Friday, June 13, 2014

अर्जुनाला " अवदसा " सुचली . . . . . . म्हणाला कृष्णाला , रथ घे दोन्ही सैन्याच्या मध्यभागी



अर्जुनाला " अवदसा " सुचली 

म्हणाला कृष्णाला , रथ घे दोन्ही सैन्याच्या मध्यभागी 

खांदे गाळले , गांडीव गळाले , घुडगे टेकले 

पाहता आप्तेष्ट , भाऊबंद , पाहुणे पाठी - पुढे 

लागला विचार करू , युध्द मी कशासाठी करू ?

कृष्ण मुसद्धी भारी ,केली त्याने गीता तिथे सुरु 

दाविले विश्वरूप , कोण तू अन कोण मी अन कोण तुझे भाऊबंद 

मन हा अर्जुन , कृष्ण तो अंतरंग , करी विषयांचे परिमार्जन 

जीवन म्हणजे नव्हे योगायोग , चाले ते " कर्म - सिद्धांतावर " 

साद घालूनी मनाला , आवर घालावा विषय वासनेला 

अनुहात ध्वनी , अंतर्मनाचा नाद , एकाग्र ते चित्त 

मुख्य ती मनशांती , दुय्यम ते सुख , सुखात असे दुखं 

नर जन्माचे सार  , घ्यावा हाच " अंतर्वेध " 

८ : ३ ३ - - - - - - - १३ / ०६  / २०१४ - - - - - -  शुक्रवार 

No comments:

Post a Comment