Thursday, June 26, 2014
Sunday, June 22, 2014
बडा हुवा तो क्या हुवा , जैसा पेड खजूर ? . . . .. . पंथी को छाव नही , फल लागे अति दूर ।
बडा हुवा तो क्या हुवा , जैसा पेड खजूर ?
पंथी को छाव नही , फल लागे अति दूर ।
नारळ , खजूर , या सारखे काही झाडे असतात ती खूप उंच वाढतात , त्यांची फळे खूप चांगली असतात , मधुर असतात , त्यांची स्वताची अशी खास गोडी असते परंतु दुर्दैव असे असते कि ते हाताला लागतील अशा अंतरावर नसतात .
…. अशा झाडा जवळ गेल्यानंतर व्यक्ती कितीही भुकेला , थकलेला , तहानलेला असेल तरी त्याला त्याचा थोडा थकवटा घालवण्यासाठी , त्याला ह्या झाडाखाली उन्हापासून सरंक्षण होईल अशी सावली सुद्धा मिळत नाही . उंचावर पाहिले तर गोड अशी फळे दिसत असतात परंतु अनेक प्रयत्ना नंतर ते हाताला लागत नाहीत व शेवटी अशा झाडाजवळ गेल्या नंतर पदरी निराशाच पडते .
वरील उपमा हि अशाच वृत्तीच्या लोकासाठी वापरली गेलेली आहे , काही व्यक्तींचे खूप नाव झालेले असते , त्यांच्या भोवती प्रसिद्धीचे वलय असते परंतु अशा व्यक्तींच्या जवळ गेल्यानंतर खूप भ्रम निराशा होते , एवढी कि असल्या व्यक्ती बद्दल पुढे पुढे अन्तर च ठेवूशी वाटते …
…. कारण ती व्यक्ती आपल्यासाठी व समाजासाठी हि काहीही कामाची , उपयोगाची नसते . समाजापासून अथवा जमिनीपासून आपली नाळ तुटलेली असते व त्यांच्या वाढलेल्या अपेक्षांना समाज पुरे पडत नसतो . असो .
या बाबतीत मला काही बालपणाच्या गोष्टी आठवतात , ज्या निसर्गाच्या सानिध्यात मी वाढलो , रानावनात , जंगलात हिंडलो , बागडलो त्यातील काही अनुभव मला ह्या बाबत आपणाशी शेयर करुशी वाटत आहेत .
मी लहानपणी जेंव्हा डोंगरात , जंगलात , शेतात , रानावनात फिरायचो तेंव्हा अनेक गावरान मेवा व फळांचा आस्वाद घ्यायचो . रान फळामध्ये मला खूप आवडणारे फळ म्हणजे निवडुंगाचे बोडं , बोरे , चिंच आंबे इत्यादी .
निवडुंगाच्या बोंडाची गंमत अशी होती कि ते मिळवण्यासाठी शोधण्यासाठी जंगलात खूप आत पर्यंत जावे लागत असे , निवडुंगाचे झाड जरी सापडले तरी त्यावर आलेले पिकलेले बोडं शोधणे हे अनुभवाचे काम असते . निवडुंगाच्या झाड हे खूप अडचणी मध्ये असते , त्याच्या आजू बाजूला काही सरपटणारे प्राणी असण्याची खूप शक्यता असते . त्यातून हि मार्ग काढून मधुर अशा बोंडा पर्यंत पोहोचायचे म्हणजे निवडुंगाच्या काट्यांचे ओरखडे हे ठरलेलेच . बर्याच प्रयत्नांनी असे एखादे बोंड मिळवले व ते खाण्याला सुरुवात करायची म्हटले तर ते आहे तसेच खाता येत नाही कारण त्यावर खूप काटे असतात व ते बाजूला करून आतील लाल लाल मधुर फळ चाखायची मजा काही औरच असते . हि गोष्ट इथेच संपत नाही आतल्या लाल गरामध्ये सुद्धा अति सूक्ष्म काटेरी जिभेला भयंकर टोचणारी असे काटे असतात . इथे हि अनुभव च कामी येतो . जो अनुभवी व्यक्ती , माहितगार असतो केवळ तोच ह्या निवडुंगाची फळे चाखण्यात यशस्वी होतो व मधुर फळाचा आस्वाद घेवू शकतो .
आम्ही रानात फिरताना आम्हाला बोराची कुठली झाडे आंबट , कुठली तुरट , कुठली किड्यांनी भरलेले व कुठले मधुर , गोड , व चव टिकून राहणारी होती , हे आम्हाला खूप चांगले माहित असायचे . आम्ही एका चांगल्या पिकलेल्या बोरासाठी अनेक प्रयत्न करून ते मिळवायचोच . आणि त्याच वेळी जी आंबट , कडू व किडकी फळे असलेल्या झाडांकडे आम्ही चुकून सुद्धा पाहत नव्हतो .
हीच गोष्ट चिंचेच्या झाडाची . ज्या चिंचेच्या झाडाला चवदार व आंबट गोड चव असेल त्याच झाडाकडे आमचे लक्ष असायचे परंतु अत्यंत आंबट , कडवट असणाऱ्या झाडावर चिंचा लगडलेल्या तर दिसत असायच्या परंतु त्या चिंचेच्या झाडाचे अंगभूत गुण सगळ्यांना माहित असल्यामुळे कुणी तिकडे फिरकत हि नसायचे .
अगदी तशीच गोष्ट आंब्याच्या झाडांची , काही झाडांना येणारे आंबे हे बारीक असायचे परंतु त्याची चव अशी काही असायची कि कितीही उंचावर पाडाचा आंबा दिसला कि तो आमच्या हातून सुटत नव्हता . परंतु काही आंब्याची झाडे नुसतेच मोठाले परंतु चवीला आंबट तर काहींच्या नुसत्याच कोया मोठ्या , आकाराला आंबा मोठा परंतु रसाला काहीच नसायचा , काही आंब्यांच्या झाडाला येणारे आंबे हे खूप केसाळ तंतुमय त्यामुळे आम्ही त्या झाडाकडे लक्षच देत नसायचो .
. . . . . . मला आज असाच एक समाजाचा मोठे नाव असलेला माणूस भेटला परंतु त्यांचे समाजा बद्दलचे विचार ऐकून मी खूप विचारात पडलो .एवढे नाव कमावलेला माणूस आहे , ज्याचे नाव समाज खूप आदराने घेत आहे परंतु त्याचे समाजा बद्दलचे विचार ऐकून आमचे मन कडवट झाले .
नारळ व खजूर हि फळे तशी आरोग्य व शरीराच्या पोषकतेच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहेत , त्याची फळे हि तंत्राने मिळवता येतात , असली झाडे हे अहंकाराने ताडा-माडा सारखी उंचच उंच वाढलेली असली तरी ती फळे त्यांच्या उपयोगतेते मुळे आपण अनेक प्रयत्न करून मिळवू शकतो …परन्तु ?? ? ?
……. परंतु तुरट , कडवट ,आंबट , किडक्या फळाप्रमाणे समाजातील काही व्यक्तींचे आपण आपला म्हणून खूप गुणगान गातो परंतु त्यांचा समाजाला कितीसा लाभ भेटतो हे पाहिले कि प्रश्न चिन्हच उभे राहते .
एक मराठी म्हण आहे व एका जुन्या मराठी चित्रपटामध्ये एक डायलॉग होता . .
" सर्जा , तुझा काहीहि उपयोग नाही , तू खायला काळ आणि भुईला भार आहेस "
समाजासाठी हि अशा काही भार असलेल्यांचा समाजाने जास्त विचार करू नये व काही कडू / आंबट झाडांकडे जसे आपण दुर्लक्ष करतो तसे यांना जास्त किमत न देता चांगल्या लोकांच्या शोधात रहावे .
आपल्या विचाराने , वागण्याने गोडवा निर्माण करणाऱ्या दुर्मिळ व्यक्तींना समाजाने डोक्यावर घ्यावे .
Saturday, June 21, 2014
Friday, June 20, 2014
क्षण क्षणा हा ची करावा विचार | तरावया पार भव सिंधु । |
क्षण क्षणा हा ची करावा विचार | तरावया पार भव सिंधु । |
नाशिवंत देह जाणार सकळ | आयुष्य खातो काळ सावधान । |
संत समागमी धरावी आवडी । करावी तातडी परमार्थाची । ।
तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे । नका डोळे धुरे भरुनी राहो । ।
---------------- संत तुकाराम महाराज
आपले हिंदू धर्म शास्त्र हे प्रामुख्याने कर्म सिद्धांतावर आधारलेले आहे , त्यातील मुख्य धर्म ग्रंथ म्हणून आपण " श्रीमद भागवतगीता " ग्रंथाला विशेष महत्व देतो व त्यातील युध्द भूमीवरील श्रीकृष्ण - अर्जुन संवाद म्हणजे अध्यात्मातील अतिउच्च अनुभव आहे . व त्यात अर्जुन आपल्या भावंडाना / नातलग / जेष्ठ व वंदनीय गुरु समान व्यक्तींना युद्धासाठी आपल्या समोर पाहून भांबाहून जातो . अशा पार्श्वभूमीवर अर्जुनाला केलेला श्रीकृष्णाने उपदेश म्हणजेच गीता होय , ह्या गीतेला आधुनिक संत विनोबा भावे " गीताई " असे म्हणत , महात्मा गांधीनी सुद्धा शेवटपर्यंत आपल्या आयुष्याचा आदर्श म्हणून गीतेलाच सर्वोच्च स्थान दिले होते व ते त्याचे रोज नित्य नियमाने पठाण करत असत . लोकमान्य टिळकांची विद्वत्ता व त्यांचा व्यासंग व त्यांचे अध्यात्मातील श्रेष्ट्त्व अनुभवायचे असेल तर त्यांनी लिहिलेल्या " श्रीमदगीतारहस्य " अर्थात कर्मयोग शास्त्र हा गीतेवरील भाष्य करणारा ग्रंथ अवश्य पहावा . लोकमान्य टिळक तर ठासून सांगतात कि सर्वात श्रेष्ठ हे कर्मच आहे व गीतेमध्ये सुद्धा तोच विषय प्रतिपादित केलेला आहे .
आपल्या महाराष्ट्रातील संत कुळातील संत महात्म्यांनी सुद्धा कर्माला अधिकाधिक महत्व देवून ते सामान्य जणावर बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे , संत तुकाराम महाराज ह्या अभंगात आपल्याला कर्मच कसे श्रेष्ठ आहे व आपण क्षणा - क्षणाला त्याचा कसा विचार केला पाहिजे व का विसर पडू दिला नाही पाहिजे हे हे सांगत आहेत . संतानी आपल्या अभंगात अनेक ठिकाणी असे लिहून ठेवलेले आहे कि कर्म हे तीन प्रकारचे असतात. ( १ ) प्रारब्ध ( २ ) संचित ( ३ ) क्रियमाण असे तीन प्रकार होत . प्रारब्ध व संचित हे पूर्व कर्मानुसार प्राप्त होणारे फलित असतात परंतु क्रियमाण म्हणजेच वर्तमानात अर्थात सद्यस्थितीला जे आपण कर्म करत असतो ते होय . एखादी व्यक्ती हि दैवहीन , धनहीन , व गरीब असू शकते त्याला आपले पुढील आयुष्य शेवट पर्यंत चांगल्या पद्धतीने जगायचे असल्यास , त्याचे व्यावाहारार्थाने म्हातारपण चांगले जावे असे वाटत असल्यास व त्यानंतर हि आपल्या जीवनाची व शरीराची आबाळ होऊ नये असे वाटत असल्यास त्याने आपले वर्तमानातले क्रियमाण हे सतत चांगले ठेवले पाहिजे व सतत कार्यरत राहिले पाहिजे . अध्यात्माच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास आपल्या आत्म्याला ईश्वराचे अनुभूती मिळून आपल्या आत्म्याला पुढील जन्मी चांगली जन्मयोनी प्राप्त होवून आपल्या आत्म्याला मोक्ष - प्राप्ती मिळावी असा आहे . मोक्ष - प्राप्ती जरी खूप लांबची गोष्ट असली तri , आहे हे आयुष्य सुसह्य होवून आपल्याला शेवट पर्यंत आयुष्य सुख - समाधानात , आनंदात घालवता आले तरी खूप आहे .
म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कि आपण आपला क्षणा क्षणाला विचार करावयाला हवा जेणे करून आपले हे अनंत अडचणीचे , मायावी , सदा दुख : भरलेले आयुष्य व्यवस्थित पार करता येईल . खरे पाहता आपले शरीर हे पूर्णत: नाशिवंत आहे , हा देह पाच पंचमहाभूताने बनलेला आहे , आकाश , वायू , अग्नी , जल व पृथ्वी हे जसे आपल्याला दृष्टी गोचर आहेत तसेच ते आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म व स्थूल रुपात आहेत , सात्विक , राजस ,व तामस ह्या मायिक त्रिगुणांनी व पंच महाभूतानि युक्त हा देह क्षणा - क्षणाला आपले रंग-रूप पालटत असतो . क्षणा -क्षणाला काही पेशी तयार होवून क्षणा - क्षणाला काही पेशी मृत होत असतात . वात , कफ , पित्त ह्या दोषांनी कधीही आक्रमण केले तर ह्या शरीराचे पूर्ण संतुलन बिघडून जाते व बऱ्याचदा अवकाळी मृत्यूलाही सामोरे जावे लागते . आयुष्याच्या शेवटी हि हे शरीर ज्या ३६ तत्वांनी बनलेले असते ती तत्वे त्याच्या त्याच्या संबंदित मूळ तत्वाला मिळून जातात . आकाश तत्व आकाश रुपी होवून जाते , वायू तत्व वायूला जावून मिळते , अग्नी तत्व सूर्य रूप होते , जल तत्व जलतत्वात समाविष्ट होते बाकी जे हाड - काडे वाचतात ते भूमीशी एकरूप होवून जातात व अशा प्रकारे आपले म्हणून जे काय आपण सांभाळलेले असते ते शेवटी काहीच राहत नाही .
आपल्या मानवाचे व एकूणच प्रत्येक जीवाचे असे एक आयुष्यमान ठरलेले असते . तेवढे आयुष्य झाले कि त्याला ह्या जगाचा निरोप घ्यावाच लागतो . परंतु त्यातील बरचसे दिवस हे असेच वाया जात असतात . १ ५ / २ ० वर्षे हे बालपणातच जातात , पुढील १ ५ / २ ० वर्षे हे जवानी अर्थात तरुणपणात म्हणजेच " मी पणा " करण्यात जातात . शेवटचे १ ५ / २ ० वर्षे हे अंथरूण धरून म्हातारपणात जातात व ह्या काळात आपलीच मुले आपली लायकी काढत असतात , हिडीस - फिडीस करत राहतात , डोळ्यातून पाणी काढण्याशिवाय पर्याय नसतो व त्या म्हातारपणात काय करावे तर कुठलेही इंद्रिये निट काम करत नसतात . ह्या म्हातार्या माणसाची लोक " जायचीच " वाट पाहत असतात . अशातच ४ ० / ४ ५ च्या काळात लोकांना थोडेफार शहाणपण आलेले असते परंतु त्यांना संसार व " वारस " ह्यांची जास्त फिकीर असते व माणूस स्वताकडे पूर्ण दुर्लक्ष्य करतो व शेवटी त्याच्या आयुष्याची परवडच होते , शोकांतिका होते म्हणून संत तुकाराम महाराज आपल्या सर्वाना " सावधान " करत आहेत …क़ि बाबानो तुमचे आयुष्य संपत चाललेले आहे आता तरी तुम्ही सावध व्हा , आता तरी तुम्ही संतांची संगती धरा , आता तरी तुम्ही विचार करा कि ह्या आयुष्यात नुसतेच भवरा होएउन फिरायचे कि आपल्या स्व - स्वरुपाची ओळख करून घ्यायची ? ( माणसाने / व्यक्तीने असा विचार हा तरुण असल्या पासूनच करायला पाहिजे , तरुण पणात त्याच्या अंगी ताकद असते , शरीर पाहिजे त्या गोष्टीला साथ देत असते , काळ हि अनुकूल असतो , फक्त संगती हि संत - सज्जनाची असावी )
संत हे ढोबळ अर्थाने व्यक्तीला संबोधित असले तरी संत हि उपमा जे अध्यात्म जाणतात त्यांना माहित आहे कि ती संज्ञा हि व्यक्तीला नसून " ज्ञानाला " आहे . व्यक्ती हि प्रकृती स्वरूप असल्याकारणाने त्या मध्ये अनेक विकृती असण्याचा संभव असतो . परंतु हे ज्ञान हे हि काही असामान्य अशा संत महात्म्याकडेच असते , म्हणून त्यांच्या कृपा , दया , करुणारुपी सहवासात ह्या ज्ञानाची आवड मनात धरावी .
परमार्थ ह्या शब्दाची फोड परम + अर्थ = परम अर्थ अशी आहे , परम म्हणजे अति उच्च , अगदी शेवटचे , सर्वात शेवटचे ,सर्वोच्च , उत्तम ( ह्या नावाचे काही शब्द पहा ,… परमेश्वर , परमवीर ( चक्र ) , परमात्मा , परम कॉम्पुटर ( भारतातील सर्वात शक्तिशाली कॉम्पुटर ) परमधाम इ . इ . ) . तर परमार्थ ह्या शब्दाचा अर्थ ह्या विश्वाचे जे गुह्य आहे , ह्या विश्वाच्या ईश्वराला जाणून घेण्याचे जे साधन आहे ते म्हणजे ज्ञान होय व त्या ज्ञानाच्या आधारानेच संत संगत धरून आपण ते ज्ञान प्राप्त करून घेवू शकतो व ते ज्ञान प्राप्त झाल्यामुळे सर्व सामान्य साधक विपरीत / प्रतिकूल परिस्थितीत हि सर्वांशी प्रेमाने , सौदार्हाने वागून आपले जीवन समाधानाने व्यतीत करू शकतो .
परंतु शेवटी संत तुकाराम महाराज आपल्याला सावध करत आहेत कि ,… ह्या इहलोकीच्या व्यवहारात म्हणजे , आपल्या जगात / समाजात विभिन्न प्रकारचे लोक असतात , अनेक वृत्तीचे / प्रकृतीच्या व्यक्ती असतात , मोहवणारे अनेक क्षण येतात , लालसा निर्माण करून गोत्यात आणणारे अनेक प्रसंग उद्भवत असतात , प्रलोभने , विषय - वासना ह्या मुद्दाम हून सज्जनाच्या अवती भोवती येत असतात अशा वेळी भक्ताने / सज्जनाने सदा सजग व सावध राहायला हवे , कामांध व्यक्तीला जसे काम तृप्ती शिवाय काहीच दिसत नाही , पुत्र - प्रेमापुढे जसे पित्याला धृतराष्ट्रा सारखे फक्त आपल्याच पुत्रांचे हित दिसते व तो आपल्या कर्तव्याकडे डोळेझाक करतो व आपले स्वताचे हनन करून घेतो तसे ह्या मायिक दुनियेत अशी वेळ येते कि काही क्षण आपल्याला काय करावे ते काहीच कळत नाही , जसे आपल्या डोळ्यात धूर गेल्यानंतर काही क्षण आपल्याला काहीच कळत नाही व तेवढ्या वेळात आपल्या कडून डोळे चोळत चोळत पुढील काहीच दिसेनासे झाल्यामुळे काहीतरी अघटीत होवून जाते व नंतर पश्चाताप करण्याची पाळी येते . म्हणून तुकाराम महाराज इथे आपल्याला रोकडा परमार्थ व व्यवहार शिकवतात कि आपण आपल्या डोळ्यात अज्ञानाचा धूर / अज्ञानाची पडळ / अज्ञानाची काजळी येवू न देता सदा सावध राहून क्षणा-क्षणाला आपले आयुष्य अधिक सुंदर बनवता येईल .
Thursday, June 19, 2014
आम्ही नाते जपतो . . मैत्री मुळात , करतच नाही . . .
आम्ही नाते जपतो . .
मैत्री मुळात करतच नाही . . .
कशाला हव्यात पोकळ भूल थापा त्या ?
खोटेच ते व्यक्त होणे अन खोटेच जे जीव लावणे
थोडे मनासारखे न होता . . .
विशेषणे आणि दुषणे ते देणे . . .
मैत्री आम्ही सुद्धा केली . . .
भोगली . . .
त्याला आलेले कडू फळे चाखली
आता मैत्रीला आम्ही घाबरतो ,
विरुद्ध लिंगी मैत्री तर करतच नाही . .
तिथे " खो " ठरलेलाच असतो . . .
आता आम्ही फक्त . . .
जीवा - भावाचे संबंध जपतो . . .
मैत्रीच्या " मुखवट्या " पासून दूर राहतो
आता फक्त आम्ही ….
माणुसकीचे " नाते " जपतो .
११ : २१ - - - - - -- - १९ / ६ २०१४ - - - - - - गुरुवार
Monday, June 16, 2014
महाराज , आपण आजही आहातच , .....आपणास आमचा " मुजरा " स्वीकार असावा
जो पर्यंत सह्याद्री आहे
जो पर्यंत सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्या आहेत
जो महाराष्ट्र भूमीला लाल रंग आहे ....
तो पर्यंत ..." .महाराज ....आपले नाव घेताच , "
आमच्या धमन्या सळसळत राहणार
रोम रोम पुलंकित होत राहणार
आपोआप मुठी आवळल्या जाणार
आमची नजर हि भेदक होणार ...
आवाज हि धार धार होणार
महाराज , आपण आजही आहातच
आपणास आमचा ...." मुजरा " स्वीकार असावा
१९ फेब्रुवारी २०१३
Sunday, June 15, 2014
Saturday, June 14, 2014
आज फादर डे , इंग्राजळेल्या संस्कृतीतील वडिलांबद्दल दिखावा प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस
happy father day to all ! ! !
आज फादर डे , इंग्राजळेल्या संस्कृतीतील वडिलांबद्दल दिखावा प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस , मराठीत याचे भाषांतर " पितृदिन " असे होत नसावे कारण पितृदिन म्हटले कि त्याचा वेगळा अर्थ निघतो , असो
तर माझे वडील बाळासाहेब नाथू कुसाळकर , देवी निमगाव , कडा ( आष्टी ) बीड , या गावचे मूळ रह्वाशी , १९७२ च्या दुष्काळात आम्ही बीड जिल्यातून पुणे जिल्यातील जुन्नर तालुक्यात कामानिमित्ताने स्थलांतरित झालो , स्थायिक झालो , त्या गावाशी समरूप झालो , वडिलांनी आपल्या पापभिरू स्वभावाने खूप लोक जोडले , माळ घातली , भजनात सहभाग घेतला , कीर्तन - प्रवचनात पडेल ती कामाची सेवा केली , पंढरपूरची वारी केली ,
आयुष्यात कधीही खास आजारी असे पडले नाहीत , किरकोळ थंडी तापाचा आजार हाच त्यांचा आजार , ते हि अंगावर काढायचे नाहीतर , प्राथमिक सरकारी दवाखान्यात जावून ५ पैशाचे एक स्लीप काढून एक इंजेक्शन मारून आले कि ठीक होणार , सरकारी दवाखान्यातील गोळ्या व इंजेक्शन यावर त्यांचा खूप विश्वास .
परंतु आयुष्याच्या शेवटी त्यांना आजाराने घेरले , कधी मुंबई तर बर्याचदा पुणे असे दवाखाने करत करत ते अचानक आम्हाला सोडून गेले .
आमच्या वडिलांना दोन व्यसने होती , एक संभाजी अर्थात कोंबडा छाप बिडी ओढण्याचे व दुसरे कामाचे , दारू तेच काय त्यांचे इतर भाऊ सुद्धा कधी पीत नव्हते , त्यांचा वैयक्तिक खर्च काहीच नव्हता , ते एक उत्कृष्ट गवंडी होते , विहिरी व घरांचे काम खूप छान करायचे , ते दगड घडण्याचे काम हि खूप छान करायचे , परंतु पुणे जिल्यात आल्यापासून दगड - खाणीत कामाला जायला लागायचे ,
त्या काळी हाताने सुरुंग घ्यावा लागत असे , भल्या पाहटे उठून , उजडण्याचा आत ते खाणीवर जात व १० / ११ वाजे पर्यंत त्यांचा एक ४ /५ फुट सुरुंग मारून होई , त्यानंतर तो उडवायची लगीन - घाई त्यांची चालायची , विरया ( कि युरया ) , सुरुंगाची दारू , सुरुंगाची काळी सुतळी , सुरुंगासाठी लागणारे मीठ , हे सारे ते घरात एका कोपऱ्यात खूप जपून ठेवायचे , ते सुरुंग चेळताना , खूप काळजी घ्यायचे ,
सुरुंग भरताना बारीक दगडाचे तुकडे , कच ,युरया , दारू , मीठ , हे ठासून न चाळता काळजीपूर्वक भरायचे , त्यांनी या कामात निष्काळजीपणा कधी केलेला आठवत नाही , कधी धडीला सुरुंग घेतलेला असेल तर सुरुंग पेटवल्या नंतर त्यांची खूप त्रेधा उडायची , कधी कधी सुरुंग फुसका जायचा , अशावेळी वडील खूप निराश व्हायचे कारण हाताने सुरुंग घेणे एवढे सोपे नसायचे व हाताला फोड येण्याचा प्रश्नच नव्हता कारण तो हात मुलायम राहिलेलाच नसायचा , फोड येवून ते जागीच दाबून ते हात पुरते दगडासारखे निबर झालेले होते .
सुरुंग उडवायचे ठरले कि आजूबाजूला सगळ्यांना आरोळी ठोकून सावध करायचे , बायकांना व लहान मुलांना दूर जावून उभे राहायला सांगायचे कारण कधी कधी दगड खूप उंच उडत व ते दगड लागण्याची खूप शक्यता असायची , सुरुंग उडाल्यानंतर , किती दगड माल खाली पडला आहे हे पाहण्याची घाई असायची , चांगला माल पडलेला असेल तर सुतकी घेण्यासाठी त्यांचे हात आसुसलेले असायचे परंतु आईच सांगायची कि जेवून घेवून नंतर फोडायला सुरुवात करा . . .
नंतर एकदा सुरुवात केली कि त्यांच्यासाठी , सुतकी , दगड आणि पहार हेच विश्व असायचे , कधी आधी मधी दगड लागून जखमा व्हायच्या परंतु संभाजी बिडीचा लाल कागद त्याला थुका ( थुंकी ) लावून लावला कि ती बरी होणार हाच त्यांचा विश्वास असायचा व तोच लाल कागद त्यांचा दवाखाना असायचा .
एवढे सारे मरमर काम केल्यानंतर , आठवड्याच्या दिवशी वडील खाण - मालकाकडे सकाळीच पैशाला जायचे , खूप उशीर त्यांचेच थेर ऐकून घ्यायचे परंतु तो काही पैसे लवकर देत नसायचा , आई घरी पैशासाठी वाट पाहून हैराण व्हायची कारण आठवड्याचा बाजार असायचा व लवकर गेले तर काही मिळण्याची शक्यता असायची . . हे खाण - मालक खूप अंत पाहायचे , , , परंतु नाविलाज असायचा . काही जणांना तर ३ /४ वाजेपर्यंत थांबून हि पैसे मिळत नसत तर काहीजण अगतिक होवून आर्जवे करायची पण त्या खाण - मालकाला कधी दया यायची नाही . असो
आमच्या चार भावांचे शिक्षण , घर , हे वडिलांनी कसे केले असेल काही सांगता येत नाही , आज वडिलांच्या भूमिकेत मी हि आहे , किती जड जात आहे याचा मला पूर्ण अंदाज आहे परंतु त्यांनी पूर्ण भोळे राहून , कधी हि कुणाला न दुखावता , गावातील लोकांशी एकरूप होवून खूप चांगले दिवस काढले , म्हणून आज हि गावातले लोक त्यांचे नाव काढतात , परंतु म्हातारपण हे वाईटच असते .
वडिलांनी फक्त एकदाच मला एक वीज चमकवनारी चापट हाणली होती , त्याशिवाय त्यांनी मलाच काय कुणालाही मारलेले आठवत नाही , मी लहान होतो व आई ला फिरून काहीतरी बोललो होतो व निघून जाण्याची काहीतरी गोष्ट केली होती , वडिलांनी एक सणसणीत ठेवून दिली होती , ती अद्याप लक्षात आहे . त्यांचे सगळे प्रेम पाठीमागून असायचे , समोर काहीच दाखवत नसत .
आम्ही सर्व आमच्या वडिलांना " अण्णा " म्हणायचो , काहींचे ते बाळभाऊ होते तर काहींचे बाळ दादा . वडिलांना कुणीही काम सांगावे वडील ते लगेच करायचे , कुणी हलके काम सांगितले व वडील ते करायला लागले तर आम्हाला कमीपणा वाटायचा , आम्ही वडिलांना बोलायचो , परंतु ते वडील कधी मनावर घेत नसत व म्हणूनच गावात जेंव्हा हरीनाम कीर्तन सप्ताह भरायचा तेंव्हा वडील खूप मिरवायचे , टाळ घेवून उभे राहायचे , त्यांनी गावातील काकडा ( पहाटेचे बोलायचे अभंग ) जसे ते जायला लागले तसा कधी सोडला नव्हता .
असे आमचे अत्यंत साधे , सरळ , ,सज्जन , भोले , पापभिरू वडील , कधी कुणाच्या अध्यात मध्यात नसायचे , सामंजस्य हीच त्यांची सदैव भूमिका असायची .
वडील गेले तो क्षण खूप हृदयदावक होता ,वडील जात आहेत हे समोर दिसत होते परंतु हतबलता होती. . . असो त्यावर परत कधीतरी . . .
आज फादर डे निमित्ताने माझ्या वडिलांना माझ्या या स्मुर्ती पुष्पांजली ! ! !
Friday, June 13, 2014
अर्जुनाला " अवदसा " सुचली . . . . . . म्हणाला कृष्णाला , रथ घे दोन्ही सैन्याच्या मध्यभागी
अर्जुनाला " अवदसा " सुचली
म्हणाला कृष्णाला , रथ घे दोन्ही सैन्याच्या मध्यभागी
खांदे गाळले , गांडीव गळाले , घुडगे टेकले
पाहता आप्तेष्ट , भाऊबंद , पाहुणे पाठी - पुढे
लागला विचार करू , युध्द मी कशासाठी करू ?
कृष्ण मुसद्धी भारी ,केली त्याने गीता तिथे सुरु
दाविले विश्वरूप , कोण तू अन कोण मी अन कोण तुझे भाऊबंद
मन हा अर्जुन , कृष्ण तो अंतरंग , करी विषयांचे परिमार्जन
जीवन म्हणजे नव्हे योगायोग , चाले ते " कर्म - सिद्धांतावर "
साद घालूनी मनाला , आवर घालावा विषय वासनेला
अनुहात ध्वनी , अंतर्मनाचा नाद , एकाग्र ते चित्त
मुख्य ती मनशांती , दुय्यम ते सुख , सुखात असे दुखं
नर जन्माचे सार , घ्यावा हाच " अंतर्वेध "
८ : ३ ३ - - - - - - - १३ / ०६ / २०१४ - - - - - - शुक्रवार
Thursday, June 12, 2014
न तू मुझे बाहर से आकर्षित कर सक्ती है .... ना तेरा शरीर......
न तू मुझे बाहर से आकर्षित कर सक्ती है ....
ना तेरा शरीर......
ना हि तेरे लहरते बालो का साया..........
ना हि तेरी हलकीसी मुस्कुराहट
ना हि तेरी लचकती चाल..........
ना हि तेरे गोरे गाल
ना तेरा रंग .....
ना तेरा रूप.....
ना तेरी बदन कि गर्मी .....
ना तेरी प्यार भरी बाते
ना हि तेरा गुस्सा ....
ना तेरा अन्जानापण.....
मैं तेरे दिखणे पे कभी नही गया...ना हि तेरे सुंदरता पे......
तेरे रूप का
तेरे रंग का
तेरे तन का
तेरे मन का
तेरे बदन का
तेरे लहरते बालो का
तेरी हलकीसी मुस्कान का
तेरे हर एक बातो का
तो
मैं
दिवाना नही ......
(वो और होंगे ...जिसका मुजे गम नही )
.मुजें पता चला है....मैं तुमसे प्यार क्यो करता हुं....
क्यो कि
एक तुम हि हो ....जो मुझे समज लेती हो
मेरे जजबातो को परख लेती हो
एक तुम हि हो ...जो मुजें समज लेती हो
मेरे आंखो को.... पढ लेती हो
वो तुम हि हो ..जो मेरे रग रग से वाकीफ हो
शायद
इसीलिये
मैं तुमसे बेइन्तेहा ..प्यार करता हुं
ऐसा मुजें लगता है..
येही मेरी धारणा हैं !!!
सावित्री नटली , फेऱ्या माराया निघाली . . हौसाबाई सजली , नवी साडी तिने घातली
सावित्री नटली , फेऱ्या माराया निघाली . .
हौसाबाई सजली , . . नवी साडी तिने घातली
सत्यवान राहिला घरात , तो आज आहे जोरात
पांढरा दोरा अन हळदी कुंकू ,
सडका आंबा अन नागिणीची पाने
सुपारीचा गणपती अन सुकलेली खारीक
छोटासा बदाम अन हळकुंड बारीक
खोबऱ्याचा टुकडा अन टपोरा झेंडू . . .
सावित्री नटली , फेऱ्या माराया निघाली . .
प्लास्टिक ची पुडी , त्यात इवले इवले काळे मनी
दोनच हिरव्या बांगड्या , त्यात प्लास्टिकची आहेवाची लाल टिकली
हिरवा कापडाचा तुकडा , त्याला म्हणूया खण चोळीचा
पिवळा दोरा , काड्याची पेटी , सोबतीला आहे अगरबत्ती
ताट सजले सर्व वस्तूंनी , शोभा आणली त्याला विणलेल्या नक्षीदार कापडाने
वाहण्या वट - वृक्षाला नारी निघाली . . .
सावित्री नटली , फेऱ्या माराया निघाली . .
नव धान्याचे वाण वाहते , पाच फळाचे दान हे देते
साता जन्माचे फेरे घालते , शेंडी वाल्याला दक्षिणा देते
पोरां - सोराना आशीर्वाद मागते , भरलेले घर सदा असू दे
आया - बायांची सोबत घेते , साज - शृंगार करुनी आनंदी राहते
पडली वहिवाट पुढे चालवते , समाज - संस्कृती पुढे ती नेते
सावित्री नटली , फेऱ्या माराया निघाली . .
१ : २७ - - - - - - १२ / ०६ / २०१४ - - - - - गुरुवार
Wednesday, June 11, 2014
आज वट-पौर्णिमा ...प्रचलित प्रथे प्रमाणे तमाम पुरुष वर्गासाठी , महिला वर्गाकडून केले जाणारे व्रत .
आज वट-पौर्णिमा ...प्रचलित प्रथे प्रमाणे तमाम पुरुष वर्गासाठी , महिला वर्गाकडून केले जाणारे व्रत ...सावित्री ने तिच्या सत्यावानासाठी केलेले व्रत ...सर्वच लोकांना ह्या पुराणातल्या कथे विषयी कल्पना आहे ,असावी ...
आपल्याकडे जे सण साजरे केले जातात त्या पाठीमागे आपल्या पूर्वजांचा ठोस असा गहिरा अर्थ दडलेला असायचा ..सण हे प्रतीकात्मक रूप म्हणून साजरे करायला सुरुवात केली असावी , नव्हे नव्हे ते प्रतीकात्मकच होत ...आपल्याकडच्या भट्ट - ब्राह्मणांनी त्याचे दैवतीकरण करून अनेक रूढी आणि परंपरा निर्माण करून ठेवल्या आहेत ...आणि नटायला थाटायला मिळत म्हणून आपणही असल्या प्रथेला घट्ट चिटकून बसलो आहोत .आज पुरुषाच्या पुढेही व त्याच्या मागेही त्यांच्या सत्यवानाचा काय काय उद्धार करतात हे सांगायला नको ...आणि सत्यवान हि आता सत्यवादी राहिले नाहीत .असो त्या खोलात आपल्याला जायचे नाहीं ..आपण वट - सावित्री व्रत काय आहे हे समजून घेऊयात ....
हा जो वट म्हणजेच वड जो आहे त्याचे बीज मोहरी सारखे बारीक असते ..परंतु ते बीज वाढीला लागले कि त्याचा विशाल काय अशा मोठा वृक्ष होतो ..आता पर्यावरण च्या दृष्टीने व नैसर्गिक समतोल राखण्याच्या दृष्टीने हा वटवृक्ष कसा आपली भूमिका वाटावतो ते पहा ....हा वृक्ष सतत हिरवागार असतो ..तसेच ह्याची थंडगार सावली अनेक पांथिकाना क्षणभरासाठी आपला सर्व क्षीण व परिश्रम घालवण्यास मदत करतो. ह्या वडाच्या मुळांच्या खोपटात लांडगे , कोल्हे , खोकडे ह्या प्राण्यांची वस्ती असते ..खोलवर बिले पडलेली असतात ..शेजारीच लाल मुंग्या , काळे देण्गल्या मोठाल्या तोंडचे मुंगळे हे सतत वर खाली करत असतात ..खारुताई ची लगबग सतत खोडावरून फान्ध्यावर चाललेली असते..वडाच्या फांद्यावर माकडे मुक्तपणे उच्छांद मांडत असतात ..ह्या झाडावर बहुतेक पक्षांची घरटी पाहायला मिळतील . चिमण्या , कावळे , घुबड इत्यादी हर तर्हेचे पक्षी व त्यांचा तो मंजुळ स्वर कधी कधी साळून्क्यांची एकचं घाई ....झाडाच्या शेंड्यावर गरुड , गिधाडे ह्यांचे डेरे....अशातच कधी झाडावर एखादा सर्पराज दिसला कि पक्षांची होणारी धांदल व साळून्क्याचा होणारा कलkalat ...सुतार पक्षाचे फांदीच्या खोपीतून अलगद बाहेत येणे ...मधीच सळसळनारी पाने...मध्येच होणारा कोलाहल ..मध्येच दाटणारी निरव शांतता ...मध्येच वरून एखादे टपकन खाली पडलेले पक्षाचे पिल्लू ..व त्याची अस्तित्व साठी चाललेली धडपड ...अशातच कुणीतरी बेसावध पने त्यावर घातलेली झडप ......
......अशा एक ना अनेक घटनांचा , प्रसंगाचा हा एकमेव साक्षीदार म्हणजेच वटवृक्ष ..ज्या वृक्षावर कित्येक किड्यांचे ,कित्येक प्राण्यांचे , कित्येक पक्ष्यांचे ,कित्येक भ्रमरांचे , कित्येक आलेल्या - गेलेल्यांचे आयुष्य आवलंबून असते ...ह्या झाडावर पूर्ण चैतन्यच अवतरलेले दिसते ..संपूर्ण प्राणी मात्रांची वस्तीच तिथे नांदत असते ....बरे ह्या वड वृक्षाचे आयुष्यही शेकडो वर्षांचे असते ...म्हणजेच त्या वट वृक्षाने तेथील प्राणी - पक्षांच्या कित्येक पिढ्या पाहिल्या असतील ..कमीत कमी सात पिढ्या तरी नक्कीच ...हो ना ?
अशा ह्या वड वृक्षाच माणसालाही खूप उपयोग आहे ..ह्या वृक्षाच्या छायेत जी झोप लागते ती नक्कीच फोम च्या गादीत येणार नाहीं ...ह्यांच्या पारंब्या ना लटकून मस्त उंच च्या उंच झोके घेत| येतात ..ह्याच्या लाकडाचा जळणासाठी , घरगुती वापरासाठी उपयोग होतो ...अशा प्रकारे हा वृक्ष सर्वच जीव मात्रासाठी जगण्याचे वस्ती स्थान आहे ...खास करून जंगलातील ह्याचे अस्तित्व हेच अधिरेखीत करते ...
...एवढे असूनही हा वृक्ष स्थितप्रज्ञ सारखा असतो ...सर्व साक्षी असतो ...तरीही खंबीर पने उभा ....सर्वाना उपयोगी पाडण्यासाठी सदैव तत्पर .
....चला आता आपल्या सत्यवान - सावित्री कडे येउयात ...आजच्या काळी स्त्री व पुरुष दोघेही कमावतात व स्वताचा संसार चालवतात ...पूर्वीच्या काळी असे नव्हते ..तेंव्हा ती जबाबदारी पूर्ण पुरुषाचीच असायची ....त्या मूळे पुरुषाचे असणे ( जिवंत ) हे खूप महत्वाचे असायचे .व त्या काळी गाई व बाई हि नेहमी संरक्षणात असायची ...मोकळी गाय व मोकळी बाई दिसली कि कुणीही तिला आपली म्हणून घेऊन जायचे ...अशा अवस्थेत घरात अवलंबून असणार्यांची पूर्ण जबाबदारी हि कुटुंब प्रमुखावर असायची ..घरातील वयस्कर व्यक्ती , लहान मूले , तरुण स्त्रिया ..ह्यांचे कर्ता पुरुष गेल्यावर काय हाल होतील ...ह्या साठी ....त्या कर्त्या पुरुषाला खूप आयुष्य मिळावे व आपले संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहावे हा मूळ स्वार्थ असायचा ( कुणी ह्याला त्याग हि म्हणा हवे तर )...व असे केल्या मूळे आपली मुले, नातवंडे पर्यायाने संपूर्ण वंशच सुरक्षित राहील ...हा विचार त्या मागे असावा ...
....आता बंधुनो असा विचार करा कि ....तो वट वृक्ष कोसळला आहे , उन्मळून पडला आहे ....व इकडे आपला घरातील प्रमुख हि अकालीच आपल्यातून निघून गेला आहे ....तर त्या वट वृक्ष्यावर अवलंबून असणाऱ्या जीव सृष्टीचे काय हाल होतील व इकडे आपला मुख्य करता पुरूषाच आपल्यातून निघून गेला तर घरातील सर्वांची कशी वाताहत लागेल ...?
बंधुनो , हा विचारच नको ...घरातील कर्त्या पुरुषाला उदंड आयुष्य लाभावे ...व नैसर्गिक जीव चक्र ज्या झाडावर अवलंबून आहे त्या वट वृक्षाचे हि संवर्धन होवो ....
...पूर्वी गावाची नवे कशी होती ...आंबेगाव , पिंपळगाव , वडगाव , चिंचवड , पिंपरी . तेम्बुर्णी, जाम्बळगाव , ..आता आहेत ...इंदिरा नगर , नेहरूनगर , राजीवनगर , गांधी नगर , ...काय हि नावे ?..
मित्र हो , बंधुनो ...जागे व्हा ....नैसर्गिक समतोल ढळू देऊ नका ...
झाडे लावा ...झाडे जगवा ...आपले व आपल्या येणाऱ्या पिढीचे आयुष्य सुसह्य करा......
आपल्याकडे जे सण साजरे केले जातात त्या पाठीमागे आपल्या पूर्वजांचा ठोस असा गहिरा अर्थ दडलेला असायचा ..सण हे प्रतीकात्मक रूप म्हणून साजरे करायला सुरुवात केली असावी , नव्हे नव्हे ते प्रतीकात्मकच होत ...आपल्याकडच्या भट्ट - ब्राह्मणांनी त्याचे दैवतीकरण करून अनेक रूढी आणि परंपरा निर्माण करून ठेवल्या आहेत ...आणि नटायला थाटायला मिळत म्हणून आपणही असल्या प्रथेला घट्ट चिटकून बसलो आहोत .आज पुरुषाच्या पुढेही व त्याच्या मागेही त्यांच्या सत्यवानाचा काय काय उद्धार करतात हे सांगायला नको ...आणि सत्यवान हि आता सत्यवादी राहिले नाहीत .असो त्या खोलात आपल्याला जायचे नाहीं ..आपण वट - सावित्री व्रत काय आहे हे समजून घेऊयात ....
हा जो वट म्हणजेच वड जो आहे त्याचे बीज मोहरी सारखे बारीक असते ..परंतु ते बीज वाढीला लागले कि त्याचा विशाल काय अशा मोठा वृक्ष होतो ..आता पर्यावरण च्या दृष्टीने व नैसर्गिक समतोल राखण्याच्या दृष्टीने हा वटवृक्ष कसा आपली भूमिका वाटावतो ते पहा ....हा वृक्ष सतत हिरवागार असतो ..तसेच ह्याची थंडगार सावली अनेक पांथिकाना क्षणभरासाठी आपला सर्व क्षीण व परिश्रम घालवण्यास मदत करतो. ह्या वडाच्या मुळांच्या खोपटात लांडगे , कोल्हे , खोकडे ह्या प्राण्यांची वस्ती असते ..खोलवर बिले पडलेली असतात ..शेजारीच लाल मुंग्या , काळे देण्गल्या मोठाल्या तोंडचे मुंगळे हे सतत वर खाली करत असतात ..खारुताई ची लगबग सतत खोडावरून फान्ध्यावर चाललेली असते..वडाच्या फांद्यावर माकडे मुक्तपणे उच्छांद मांडत असतात ..ह्या झाडावर बहुतेक पक्षांची घरटी पाहायला मिळतील . चिमण्या , कावळे , घुबड इत्यादी हर तर्हेचे पक्षी व त्यांचा तो मंजुळ स्वर कधी कधी साळून्क्यांची एकचं घाई ....झाडाच्या शेंड्यावर गरुड , गिधाडे ह्यांचे डेरे....अशातच कधी झाडावर एखादा सर्पराज दिसला कि पक्षांची होणारी धांदल व साळून्क्याचा होणारा कलkalat ...सुतार पक्षाचे फांदीच्या खोपीतून अलगद बाहेत येणे ...मधीच सळसळनारी पाने...मध्येच होणारा कोलाहल ..मध्येच दाटणारी निरव शांतता ...मध्येच वरून एखादे टपकन खाली पडलेले पक्षाचे पिल्लू ..व त्याची अस्तित्व साठी चाललेली धडपड ...अशातच कुणीतरी बेसावध पने त्यावर घातलेली झडप ......
......अशा एक ना अनेक घटनांचा , प्रसंगाचा हा एकमेव साक्षीदार म्हणजेच वटवृक्ष ..ज्या वृक्षावर कित्येक किड्यांचे ,कित्येक प्राण्यांचे , कित्येक पक्ष्यांचे ,कित्येक भ्रमरांचे , कित्येक आलेल्या - गेलेल्यांचे आयुष्य आवलंबून असते ...ह्या झाडावर पूर्ण चैतन्यच अवतरलेले दिसते ..संपूर्ण प्राणी मात्रांची वस्तीच तिथे नांदत असते ....बरे ह्या वड वृक्षाचे आयुष्यही शेकडो वर्षांचे असते ...म्हणजेच त्या वट वृक्षाने तेथील प्राणी - पक्षांच्या कित्येक पिढ्या पाहिल्या असतील ..कमीत कमी सात पिढ्या तरी नक्कीच ...हो ना ?
अशा ह्या वड वृक्षाच माणसालाही खूप उपयोग आहे ..ह्या वृक्षाच्या छायेत जी झोप लागते ती नक्कीच फोम च्या गादीत येणार नाहीं ...ह्यांच्या पारंब्या ना लटकून मस्त उंच च्या उंच झोके घेत| येतात ..ह्याच्या लाकडाचा जळणासाठी , घरगुती वापरासाठी उपयोग होतो ...अशा प्रकारे हा वृक्ष सर्वच जीव मात्रासाठी जगण्याचे वस्ती स्थान आहे ...खास करून जंगलातील ह्याचे अस्तित्व हेच अधिरेखीत करते ...
...एवढे असूनही हा वृक्ष स्थितप्रज्ञ सारखा असतो ...सर्व साक्षी असतो ...तरीही खंबीर पने उभा ....सर्वाना उपयोगी पाडण्यासाठी सदैव तत्पर .
....चला आता आपल्या सत्यवान - सावित्री कडे येउयात ...आजच्या काळी स्त्री व पुरुष दोघेही कमावतात व स्वताचा संसार चालवतात ...पूर्वीच्या काळी असे नव्हते ..तेंव्हा ती जबाबदारी पूर्ण पुरुषाचीच असायची ....त्या मूळे पुरुषाचे असणे ( जिवंत ) हे खूप महत्वाचे असायचे .व त्या काळी गाई व बाई हि नेहमी संरक्षणात असायची ...मोकळी गाय व मोकळी बाई दिसली कि कुणीही तिला आपली म्हणून घेऊन जायचे ...अशा अवस्थेत घरात अवलंबून असणार्यांची पूर्ण जबाबदारी हि कुटुंब प्रमुखावर असायची ..घरातील वयस्कर व्यक्ती , लहान मूले , तरुण स्त्रिया ..ह्यांचे कर्ता पुरुष गेल्यावर काय हाल होतील ...ह्या साठी ....त्या कर्त्या पुरुषाला खूप आयुष्य मिळावे व आपले संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहावे हा मूळ स्वार्थ असायचा ( कुणी ह्याला त्याग हि म्हणा हवे तर )...व असे केल्या मूळे आपली मुले, नातवंडे पर्यायाने संपूर्ण वंशच सुरक्षित राहील ...हा विचार त्या मागे असावा ...
....आता बंधुनो असा विचार करा कि ....तो वट वृक्ष कोसळला आहे , उन्मळून पडला आहे ....व इकडे आपला घरातील प्रमुख हि अकालीच आपल्यातून निघून गेला आहे ....तर त्या वट वृक्ष्यावर अवलंबून असणाऱ्या जीव सृष्टीचे काय हाल होतील व इकडे आपला मुख्य करता पुरूषाच आपल्यातून निघून गेला तर घरातील सर्वांची कशी वाताहत लागेल ...?
बंधुनो , हा विचारच नको ...घरातील कर्त्या पुरुषाला उदंड आयुष्य लाभावे ...व नैसर्गिक जीव चक्र ज्या झाडावर अवलंबून आहे त्या वट वृक्षाचे हि संवर्धन होवो ....
...पूर्वी गावाची नवे कशी होती ...आंबेगाव , पिंपळगाव , वडगाव , चिंचवड , पिंपरी . तेम्बुर्णी, जाम्बळगाव , ..आता आहेत ...इंदिरा नगर , नेहरूनगर , राजीवनगर , गांधी नगर , ...काय हि नावे ?..
मित्र हो , बंधुनो ...जागे व्हा ....नैसर्गिक समतोल ढळू देऊ नका ...
झाडे लावा ...झाडे जगवा ...आपले व आपल्या येणाऱ्या पिढीचे आयुष्य सुसह्य करा......
जाता जात नाही , तिचे नाव " जात " . . . . .जाती साठी माती खायाला लावते , तिचे नाव " जात "
जाता जात नाही , तिचे नाव " जात "
जाती साठी माती खायाला लावते , तिचे नाव " जात "
जाईल तिथे अब्रू घालवते , तिचे नाव " जात "
अंगी भलता ताठा भरवते , तिचे नाव " जात "
जिच्या मुळे माणसे विभागली गेली , तिचे नाव " जात "
राख- रांगोळी होते , तरीही प्यारी असते ती " जात "
शरीराची माती होते , तरी फोटोलाही चिकटते हि " जात "
या " जातीच्या " अंतासाठी लढले , त्यांची झाली " राख " . . .
सर्वांनाच पुरून दशांगुळे उरली तिचेच नाव हे " जात "
गोचीडावाणी चिकटून बसली , अहंकाराला धरून राहिली
वृथा अभिमानाला सोकावली , अशी कैदाशीण हि " जात "
११: ०० - - - - - - ११ / ०६ / २०१४ - - - - - बुधवार
भारताचा रंग हा तिरंगाच असावा . . . त्यापुढे ना दुसरा धर्म रंग उरावा
एक जण म्हणाला . . .
आम्ही हिंदू - मुस्लिम आणि दलित यांना एकत्रित करणार आहोत . .
कसे शक्य आहे जातीय राजकारणात हे ?
भगवा , हिरवा व निळा एकत्र कसे नांदू शकतील ?
सगळ्यांच्या विचारधारा भिन्न , कार्यपद्धती भिन्न , आक्रमकता भिन्न
प्रत्येकाला आपल्या रंगाचा देश हवाय . . .
भगवा , भारत " भगवामय " करू पाहतोय ,
हिरव्याला , " हिरवा हिंदुस्थान " हवाय . . .
निळया ला , निळा " बुद्धकालीन भारत " हवाय ,
पांढरा बोलतो कमी पण , त्याला " धर्म-निरपेक्ष इंडिया " हवाय . .
तेवढ्यात त्याचे हि " साधते "
बाकी रंगा ना इथे विचारतो कोण ?
गडद रंगानी त्यांचे अस्तित्व डाग लागलेल्या ठिपक्या सारखे करून टाकलेले आहे . .
आम्हाला " हरा भरा " भारत नको आहे ,
ज्याला त्याला आपलाच झेंडा रोवलेला हवाय . . .
प्रत्येक पक्षाच्या झेंड्यावर जातीय रंग दिसतातच . . .
नवीन पक्षाची तर ती अगतिकता असते ,
स्वताचे अस्तित्व निर्माण करण्याचे ते " साधन " असते . . .
आपला रंग , आपला धर्म आपण पाळावा ,. . .
तो दुसऱ्यावर का म्हणून थोपवावा ?
आपल्या रंगाचे , आपल्या धर्माचे महत्व आपण वाढवावे . . .
दुसऱ्याचा जीव का घ्यावा ?
आपला रंग , आपला धर्म , आपला महात्मा आपला म्हणावा व जपावा . . .
त्याला दुसऱ्या धर्मावर का लादावा ?
भारताचा रंग हा तिरंगाच असावा . . . त्यापुढे ना दुसरा धर्म रंग उरावा
धर्मा -आधी हा देश असावा ,
देशासाठी सांडणाऱ्या रक्ताचा रंग " लाल च " असावा . . .
६ : १२ - - - -- - - - - ११ / ६ / २०१४ - - - -- - - बुधवार
Tuesday, June 10, 2014
सरीवर सरी बरसाव्या , . . . . दाट कोंदाटून यावे . . .
सरीवर सरी बरसाव्या
दाट कोंदाटून यावे . . .
विजांचा कडकडाट व्हावा . . .
ढगांचा गडगडाट व्हावा . . .
रस्ताही निर्मनुष्य व्हावा . . .
अंगावर झेलत सरी . . .
अन मनात तुझ्या आठवणी . . .
मुक्त वाहू द्यावे वाटे अश्रूंनाहि . .
एक एक पाऊल . . .
एक एक आठवण
विसरून सर्व काही . . .
विसरून सर्व काही . . . .
९ : ५३ - - - - - -- १० / ६ / २०१४ - - - - - - मंगळवार
Subscribe to:
Posts (Atom)