभिवादन करतो . . .
वडार समाजाचे आद्य दैवत असलेले , श्री बजरंग बळी अर्थात मारुती , हनुमंत , , , ज्यांची भक्ती , शक्ती व युक्ती हे मुख्य गुण आहेत . . . ज्याची लीनता , नम्रता हि एक आदर्श समजली जाते , ज्यांची शक्ती हि पहाडालाही उचलण्याची क्षमता राखते , ज्यांची युक्ती रावणाच्या लंकेलाही बेचिराख करून टाकते . . अशा या अनादी वडार समाजाच्या देवतेला आम्ही नमस्कार करतो . . . बजरंग बळीचा व आमच्या वडार समाजाचा संबंध हा लंकेच्या अंतिम स्वारी साठी तयार करण्यात आलेल्या सेतू निर्मिती च्या अगोदर पासून असावा . . . आमच्या वडार समाजाचा मूळ व्यवसाय बंधारे बांधणे , पूल बंधने , किल्ले , राजवाडे बांधणे हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे , आमच्या वडार समाजाची श्री बजरंग बळी बरोबर असलेली नैसर्गिक attachment व सेतू निर्मिती याचा वडार समाजाशी नक्कीच निकटचा संबंध असावा . . असो . .
संत साहित्याचे गाढे अभ्यासक , श्री सदानंद मोरे सर , जे कि या वर्षीच्या साहित्य संमेलनाचे मुख्य व प्रबळ दावेदार आहेत , ते संमेलनाचे अध्यक्ष होणार हि फक्त औपचारिकता बाकी आहे . . त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा व आगाऊ अभिनंदन ! ! ! . .
ज्यांच्या पहिलेच भाषण ऐकून आम्ही दिवानेच झालो , लाह्या जशा तडातडा उडतात , तसे हे बोलायला लागले कि शब्द तडातडा उडतात व शब्दांच्या चौकार / षटकारांची निव्वळ आषातबाजी असे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ साहित्य समीक्षक , चिकित्सक डॉ श्रीपाल सबनीस सर . . . .
दैनिक सकाळचे माजी संपादक असलेले , एक व्यासंगी श्री अरुण खोले सर , दैनिक सकाळ मध्ये रविवार सप्तरंग पुरवणीचे साहित्य पुरवणी प्रमुख श्री विनायक लिमये . .
वडार समाजाचे एक यशस्वी उद्योजक असलेले श्री राजु अण्णा जाधव साहेब जे आमच्या बरोबर वडार समाज चारीटेबल या संस्थेच्या स्थापणे पासून आहेत . .
कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी विशेष योगदान असलेले श्री संजय सोनवणी सर , चपराक मासिक / साप्ताहिकाचे श्री घनशाम पाटील व अन्य उपस्थित मान्यवर . . . पत्रकार , साहित्य क्षेत्रातील जेष्ठ व अधिकारी व्यक्ती असलेल्या सर्वांचे. .
तसेच वडार समाज दिवाळी अंक २०१४ या अंकाच्या प्रकाशनासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या वडार समाज बांधवानो मी आपले स्वागत करतो , आपणास मी अभिवादन करतो . . .
खरे तर हा प्रकाशन सोहळा आपण काल १२ तारखेला बालगंधर्व येथे जून महिन्यातच बुकिंग करून ठरवला होता , परंतु निवडणुकीचे वातावरण असल्याकारणाने आपण तो रहित केला होता . . .
प्रकाशन सोहळाच रद्द केला होता , फक्त आमचे वैचारिक दैवत असलेले श्री सोनवणी सर , नरके सर यांना दिवाळी अंक देवून व त्याचे फेसबुक वर फोटो टाकून आम्ही अत्यंत साध्या पद्धतीने करणार होतो . .. परंतु . . .
परंतु . . हा अतिशय छान मुखपृष्ठ लाभलेला आपल्या पहिलाच अंक बनवण्यात ज्यांचे मोलाचे योगदान आहे ते श्री घनशाम पाटील यांनी अक्षरशः आम्हाला सांगितले कि तुमचा हा प्रथम अंक झाला आहे व तो खूप चांगला झाला आहे त्यामुळे तुम्ही छोटासा का होईना परंतु कार्यक्रम घ्या . . ते गरजेचे आहे . . .
मी त्यांना सांगितले कि मी सोनवणी सर यांच्याबरोबर बोलून सर्व ठरवतो . . .
सोनवणी सरांनी त्यावर कडीच केली . . .त्यांनी लगेच इथे पत्रकार भवन ला फोन करून उपलब्ध दिवस पाहून आज चे बिकिंग तत्काळ करून टाकले . . पुढे फोनाफोनी सुरु झाली . . डॉ श्रीपाल सबनीस सर हे आमचे हक्काचे होते , त्यांना आम्ही गृहीत धरूनच चाललो होतो , श्री हरी नरके सर पुण्यात असले तर . . .त्यानाही गृहीत धरूनच चाललो होतो . . .पुढे श्री मोरे सरांना फोन लावण्यात आला , त्यांचा होकार घेतला , श्री अरुण खोरे सर हे सोनवणी सरांच्या नित्य संपर्कातील आहेत त्यामुळे त्यांचाही होकार लगेच मिळाला ,
मला सोनवणी सरांनी विचारले विनायक लिमये यांना ओळखता का ? . मी म्हणालो . . त्यांचे लेखन मी खूप पूर्वी पासून वाचत आलेलो आहे . . . सोनवणी सरांनी त्यांना हि फोन करून त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले . .
त्यामुळे , हा कार्यक्रम होण्यात श्री संजय सोनवणी सर व श्री घनशाम पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे त्यामुळे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो व त्यांचे मनपूर्वक आभार मानतो . . .
. . . . आमच्या वडार समाजात या अगोदर असा दिवाळी अंक कधीच निघाला नव्हता , निघाला नसावा . . आम्हाला असे वाटले कि . . . आमच्या वडार समाजात खूप प्रतिभावान व्यक्ती आहेत , परंतु स्वताचे व्यासपीठ / विचारपीठ नसल्या कारणाने आम्हाला अभिव्यक्त होण्यासाठी कुठलाही मार्ग दूर दूर पर्यंत दिसत नव्हता . . .वैचारिक , सम - विचारी लोक एकत्र आले पाहिजे असे राहून राहून वाटत होते . . वडार समाजाची , वडार समाजात सुधारणा घडवायचे असेल तर शिक्षणासोबत वैचारिक बैठक खूप महत्वाची असते हे मनाला माहित होते परंतु समोर कुठलाही मार्ग दिसत नव्हता . ..
दिवाळी अंक हे outdated माध्यम आहे असे माझे हि मत होते कारण ८० / ९० च्या दशकात दिवाळी अंकाची ज्या आतुरतेने वाट पाहत होतो ते गेल्या १० / २० वर्षात माझ्या बाबत झाले नव्हते . . .
परंतु गरज हि शोधाची जननी आहे असे काहीतरी म्हटले जाते , त्यामुळे दिवाळी अंक काढायचे ठरले व या वडार समाज दिवाळी अंकात आपण प्रतिभावान अशा जवळ जवळ २० लेखकांचे लेख समाविष्ठ केले आहेत . . . ( सोनवणी सर व नरके सर वगळता . . .ते आमचे वडार समाजाचे हितचिंतक आहेत . . )
आज या दिवाळी अंकासाठी वडार समाजाच्या महिलांनी लेखन केलेले आहे , ज्यात यशस्वी उद्योजिका / व्यावसायिक आहेत , एक शिक्षिका आहेत तर एक उत्तम गृहिणी असलेली महिलाही लिहिती झालेली आहे . . . हि या दिवाळी अंकाची एक उपलब्धी आहे कि या माध्यमातून महिलाही लिहित्या झालेल्या आहेत , स्वतःला अभिव्यक्त करू लागल्या आहेत . .
आमचा एक विध्यार्थी आहे हणमंत कुऱ्हाडे , २० / २२ वर्षाचा हा तरणाबांड मुलाच्या दोन कथा आपण यात टाकलेल्या आहेत . . त्या विनोदी कथा आहेत . . ज्या कुठल्याही दिवाळी अंकातील कथेच्या तोडीस तोड आहेत याची मला पूर्ण खात्री आहे . . कारण ज्यांनी ती वाचली आहे , त्यातील प्रसंग आठवून ते आतल्या आत खुदुखुदू हसत असतील . . . अशी भन्नाट जमून आलेली ती कथा केवळ वडार समाजात असलेल्या प्रतिभे मुलेच झाले आहे . . .
आमचे एक जेष्ठ समाज बांधव आहेत , जे एक जेष्ठ लेखक आहेत , ७७ वर्षाचे त्यांचे आयुर्मान आहे . . त्यांचे २/३ पुस्तके प्रकाशित झालेले आहेत . . त्यातील एकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कर हि प्राप्त झालेला आहे . . . त्यांची पाटी - पेन्सिल हि कथा खूप प्रबोधनात्मक असून ती प्रत्येक वडार कुटुंबात वाचली जावी एवढे त्या कथेत दम आहे . .
मराठी साहित्य निर्मितीत अथवा साहित्यिक योगदानात वडार समाज प्रतिभेत कमी नाही याची प्रचीती वरील लघु कथा वाचल्यानंतर लेच लक्षात येईल . .
अजून हि बऱ्याच वडार समाज बांधवांचे लेख यात आहेत . . .ते विद्वान आहेत , अभ्यासू आहेत , संशोधक वृत्तीचे आहेत . .
वडार समाजाला . . . अन्य समाजाने भूतकाळात गावाच्या बाहेर ठेवून खरे तर खूप अन्याय केला होता , शेतीचा कुठलाही आधार नसलेला हा समाज खाण्यासाठी हि हवालदिल असायचा , त्याच्या अंगावर नीट कपडे हि नसायचे , . . भर उन्हात त्वचा करपून जाई पर्यंत कष्ट . . .अशा अवस्थेत या समाजाला अन्य समाजाने कुचेष्टेचा विषय भूतकाळात बनवला होता , . . व्यसनाला लावून या वडार समाजाला मानसिक दृष्ट्या अक्षरशः खच्ची करण्यात आलेले होते . . . परंतु चांगले जीवन जगण्याची संधी कधी मिळाली नव्हती . . अर्थात ती संधी मिळाली फुले शाहू आंबेडकर यांच्या त्याग पूर्ण संघर्षातून . . .
आज हि काही ठिकाणी , गाव खेड्या मध्ये वडार समाजातील कुटुंबाना कुचेष्टेने पहिले जाते , संबोधले जाते , . . काळ्या वड्या , . . वडाऱ्या चा पोरगा अशा अपरोधिक / उपरोधिक शब्दात हेटाळणी केली जाते . . जी कि मनाला दुखावून जाते , ,
परंतु काहींच्या पूर्व ग्रह व दुषित विचारांना फाटा देतील असे आमच्या वडार समाजात हि चांगल्या व्यक्ती झालेल्या आहेत . संत परंपरा आमच्या वडार समाजाला सुद्धा आहे . . मी सुद्धा माळकरी आहे . . .. श्री मोरे सर लगेच समजून घेतील . . .सर मी आनंद संप्रदायाचा अनुग्रह प्राप्त झालेला सच्चा वारकरी आहे . . मी अध्यात्मिक वृत्ती असलेला एक वडार सामाजाचा व्यक्ती आहे . . .
जिथे वडार समजा हा फक्त व्यसनी , अंधश्रधाळू अशी वडार समाजाची प्रतिमा निर्माण करण्यात आलेली आहे त्याच वडार समाजात सोलापूर येथे एक संतत्व लाभलेली व्यक्ती होवून गेलेली आहे . . ते संतत्व लाभलेली व्यक्ती म्हणजे वैकुंठवासी हरी भक्त पारायण श्री लक्षण महाराज होत . . . त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शिक्षण संस्था स्थापन केल्या , मंदिरे बांधली , अंधश्रद्धा निर्मुलनासाठी मोठे काम केले . . . .त्यांचे हे कार्य सर्व वडार समाज बांधावा पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेले नाही . . .ते पोहोचणे खूप गरजेचे आहे . . .म्हणून आमचा हा दिवाळी अंकाचा प्रयत्न आहे . . .
उपलब्ध माध्यमातून आम्ही वडार समाजाची माहिती सर्व समाज बांधावा पर्यंत आम्ही पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहोत . .
वडार समाजावर गुन्हेगार हा शिक्का होता . . आज हि काही ठिकाणी तो आहे . . . काही प्रमाणात तो खरा हि आहे . . .कबुल . . . कबूल आहे मला तरी . . .
परंतु मला असा एक समाज सांगा . . ज्यात गुन्हेगार झालेले नाहीत ?. . . ज्यात बलत्कारी झालेले नाहीत ?, . . ज्यात अत्याचारी झालेले नाहीत ?. . शोषण करणारे झालेले नाहीत . ?. . पिळवणूक करणारे झालेले नाहीत . . ?
मराठा समाजात असे अत्याचारी , बलात्कारी माणसे झाली नाहीत , ब्राह्मण समाजात असे अत्याचारी लोक झाले नाहीत ? अन्य समाजात असे गुन्हेगार प्रवृतीचे लोक नाहीत ?
मी नावा सहित दाखवून देवू शकतो . . .. परंतु इथे बदनाम एकालाच व्हायचे असते . . . ते अगोदरच ठरलेले असते . . तो शिक्का अगोदरच कुणाच्या तरी मात्थ्यावर लावलेला आसतो . . .
गरज आहे आप आपले माथे जागेवर ठेवायची . . . कलुषित विचार डोक्यातून घालवायची . . .गुन्हेगार म्हणून कुणी जन्माला येत असतो का ? . . .येत असतो कुणी गुन्हेगार म्हणून जन्माला ? . . .नसेल तर जातीला कशाला बदनाम करता ?
जे गुन्हेगार असतील , . . त्यांना फासावर लटकवा . अथवा त्यांची खांडोळी खांडोळी करून टाका . . .परंतु देवा हो त्याचा जातीशी संबंध लावू नका . . .
मला माफ करा . . .मी जातीचे जरी बोलत असलो तरी मी जातीयवादी बिलकुल नाही . . . कट्टर तर अजिबातच नाही . . . मी एक संवेदनशील व्यक्ती आहे . . . मला माणसा - माणसातिलच नाही तर पशु - पक्षी , वृक्ष , पाने - फुले यांच्याशीही एक वैश्विक दृष्टीकोनातून पाहण्याची शिकवण भेटलेली आहे . . . .हे विश्वची माझे घर या संतांच्या शिकवणुकीवर माझा विश्वास आहे . . .तोच विचार मी हळूहळू समाजात सोडू पाहत आहे . .
आम्ही काही निवडक फेसबुक वरील समविचारी समाज बांधवानी मिळून एक संस्था स्थापन केलेली आहे . . .वडार समाज चारीटेबल ट्रस्ट या नावाने . . .त्या माध्यमातून आम्ही आमचे उद्योगधंदे सांबाळून सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत . . .
संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षी प्रथम एक १२ पानी कॅलेंडर प्रकाशित केले होते व त्यात समाजाविषयीची अत्यंत महत्वपूर्ण माहिती प्रथमच प्रकाशित केली होती ,
८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही वडार समाजात प्रथमच एक महिला मेळावा मुंबई येथे घेतला होता व तो यशस्वी करून दाखवला होता कारण वडार समाजात केवळ महिलांना एकत्र आणणे हे वडार समाजाच्या इतिहासात कुणालाच जमले नव्हते . . .
२० मे २०१४ रोजी आपल्या संस्थेच्या प्रथम वर्धापन दिना निमित्त आपण बालगंधर्व रंगमंदिर येथे खूप चांगला कार्यक्रम घेऊन . .महाराष्ट्रातील वडार समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान घडवून आणला होता . . .वडार समाज भूषण पुरस्कार देवून महाराष्ट्रातील वडार समाज बांधवाचा गौरव करणारे सुद्धा आपली संस्थाच प्रथम आहे . . .
२० मे च्या कार्यक्रमात आम्ही दिवाळी अंक काढणार असे घोषित केले होते . . त्यासाठी उचललेले पावूल आम्ही दमदार पणे ठेवलेले आहे ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून येत असेल . . . दिवाळी अंक कसा झालाय त्यावरून कळून येत असेल . .
वडार समाज चारीटेबल ट्रस्ट या आपल्या संस्थेला भविष्यात वडार समाजातील गोर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम करायचे आहे , . . पालकांचा आधार नसलेल्या विध्यार्थ्यांना मदतीचा हात द्यायचा आहे . . तरुण मुलांना उच्च शिक्षणासाठी , स्पर्धा परीक्षा साठी मदत करायची आहे , जमल्यास एखादी शिक्षण संस्थेची उभारणी करायची आहे ,. . .. वैचारिक मंथनातून वडार समाजातील अंधाश्रधा व व्यसनाधीनता कमी करायची आहे . . .
सोनवणी सर , मी तुम्हाला माझी खंत बोलून दाखवत होतो . . .खरंच मला खंत आहे सर , . . मी माझ्या २० मे च्या प्रास्ताविक भाषणात बोललो होतो कि . . .माझा संदर्भ लक्षात येतो का पहा सर . . . मध्यमवर्गीय समाज , ज्यांना आपण एकत्रित केले होते . . त्यांचा मला समाजासाठी उपयोग करून घ्यायचा आहे . .. परंतु मला खेदाने संगुशी वाटतंय सर . . त्या कार्यक्रमातील फक्त एक जन श्री सचिन पवार हेच केवळ संस्थेशी जुडले गेलेले आहेत . . . त्यानंतर कुणीही संस्थेच्या कुठल्या व्यक्तीशी अथवा अन्य कुणाशी कसलाही संपर्क ठेवलेला नाही . . .
मी हि माझी खंत व्यक्त केलेली आहे , हो . . मी थोडा निराश झालेलो आहे , , त्या निराशेमुळे हतबल हि झालेलो आहे . . .तुम्ही माझी धावपळ , पळापळ पाहत आहात . . .. दिवसरात्र या दिवाळी अंकाच्या निर्मिती मागे गेलेला आहे , तहान हि विसरलो होतो व वेळेत जेवत हि नव्हतो . . परंतु जेंव्हा कुणी आपल्या निष्टेवर प्रश्न चिन्ह निर्माण करतो तेंव्हा खूप त्रास होतो . . .जेंव्हा एखादा म्हणतो मी समाजाच्या नावावर धंदा करतोय , पैसे उकळतोय. . तेंव्हा खूप नैराश्य येते . .
असो . . असे असले तरी मी खूप नशीबवान आहे , मला खूप लोकांचे प्रेम मिळालेले आहे , त्यामुळे त्या प्रेमाच्या जोरावर माझे या पुढील पावूल हि जोमदार व जोरदारच असेल . .
दिवाळी अंकाच्या निमित्ताने आपण सर्व आलात , मोठ्या विचारवंताचे विचार ऐकण्याचे भाग्य आपणास मिळणार आहे , . . ते आपण शांत चिताने ऐकावेत अशी मी आपणास विनंती करतो व माझे प्रास्ताविक संपवतो . . .
जय बजरंग . . . . जय वडार . . .
जय हिंद . . .जय महाराष्ट्र