Tuesday, November 4, 2014




वडार समाज दिवाळी अंक २०१४ च्या प्रकाशन सोहळ्यातील माझे प्रास्ताविकाचे भाषण :

महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज , महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे खर्या अर्थाने महात्मा असलेले ज्यांच्या कार्यामुळे , त्यागामुळे आज बहुजन बोलता झाला आहे असे ज्योतिबा फुले , वंचीताना खर्या अर्थाने प्रत्यक्ष आरक्षण देवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा ज्यांनी प्रथम प्रयत्न केले ते रयतेचे राजे श्री शाहू छत्रपती महाराज , तसेच खर्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले व शाहू महाराज यांच्या अत्यंत कडवा संघर्ष करत , दुखी लोकांचा कैवार घेत ज्यांनी २० २० / बावीस बावीस तास ज्ञान साधनेत घालवले व भारताला एक सशक्त अशी राज्य घटना मिळवून दिली , आमच्या सारख्यांचे आयुष्य बदलून टाकले , आमच्या जीवनात अमुलाग्र बदल्ज्यांच्यामुळे घडून आला ते डॉ बाबासाहेब आंबेडकर . . . . या सर्व महान आदरणीय विभूतीना अभिवादन करतो . . .

वडार समाजाचे आद्य दैवत असलेले , श्री बजरंग बळी अर्थात मारुती , हनुमंत , , , ज्यांची भक्ती , शक्ती व युक्ती हे मुख्य गुण आहेत . . . ज्याची लीनता , नम्रता हि एक आदर्श समजली जाते , ज्यांची शक्ती हि पहाडालाही उचलण्याची क्षमता राखते , ज्यांची युक्ती रावणाच्या लंकेलाही बेचिराख करून टाकते . . अशा या अनादी वडार समाजाच्या देवतेला आम्ही नमस्कार करतो . . . बजरंग बळीचा व आमच्या वडार समाजाचा संबंध हा लंकेच्या अंतिम स्वारी साठी तयार करण्यात आलेल्या सेतू निर्मिती च्या अगोदर पासून असावा . . . आमच्या वडार समाजाचा मूळ व्यवसाय बंधारे बांधणे , पूल बंधने , किल्ले , राजवाडे बांधणे हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे , आमच्या वडार समाजाची श्री बजरंग बळी बरोबर असलेली नैसर्गिक attachment व सेतू निर्मिती याचा वडार समाजाशी नक्कीच निकटचा संबंध असावा . . असो . .

संत साहित्याचे गाढे अभ्यासक , श्री सदानंद मोरे सर , जे कि या वर्षीच्या साहित्य संमेलनाचे मुख्य व प्रबळ दावेदार आहेत , ते संमेलनाचे अध्यक्ष होणार हि फक्त औपचारिकता बाकी आहे . . त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा व आगाऊ अभिनंदन ! ! ! . .

ज्यांच्या पहिलेच भाषण ऐकून आम्ही दिवानेच झालो , लाह्या जशा तडातडा उडतात , तसे हे बोलायला लागले कि शब्द तडातडा उडतात व शब्दांच्या चौकार / षटकारांची निव्वळ आषातबाजी असे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ साहित्य समीक्षक , चिकित्सक डॉ श्रीपाल सबनीस सर . . . .

दैनिक सकाळचे माजी संपादक असलेले , एक व्यासंगी श्री अरुण खोले सर , दैनिक सकाळ मध्ये रविवार सप्तरंग पुरवणीचे साहित्य पुरवणी प्रमुख श्री विनायक लिमये . .

वडार समाजाचे एक यशस्वी उद्योजक असलेले श्री राजु अण्णा जाधव साहेब  जे आमच्या बरोबर वडार समाज चारीटेबल या संस्थेच्या स्थापणे पासून आहेत . .

कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी विशेष योगदान असलेले श्री संजय सोनवणी सर , चपराक मासिक / साप्ताहिकाचे श्री घनशाम पाटील व अन्य उपस्थित मान्यवर . . . पत्रकार , साहित्य क्षेत्रातील जेष्ठ व अधिकारी व्यक्ती असलेल्या सर्वांचे. .

तसेच वडार समाज दिवाळी अंक २०१४ या अंकाच्या प्रकाशनासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या वडार समाज बांधवानो मी आपले स्वागत करतो , आपणास मी अभिवादन करतो . . .

खरे तर हा प्रकाशन सोहळा आपण काल १२ तारखेला बालगंधर्व येथे जून महिन्यातच बुकिंग करून ठरवला होता , परंतु निवडणुकीचे वातावरण असल्याकारणाने आपण तो रहित केला होता . . .
प्रकाशन सोहळाच रद्द केला होता , फक्त आमचे वैचारिक दैवत असलेले श्री सोनवणी सर , नरके सर यांना दिवाळी अंक देवून व त्याचे फेसबुक वर फोटो टाकून आम्ही अत्यंत साध्या पद्धतीने करणार होतो . .. परंतु . . .

परंतु . . हा अतिशय छान मुखपृष्ठ लाभलेला आपल्या पहिलाच अंक बनवण्यात ज्यांचे मोलाचे योगदान आहे ते श्री घनशाम पाटील यांनी अक्षरशः आम्हाला सांगितले कि तुमचा हा प्रथम अंक झाला आहे व तो खूप चांगला झाला आहे त्यामुळे तुम्ही छोटासा का होईना परंतु कार्यक्रम घ्या . . ते गरजेचे आहे . . .

मी त्यांना सांगितले कि मी सोनवणी सर यांच्याबरोबर बोलून सर्व ठरवतो . . .

सोनवणी सरांनी त्यावर कडीच केली . . .त्यांनी लगेच इथे पत्रकार भवन ला फोन करून उपलब्ध दिवस पाहून आज चे बिकिंग तत्काळ करून टाकले . . पुढे फोनाफोनी सुरु झाली . . डॉ श्रीपाल सबनीस सर हे आमचे हक्काचे होते , त्यांना आम्ही गृहीत धरूनच चाललो होतो , श्री हरी नरके सर पुण्यात असले तर . . .त्यानाही गृहीत धरूनच चाललो होतो . . .पुढे श्री मोरे सरांना फोन लावण्यात आला , त्यांचा होकार घेतला , श्री अरुण खोरे सर हे सोनवणी सरांच्या नित्य संपर्कातील आहेत त्यामुळे त्यांचाही होकार लगेच मिळाला ,

मला सोनवणी सरांनी विचारले विनायक लिमये यांना ओळखता का ? . मी म्हणालो . . त्यांचे लेखन मी खूप पूर्वी पासून वाचत आलेलो आहे . . . सोनवणी सरांनी त्यांना हि फोन करून त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले . .

त्यामुळे , हा कार्यक्रम होण्यात श्री संजय सोनवणी सर व श्री घनशाम पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे त्यामुळे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो व त्यांचे मनपूर्वक आभार मानतो . . .

. . . . आमच्या वडार समाजात या अगोदर असा दिवाळी अंक कधीच निघाला नव्हता , निघाला नसावा . . आम्हाला असे वाटले कि . . . आमच्या वडार समाजात खूप प्रतिभावान व्यक्ती आहेत , परंतु स्वताचे व्यासपीठ / विचारपीठ नसल्या कारणाने आम्हाला अभिव्यक्त होण्यासाठी कुठलाही मार्ग दूर दूर पर्यंत दिसत नव्हता . . .वैचारिक , सम - विचारी लोक एकत्र आले पाहिजे असे राहून राहून वाटत होते . . वडार समाजाची , वडार समाजात सुधारणा घडवायचे असेल तर शिक्षणासोबत वैचारिक बैठक खूप महत्वाची असते हे मनाला माहित होते परंतु समोर कुठलाही मार्ग दिसत नव्हता . ..

दिवाळी अंक हे outdated माध्यम आहे असे माझे हि मत होते कारण ८० / ९० च्या दशकात दिवाळी अंकाची ज्या आतुरतेने वाट पाहत होतो ते गेल्या १० / २० वर्षात माझ्या बाबत झाले नव्हते . . .

परंतु गरज हि शोधाची जननी आहे असे काहीतरी म्हटले जाते , त्यामुळे दिवाळी अंक काढायचे ठरले व या वडार समाज दिवाळी अंकात आपण प्रतिभावान अशा जवळ जवळ २० लेखकांचे लेख समाविष्ठ केले आहेत . . . ( सोनवणी सर व नरके सर वगळता . . .ते आमचे वडार समाजाचे हितचिंतक आहेत . . )

आज या दिवाळी अंकासाठी वडार समाजाच्या महिलांनी लेखन केलेले आहे , ज्यात यशस्वी उद्योजिका / व्यावसायिक आहेत , एक शिक्षिका आहेत तर एक उत्तम गृहिणी असलेली महिलाही लिहिती झालेली आहे . . . हि या दिवाळी अंकाची एक उपलब्धी आहे कि या माध्यमातून महिलाही लिहित्या झालेल्या आहेत , स्वतःला अभिव्यक्त करू लागल्या आहेत . .

आमचा एक विध्यार्थी आहे हणमंत कुऱ्हाडे , २० / २२ वर्षाचा हा तरणाबांड मुलाच्या दोन कथा आपण यात टाकलेल्या आहेत . . त्या विनोदी कथा आहेत . . ज्या कुठल्याही दिवाळी अंकातील कथेच्या तोडीस तोड आहेत याची मला पूर्ण खात्री आहे . . कारण ज्यांनी ती वाचली आहे , त्यातील प्रसंग आठवून ते आतल्या आत खुदुखुदू हसत असतील . . . अशी भन्नाट जमून आलेली ती कथा केवळ वडार समाजात असलेल्या प्रतिभे मुलेच झाले आहे . . .

आमचे एक जेष्ठ समाज बांधव आहेत , जे एक जेष्ठ लेखक आहेत , ७७ वर्षाचे त्यांचे आयुर्मान आहे . . त्यांचे २/३ पुस्तके प्रकाशित झालेले आहेत . . त्यातील एकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कर हि प्राप्त झालेला आहे . . . त्यांची पाटी - पेन्सिल हि कथा खूप प्रबोधनात्मक असून ती प्रत्येक वडार कुटुंबात वाचली जावी एवढे त्या कथेत दम आहे . .

मराठी साहित्य निर्मितीत अथवा साहित्यिक योगदानात वडार समाज प्रतिभेत कमी नाही याची प्रचीती वरील लघु कथा वाचल्यानंतर लेच लक्षात येईल . .

अजून हि बऱ्याच वडार समाज बांधवांचे लेख यात आहेत . . .ते विद्वान आहेत , अभ्यासू आहेत , संशोधक वृत्तीचे आहेत . .

वडार समाजाला . . . अन्य समाजाने भूतकाळात गावाच्या बाहेर ठेवून खरे तर खूप अन्याय केला होता , शेतीचा कुठलाही आधार नसलेला हा समाज खाण्यासाठी हि हवालदिल असायचा , त्याच्या अंगावर नीट कपडे हि नसायचे , . . भर उन्हात त्वचा करपून जाई पर्यंत कष्ट . . .अशा अवस्थेत या समाजाला अन्य समाजाने कुचेष्टेचा विषय भूतकाळात बनवला होता , . . व्यसनाला लावून या वडार समाजाला मानसिक दृष्ट्या अक्षरशः खच्ची करण्यात आलेले होते . . . परंतु चांगले जीवन जगण्याची संधी कधी मिळाली नव्हती . . अर्थात ती संधी मिळाली फुले शाहू आंबेडकर यांच्या त्याग पूर्ण संघर्षातून . . .

आज हि काही ठिकाणी , गाव खेड्या मध्ये वडार समाजातील कुटुंबाना कुचेष्टेने पहिले जाते , संबोधले जाते , . . काळ्या वड्या , . . वडाऱ्या चा पोरगा अशा अपरोधिक / उपरोधिक शब्दात हेटाळणी केली जाते . . जी कि मनाला दुखावून जाते , ,

परंतु काहींच्या पूर्व ग्रह व दुषित विचारांना फाटा देतील असे आमच्या वडार समाजात हि चांगल्या व्यक्ती झालेल्या आहेत . संत परंपरा आमच्या वडार समाजाला सुद्धा आहे . . मी सुद्धा माळकरी आहे . . .. श्री मोरे सर लगेच समजून घेतील . . .सर मी आनंद संप्रदायाचा अनुग्रह प्राप्त झालेला सच्चा वारकरी आहे . . मी अध्यात्मिक वृत्ती असलेला एक वडार सामाजाचा व्यक्ती आहे . . .

जिथे वडार समजा हा फक्त व्यसनी , अंधश्रधाळू अशी वडार समाजाची प्रतिमा निर्माण करण्यात आलेली आहे त्याच वडार समाजात सोलापूर येथे एक संतत्व लाभलेली व्यक्ती होवून गेलेली आहे . . ते संतत्व लाभलेली व्यक्ती म्हणजे वैकुंठवासी हरी भक्त पारायण श्री लक्षण महाराज होत . . . त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शिक्षण संस्था स्थापन केल्या , मंदिरे बांधली , अंधश्रद्धा निर्मुलनासाठी मोठे काम केले . . . .त्यांचे हे कार्य सर्व वडार समाज बांधावा पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेले नाही . . .ते पोहोचणे खूप गरजेचे आहे . . .म्हणून आमचा हा दिवाळी अंकाचा प्रयत्न आहे . . .

उपलब्ध माध्यमातून आम्ही वडार समाजाची माहिती सर्व समाज बांधावा पर्यंत आम्ही पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहोत . .

वडार समाजावर गुन्हेगार हा शिक्का होता . . आज हि काही ठिकाणी तो आहे . . . काही प्रमाणात तो खरा हि आहे . . .कबुल . . . कबूल आहे मला तरी . . .

परंतु मला असा एक समाज सांगा . . ज्यात गुन्हेगार झालेले नाहीत ?. . . ज्यात बलत्कारी झालेले नाहीत ?, . . ज्यात अत्याचारी झालेले नाहीत ?. . शोषण करणारे झालेले नाहीत . ?. . पिळवणूक करणारे झालेले नाहीत . . ?

मराठा समाजात असे अत्याचारी , बलात्कारी माणसे झाली नाहीत , ब्राह्मण समाजात असे अत्याचारी लोक झाले नाहीत ? अन्य समाजात असे गुन्हेगार प्रवृतीचे लोक नाहीत ?

मी नावा सहित दाखवून देवू शकतो . . .. परंतु इथे बदनाम एकालाच व्हायचे असते . . . ते अगोदरच ठरलेले असते . . तो शिक्का अगोदरच कुणाच्या तरी मात्थ्यावर लावलेला आसतो . . .

गरज आहे आप आपले माथे जागेवर ठेवायची . . . कलुषित विचार डोक्यातून घालवायची . . .गुन्हेगार म्हणून कुणी जन्माला येत असतो का ? . . .येत असतो कुणी गुन्हेगार म्हणून जन्माला ? . . .नसेल तर जातीला कशाला बदनाम करता ?

जे गुन्हेगार असतील , . . त्यांना फासावर लटकवा . अथवा त्यांची खांडोळी खांडोळी करून टाका . . .परंतु देवा हो त्याचा जातीशी संबंध लावू नका . . .

मला माफ करा . . .मी जातीचे जरी बोलत असलो तरी मी जातीयवादी बिलकुल नाही . . . कट्टर तर अजिबातच नाही . . . मी एक संवेदनशील व्यक्ती आहे . . . मला माणसा - माणसातिलच नाही तर पशु - पक्षी , वृक्ष , पाने - फुले यांच्याशीही एक वैश्विक दृष्टीकोनातून पाहण्याची शिकवण भेटलेली आहे . . . .हे विश्वची माझे घर या संतांच्या शिकवणुकीवर माझा विश्वास आहे . . .तोच विचार मी हळूहळू समाजात सोडू पाहत आहे . .

आम्ही काही निवडक फेसबुक वरील समविचारी समाज बांधवानी मिळून एक संस्था स्थापन केलेली आहे . . .वडार समाज चारीटेबल ट्रस्ट या नावाने . . .त्या माध्यमातून आम्ही आमचे उद्योगधंदे सांबाळून सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत . . .

संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षी प्रथम एक १२ पानी कॅलेंडर प्रकाशित केले होते व त्यात समाजाविषयीची अत्यंत महत्वपूर्ण माहिती प्रथमच प्रकाशित केली होती ,

८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही वडार समाजात प्रथमच एक महिला मेळावा मुंबई येथे घेतला होता व तो यशस्वी करून दाखवला होता कारण वडार समाजात केवळ महिलांना एकत्र आणणे हे वडार समाजाच्या इतिहासात कुणालाच जमले नव्हते . . .

२० मे २०१४ रोजी आपल्या संस्थेच्या प्रथम वर्धापन दिना निमित्त आपण बालगंधर्व रंगमंदिर येथे खूप चांगला कार्यक्रम घेऊन . .महाराष्ट्रातील वडार समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान घडवून आणला होता . . .वडार समाज भूषण पुरस्कार देवून महाराष्ट्रातील वडार समाज बांधवाचा गौरव करणारे सुद्धा आपली संस्थाच प्रथम आहे . . .

२० मे च्या कार्यक्रमात आम्ही दिवाळी अंक काढणार असे घोषित केले होते . . त्यासाठी उचललेले पावूल आम्ही दमदार पणे ठेवलेले आहे ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून येत असेल . . . दिवाळी अंक कसा झालाय त्यावरून कळून येत असेल . .

वडार समाज चारीटेबल ट्रस्ट या आपल्या संस्थेला भविष्यात वडार समाजातील गोर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम करायचे आहे , . . पालकांचा आधार नसलेल्या विध्यार्थ्यांना मदतीचा हात द्यायचा आहे . . तरुण मुलांना उच्च शिक्षणासाठी , स्पर्धा परीक्षा साठी मदत करायची आहे , जमल्यास एखादी शिक्षण संस्थेची उभारणी करायची आहे ,. . .. वैचारिक मंथनातून वडार समाजातील अंधाश्रधा व व्यसनाधीनता कमी करायची आहे . . .

सोनवणी सर , मी तुम्हाला माझी खंत बोलून दाखवत होतो . . .खरंच मला खंत आहे सर , . . मी माझ्या २० मे च्या प्रास्ताविक भाषणात बोललो होतो कि . . .माझा संदर्भ लक्षात येतो का पहा सर . . . मध्यमवर्गीय समाज , ज्यांना आपण एकत्रित केले होते . . त्यांचा मला समाजासाठी उपयोग करून घ्यायचा आहे . .. परंतु मला खेदाने संगुशी वाटतंय सर . . त्या कार्यक्रमातील फक्त एक जन श्री सचिन पवार हेच केवळ संस्थेशी जुडले गेलेले आहेत . . . त्यानंतर कुणीही संस्थेच्या कुठल्या व्यक्तीशी अथवा अन्य कुणाशी कसलाही संपर्क ठेवलेला नाही . . .

मी हि माझी खंत व्यक्त केलेली आहे , हो . . मी थोडा निराश झालेलो आहे , , त्या निराशेमुळे हतबल हि झालेलो आहे . . .तुम्ही माझी धावपळ , पळापळ पाहत आहात . . .. दिवसरात्र या दिवाळी अंकाच्या निर्मिती मागे गेलेला आहे , तहान हि विसरलो होतो व वेळेत जेवत हि नव्हतो . . परंतु जेंव्हा कुणी आपल्या निष्टेवर प्रश्न चिन्ह निर्माण करतो तेंव्हा खूप त्रास होतो . . .जेंव्हा एखादा म्हणतो मी समाजाच्या नावावर धंदा करतोय , पैसे उकळतोय. . तेंव्हा खूप नैराश्य येते . .

असो . . असे असले तरी मी खूप नशीबवान आहे , मला खूप लोकांचे प्रेम मिळालेले आहे , त्यामुळे त्या प्रेमाच्या जोरावर माझे या पुढील पावूल हि जोमदार व जोरदारच असेल . .

दिवाळी अंकाच्या निमित्ताने आपण सर्व आलात , मोठ्या विचारवंताचे विचार ऐकण्याचे भाग्य आपणास मिळणार आहे , . . ते आपण शांत चिताने ऐकावेत अशी मी आपणास विनंती करतो व माझे प्रास्ताविक संपवतो . . .

जय बजरंग . . . . जय वडार . . .

जय हिंद . . .जय महाराष्ट्र

Tuesday, August 19, 2014

ती येते आणि बरसून जाते . . . . . .. आठवणी मागे ठेवून जाते




ती येते आणि बरसून जाते 

आठवणी मागे ठेवून जाते 


चिंब तिच्यात भिजण्यात , सरी तिच्या झेलण्यात 

मन मोहरून जाते , तन हि शहारून जाते 


ओघळ आठवणीचे , खपल्या तिच्या स्मुर्तीच्या 

रिमझिम पावसाची , भावना ना कुणा कळाव्या 


जेंव्हा नभ दाटते , थोडे अंधारून येते 

सखी माझी मला , ओल्या सरीतून भेटते 


आज हि कोंदाटले , आज हि अंधारले 

मी स्तिथप्रज्ञ होवुनी , सरी उरी खेळवल्या 


~~~~~~~~~~~~~~~~~ कुसाळकर ब्रदर्स 


१० : ३९ ~~~~~~~~ मंगळवार ~~~~~~~~ १९ / ०८ / २०१४

Thursday, July 24, 2014

वादळात हि मी स्तब्ध असा . . जसा अविचल मेरुमंदार उभा



वादळात हि मी स्तब्ध असा  

जसा अविचल मेरुमंदार उभा 


कित्येक वादळे आले , गेले 

मी तटस्थ लोहस्तंभ जसा 


आघाताने मी वज्र झालो 

प्रतिकाराने मन हे खंबीर 


भेटला त्याने दिला धडा 

जीव लावला तो घेई  वळसा 


मी मुळचा मृदू , संवेदनशीलच 

काळाने मला बनवला हिरा 


मी हि उन्मळून पडणारच 

पण 

वादळालाही पुरून उरणारा मी 

कोण जाने ती झुळूक येईल केंव्हा ? 


११ : २२ ~~~~~~~~ २४/ ०७ / २०१४ ~~~~~~ गुरुवार 

Thursday, June 26, 2014

नुसतंच वार सुटतंया . . . आभाळ आलेलं , . . . दूर वाहून नेतंया


नुसतंच वार सुटतंया  . . . 

आभाळ आलेलं , . . . 

दूर वाहून नेतंया  


नुसतीच मान वर जातीया . . . 

आभाळाकड बघून , . . 

पेरणीची तगमग वाढतिया  


देवा , कसं  रे व्हायचं  ? 

आभाळ येतया . . . 

अन तसंच  निघून जातया . . .  

२७ / ६ / २०१४ - - - - - - - -  ७ : ५१ - - - - - - शुक्रवार 

Sunday, June 22, 2014

बडा हुवा तो क्या हुवा , जैसा पेड खजूर ? . . . .. . पंथी को छाव नही , फल लागे अति दूर ।




बडा हुवा तो क्या हुवा , जैसा पेड खजूर ?

पंथी को छाव नही , फल लागे अति दूर । 

नारळ , खजूर , या सारखे काही झाडे असतात ती खूप उंच वाढतात , त्यांची फळे खूप चांगली असतात , मधुर असतात , त्यांची स्वताची अशी खास गोडी असते परंतु दुर्दैव असे असते कि ते हाताला लागतील अशा अंतरावर नसतात . 
…. अशा झाडा जवळ गेल्यानंतर व्यक्ती कितीही भुकेला , थकलेला , तहानलेला असेल तरी त्याला त्याचा थोडा थकवटा घालवण्यासाठी , त्याला ह्या झाडाखाली उन्हापासून सरंक्षण होईल अशी सावली सुद्धा मिळत नाही . उंचावर पाहिले तर गोड अशी फळे दिसत असतात परंतु अनेक प्रयत्ना नंतर ते हाताला लागत नाहीत व शेवटी अशा झाडाजवळ गेल्या नंतर पदरी निराशाच पडते . 

वरील उपमा हि अशाच वृत्तीच्या लोकासाठी वापरली गेलेली आहे , काही व्यक्तींचे खूप नाव झालेले असते , त्यांच्या भोवती प्रसिद्धीचे वलय असते परंतु अशा व्यक्तींच्या जवळ गेल्यानंतर खूप भ्रम निराशा होते , एवढी कि असल्या व्यक्ती बद्दल पुढे पुढे अन्तर च ठेवूशी वाटते …

…. कारण ती व्यक्ती आपल्यासाठी व समाजासाठी हि काहीही कामाची , उपयोगाची नसते . समाजापासून अथवा जमिनीपासून आपली नाळ तुटलेली असते व त्यांच्या वाढलेल्या अपेक्षांना समाज पुरे पडत नसतो . असो . 

या बाबतीत मला काही बालपणाच्या गोष्टी आठवतात , ज्या निसर्गाच्या सानिध्यात मी वाढलो , रानावनात , जंगलात हिंडलो , बागडलो त्यातील काही अनुभव मला ह्या बाबत आपणाशी शेयर करुशी वाटत आहेत . 

मी लहानपणी जेंव्हा डोंगरात , जंगलात , शेतात , रानावनात फिरायचो तेंव्हा अनेक गावरान मेवा व फळांचा आस्वाद घ्यायचो . रान फळामध्ये मला खूप आवडणारे फळ म्हणजे निवडुंगाचे बोडं , बोरे , चिंच आंबे इत्यादी . 

निवडुंगाच्या बोंडाची गंमत अशी होती कि ते मिळवण्यासाठी शोधण्यासाठी जंगलात खूप आत पर्यंत जावे लागत असे , निवडुंगाचे झाड जरी सापडले तरी त्यावर आलेले पिकलेले बोडं शोधणे हे अनुभवाचे काम असते . निवडुंगाच्या झाड हे खूप अडचणी मध्ये असते , त्याच्या आजू बाजूला काही सरपटणारे प्राणी असण्याची खूप शक्यता असते . त्यातून हि मार्ग काढून मधुर अशा बोंडा पर्यंत पोहोचायचे म्हणजे निवडुंगाच्या काट्यांचे ओरखडे हे ठरलेलेच . बर्याच प्रयत्नांनी असे एखादे बोंड मिळवले व ते खाण्याला सुरुवात करायची म्हटले तर ते आहे तसेच खाता येत नाही कारण त्यावर खूप काटे असतात व ते बाजूला करून आतील लाल लाल मधुर फळ चाखायची मजा काही औरच असते . हि गोष्ट इथेच संपत नाही आतल्या लाल गरामध्ये सुद्धा अति सूक्ष्म काटेरी जिभेला भयंकर टोचणारी असे काटे असतात . इथे हि अनुभव च कामी येतो . जो अनुभवी व्यक्ती , माहितगार असतो केवळ तोच ह्या निवडुंगाची फळे चाखण्यात यशस्वी होतो व मधुर फळाचा आस्वाद घेवू शकतो . 

आम्ही रानात फिरताना आम्हाला बोराची कुठली झाडे आंबट , कुठली तुरट , कुठली किड्यांनी भरलेले व कुठले मधुर , गोड , व चव टिकून राहणारी होती , हे आम्हाला खूप चांगले माहित असायचे . आम्ही एका चांगल्या पिकलेल्या बोरासाठी अनेक प्रयत्न करून ते मिळवायचोच . आणि त्याच वेळी जी आंबट , कडू व किडकी फळे असलेल्या झाडांकडे आम्ही चुकून सुद्धा पाहत नव्हतो . 

हीच गोष्ट चिंचेच्या झाडाची . ज्या चिंचेच्या झाडाला चवदार व आंबट गोड चव असेल त्याच झाडाकडे आमचे लक्ष असायचे परंतु अत्यंत आंबट , कडवट असणाऱ्या झाडावर चिंचा लगडलेल्या तर दिसत असायच्या परंतु त्या चिंचेच्या झाडाचे अंगभूत गुण सगळ्यांना माहित असल्यामुळे कुणी तिकडे फिरकत हि नसायचे . 

अगदी तशीच गोष्ट आंब्याच्या झाडांची , काही झाडांना येणारे आंबे हे बारीक असायचे परंतु त्याची चव अशी काही असायची कि कितीही उंचावर पाडाचा आंबा दिसला कि तो आमच्या हातून सुटत नव्हता . परंतु काही आंब्याची झाडे नुसतेच मोठाले परंतु चवीला आंबट तर काहींच्या नुसत्याच कोया मोठ्या , आकाराला आंबा मोठा परंतु रसाला काहीच नसायचा , काही आंब्यांच्या झाडाला येणारे आंबे हे खूप केसाळ तंतुमय त्यामुळे आम्ही त्या झाडाकडे लक्षच देत नसायचो . 

. . . . . . मला आज असाच एक समाजाचा मोठे नाव असलेला माणूस भेटला परंतु त्यांचे समाजा बद्दलचे विचार ऐकून मी खूप विचारात पडलो .एवढे नाव कमावलेला माणूस आहे , ज्याचे नाव समाज खूप आदराने घेत आहे परंतु त्याचे समाजा बद्दलचे विचार ऐकून आमचे मन कडवट झाले . 

नारळ व खजूर हि फळे तशी आरोग्य व शरीराच्या पोषकतेच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहेत , त्याची फळे हि तंत्राने मिळवता येतात , असली झाडे हे अहंकाराने ताडा-माडा सारखी उंचच उंच वाढलेली असली तरी ती फळे त्यांच्या उपयोगतेते मुळे आपण अनेक प्रयत्न करून मिळवू शकतो …परन्तु ?? ? ? 

……. परंतु तुरट , कडवट ,आंबट , किडक्या फळाप्रमाणे समाजातील काही व्यक्तींचे आपण आपला म्हणून खूप गुणगान गातो परंतु त्यांचा समाजाला कितीसा लाभ भेटतो हे पाहिले कि प्रश्न चिन्हच उभे राहते . 

एक मराठी म्हण आहे व एका जुन्या मराठी चित्रपटामध्ये एक डायलॉग होता . . 

" सर्जा , तुझा काहीहि उपयोग नाही , तू खायला काळ आणि भुईला भार आहेस " 

समाजासाठी हि अशा काही भार असलेल्यांचा समाजाने जास्त विचार करू नये व काही कडू / आंबट झाडांकडे जसे आपण दुर्लक्ष करतो तसे यांना जास्त किमत न देता चांगल्या लोकांच्या शोधात रहावे . 

आपल्या विचाराने , वागण्याने गोडवा निर्माण करणाऱ्या दुर्मिळ व्यक्तींना समाजाने डोक्यावर घ्यावे . 

Saturday, June 21, 2014

कितने सहज नैनों से ओझल हो गया वो चेहरा .. . ..



कितने सहज नैनों से ओझल हो गया वो चेहरा 

कितने सहज उस चेहरेने भुला दिया ये चेहरा 

कितने सहज याद आता है वो चेहरा 

उतनेही सहजतासे रुला देता है वो चेहरा । 

९ : २० - - - - - -  २२ / ०६ / २०१४ - - - -  रविवार 

Friday, June 20, 2014

क्षण क्षणा हा ची करावा विचार | तरावया पार भव सिंधु । |



क्षण क्षणा हा ची करावा विचार | तरावया पार भव सिंधु । |

नाशिवंत देह जाणार सकळ | आयुष्य खातो काळ सावधान । |

संत समागमी धरावी आवडी । करावी तातडी परमार्थाची । ।

तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे । नका डोळे धुरे भरुनी राहो । ।

---------------- संत तुकाराम महाराज

आपले हिंदू धर्म शास्त्र हे प्रामुख्याने कर्म सिद्धांतावर आधारलेले आहे , त्यातील मुख्य धर्म ग्रंथ म्हणून आपण " श्रीमद भागवतगीता " ग्रंथाला विशेष महत्व देतो व त्यातील युध्द भूमीवरील श्रीकृष्ण - अर्जुन संवाद म्हणजे अध्यात्मातील अतिउच्च अनुभव आहे . व त्यात अर्जुन आपल्या भावंडाना / नातलग / जेष्ठ व वंदनीय गुरु समान व्यक्तींना युद्धासाठी आपल्या समोर पाहून भांबाहून जातो . अशा पार्श्वभूमीवर अर्जुनाला केलेला श्रीकृष्णाने उपदेश म्हणजेच गीता होय , ह्या गीतेला आधुनिक संत विनोबा भावे " गीताई " असे म्हणत , महात्मा गांधीनी सुद्धा शेवटपर्यंत आपल्या आयुष्याचा आदर्श म्हणून गीतेलाच सर्वोच्च स्थान दिले होते व ते त्याचे रोज नित्य नियमाने पठाण करत असत . लोकमान्य टिळकांची विद्वत्ता व त्यांचा व्यासंग व त्यांचे अध्यात्मातील श्रेष्ट्त्व अनुभवायचे असेल तर त्यांनी लिहिलेल्या " श्रीमदगीतारहस्य " अर्थात कर्मयोग शास्त्र हा गीतेवरील भाष्य करणारा ग्रंथ अवश्य पहावा . लोकमान्य टिळक तर ठासून सांगतात कि सर्वात श्रेष्ठ हे कर्मच आहे व गीतेमध्ये सुद्धा तोच विषय प्रतिपादित केलेला आहे .

आपल्या महाराष्ट्रातील संत कुळातील संत महात्म्यांनी सुद्धा कर्माला अधिकाधिक महत्व देवून ते सामान्य जणावर बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे , संत तुकाराम महाराज ह्या अभंगात आपल्याला कर्मच कसे श्रेष्ठ आहे व आपण क्षणा - क्षणाला त्याचा कसा विचार केला पाहिजे व का विसर पडू दिला नाही पाहिजे हे हे सांगत आहेत . संतानी आपल्या अभंगात अनेक ठिकाणी असे लिहून ठेवलेले आहे कि कर्म हे तीन प्रकारचे असतात. ( १ ) प्रारब्ध ( २ ) संचित ( ३ ) क्रियमाण असे तीन प्रकार होत . प्रारब्ध व संचित हे पूर्व कर्मानुसार प्राप्त होणारे फलित असतात परंतु क्रियमाण म्हणजेच वर्तमानात अर्थात सद्यस्थितीला जे आपण कर्म करत असतो ते होय . एखादी व्यक्ती हि दैवहीन , धनहीन , व गरीब असू शकते त्याला आपले पुढील आयुष्य शेवट पर्यंत चांगल्या पद्धतीने जगायचे असल्यास , त्याचे व्यावाहारार्थाने म्हातारपण चांगले जावे असे वाटत असल्यास व त्यानंतर हि आपल्या जीवनाची व शरीराची आबाळ होऊ नये असे वाटत असल्यास त्याने आपले वर्तमानातले क्रियमाण हे सतत चांगले ठेवले पाहिजे व सतत कार्यरत राहिले पाहिजे . अध्यात्माच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास आपल्या आत्म्याला ईश्वराचे अनुभूती मिळून आपल्या आत्म्याला पुढील जन्मी चांगली जन्मयोनी प्राप्त होवून आपल्या आत्म्याला मोक्ष - प्राप्ती मिळावी असा आहे . मोक्ष - प्राप्ती जरी खूप लांबची गोष्ट असली तri , आहे हे आयुष्य सुसह्य होवून आपल्याला शेवट पर्यंत आयुष्य सुख - समाधानात , आनंदात घालवता आले तरी खूप आहे .

म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कि आपण आपला क्षणा क्षणाला विचार करावयाला हवा जेणे करून आपले हे अनंत अडचणीचे , मायावी , सदा दुख : भरलेले आयुष्य व्यवस्थित पार करता येईल . खरे पाहता आपले शरीर हे पूर्णत: नाशिवंत आहे , हा देह पाच पंचमहाभूताने बनलेला आहे , आकाश , वायू , अग्नी , जल व पृथ्वी हे जसे आपल्याला दृष्टी गोचर आहेत तसेच ते आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म व स्थूल रुपात आहेत , सात्विक , राजस ,व तामस ह्या मायिक त्रिगुणांनी व पंच महाभूतानि युक्त हा देह क्षणा - क्षणाला आपले रंग-रूप पालटत असतो . क्षणा -क्षणाला काही पेशी तयार होवून क्षणा - क्षणाला काही पेशी मृत होत असतात . वात , कफ , पित्त ह्या दोषांनी कधीही आक्रमण केले तर ह्या शरीराचे पूर्ण संतुलन बिघडून जाते व बऱ्याचदा अवकाळी मृत्यूलाही सामोरे जावे लागते . आयुष्याच्या शेवटी हि हे शरीर ज्या ३६ तत्वांनी बनलेले असते ती तत्वे त्याच्या त्याच्या संबंदित मूळ तत्वाला मिळून जातात . आकाश तत्व आकाश रुपी होवून जाते , वायू तत्व वायूला जावून मिळते , अग्नी तत्व सूर्य रूप होते , जल तत्व जलतत्वात समाविष्ट होते बाकी जे हाड - काडे वाचतात ते भूमीशी एकरूप होवून जातात व अशा प्रकारे आपले म्हणून जे काय आपण सांभाळलेले असते ते शेवटी काहीच राहत नाही .

आपल्या मानवाचे व एकूणच प्रत्येक जीवाचे असे एक आयुष्यमान ठरलेले असते . तेवढे आयुष्य झाले कि त्याला ह्या जगाचा निरोप घ्यावाच लागतो . परंतु त्यातील बरचसे दिवस हे असेच वाया जात असतात . १ ५ / २ ० वर्षे हे बालपणातच जातात , पुढील १ ५ / २ ० वर्षे हे जवानी अर्थात तरुणपणात म्हणजेच " मी पणा " करण्यात जातात . शेवटचे १ ५ / २ ० वर्षे हे अंथरूण धरून म्हातारपणात जातात व ह्या काळात आपलीच मुले आपली लायकी काढत असतात , हिडीस - फिडीस करत राहतात , डोळ्यातून पाणी काढण्याशिवाय पर्याय नसतो व त्या म्हातारपणात काय करावे तर कुठलेही इंद्रिये निट काम करत नसतात . ह्या म्हातार्या माणसाची लोक " जायचीच " वाट पाहत असतात . अशातच ४ ० / ४ ५ च्या काळात लोकांना थोडेफार शहाणपण आलेले असते परंतु त्यांना संसार व " वारस " ह्यांची जास्त फिकीर असते व माणूस स्वताकडे पूर्ण दुर्लक्ष्य करतो व शेवटी त्याच्या आयुष्याची परवडच होते , शोकांतिका होते म्हणून संत तुकाराम महाराज आपल्या सर्वाना " सावधान " करत आहेत …क़ि बाबानो तुमचे आयुष्य संपत चाललेले आहे आता तरी तुम्ही सावध व्हा , आता तरी तुम्ही संतांची संगती धरा , आता तरी तुम्ही विचार करा कि ह्या आयुष्यात नुसतेच भवरा होएउन फिरायचे कि आपल्या स्व - स्वरुपाची ओळख करून घ्यायची ? ( माणसाने / व्यक्तीने असा विचार हा तरुण असल्या पासूनच करायला पाहिजे , तरुण पणात त्याच्या अंगी ताकद असते , शरीर पाहिजे त्या गोष्टीला साथ देत असते , काळ हि अनुकूल असतो , फक्त संगती हि संत - सज्जनाची असावी )

संत हे ढोबळ अर्थाने व्यक्तीला संबोधित असले तरी संत हि उपमा जे अध्यात्म जाणतात त्यांना माहित आहे कि ती संज्ञा हि व्यक्तीला नसून " ज्ञानाला " आहे . व्यक्ती हि प्रकृती स्वरूप असल्याकारणाने त्या मध्ये अनेक विकृती असण्याचा संभव असतो . परंतु हे ज्ञान हे हि काही असामान्य अशा संत महात्म्याकडेच असते , म्हणून त्यांच्या कृपा , दया , करुणारुपी सहवासात ह्या ज्ञानाची आवड मनात धरावी .

परमार्थ ह्या शब्दाची फोड परम + अर्थ = परम अर्थ अशी आहे , परम म्हणजे अति उच्च , अगदी शेवटचे , सर्वात शेवटचे ,सर्वोच्च , उत्तम ( ह्या नावाचे काही शब्द पहा ,… परमेश्वर , परमवीर ( चक्र ) , परमात्मा , परम कॉम्पुटर ( भारतातील सर्वात शक्तिशाली कॉम्पुटर ) परमधाम इ . इ . ) . तर परमार्थ ह्या शब्दाचा अर्थ ह्या विश्वाचे जे गुह्य आहे , ह्या विश्वाच्या ईश्वराला जाणून घेण्याचे जे साधन आहे ते म्हणजे ज्ञान होय व त्या ज्ञानाच्या आधारानेच संत संगत धरून आपण ते ज्ञान प्राप्त करून घेवू शकतो व ते ज्ञान प्राप्त झाल्यामुळे सर्व सामान्य साधक विपरीत / प्रतिकूल परिस्थितीत हि सर्वांशी प्रेमाने , सौदार्हाने वागून आपले जीवन समाधानाने व्यतीत करू शकतो .

परंतु शेवटी संत तुकाराम महाराज आपल्याला सावध करत आहेत कि ,… ह्या इहलोकीच्या व्यवहारात म्हणजे , आपल्या जगात / समाजात विभिन्न प्रकारचे लोक असतात , अनेक वृत्तीचे / प्रकृतीच्या व्यक्ती असतात , मोहवणारे अनेक क्षण येतात , लालसा निर्माण करून गोत्यात आणणारे अनेक प्रसंग उद्भवत असतात , प्रलोभने , विषय - वासना ह्या मुद्दाम हून सज्जनाच्या अवती भोवती येत असतात अशा वेळी भक्ताने / सज्जनाने सदा सजग व सावध राहायला हवे , कामांध व्यक्तीला जसे काम तृप्ती शिवाय काहीच दिसत नाही , पुत्र - प्रेमापुढे जसे पित्याला धृतराष्ट्रा सारखे फक्त आपल्याच पुत्रांचे हित दिसते व तो आपल्या कर्तव्याकडे डोळेझाक करतो व आपले स्वताचे हनन करून घेतो तसे ह्या मायिक दुनियेत अशी वेळ येते कि काही क्षण आपल्याला काय करावे ते काहीच कळत नाही , जसे आपल्या डोळ्यात धूर गेल्यानंतर काही क्षण आपल्याला काहीच कळत नाही व तेवढ्या वेळात आपल्या कडून डोळे चोळत चोळत पुढील काहीच दिसेनासे झाल्यामुळे काहीतरी अघटीत होवून जाते व नंतर पश्चाताप करण्याची पाळी येते . म्हणून तुकाराम महाराज इथे आपल्याला रोकडा परमार्थ व व्यवहार शिकवतात कि आपण आपल्या डोळ्यात अज्ञानाचा धूर / अज्ञानाची पडळ / अज्ञानाची काजळी येवू न देता सदा सावध राहून क्षणा-क्षणाला आपले आयुष्य अधिक सुंदर बनवता येईल .