Wednesday, June 11, 2014

भारताचा रंग हा तिरंगाच असावा . . . त्यापुढे ना दुसरा धर्म रंग उरावा



एक जण  म्हणाला . . .  

आम्ही हिंदू - मुस्लिम आणि दलित यांना एकत्रित करणार आहोत . . 

कसे शक्य आहे जातीय राजकारणात हे ? 


भगवा , हिरवा व निळा  एकत्र कसे नांदू शकतील ?

सगळ्यांच्या विचारधारा भिन्न , कार्यपद्धती भिन्न , आक्रमकता भिन्न 

प्रत्येकाला आपल्या रंगाचा देश  हवाय . . . 


भगवा , भारत " भगवामय " करू पाहतोय , 

हिरव्याला , " हिरवा हिंदुस्थान  " हवाय . . . 

निळया ला , निळा  " बुद्धकालीन भारत " हवाय , 

पांढरा  बोलतो कमी पण , त्याला " धर्म-निरपेक्ष  इंडिया " हवाय . . 

 तेवढ्यात त्याचे हि " साधते " 


बाकी रंगा ना  इथे विचारतो कोण ? 

गडद रंगानी त्यांचे अस्तित्व डाग लागलेल्या ठिपक्या सारखे करून टाकलेले आहे . . 

आम्हाला " हरा भरा " भारत नको आहे , 

ज्याला त्याला आपलाच झेंडा रोवलेला हवाय . . . 


प्रत्येक पक्षाच्या झेंड्यावर जातीय रंग दिसतातच . . . 

नवीन पक्षाची तर ती अगतिकता असते , 

स्वताचे अस्तित्व निर्माण करण्याचे ते " साधन " असते . . . 


आपला रंग , आपला धर्म आपण पाळावा ,. . . 

तो दुसऱ्यावर  का म्हणून थोपवावा ? 

आपल्या रंगाचे , आपल्या धर्माचे महत्व आपण वाढवावे . . . 

दुसऱ्याचा  जीव का घ्यावा ? 

आपला रंग , आपला धर्म , आपला महात्मा आपला म्हणावा व जपावा . . . 

त्याला दुसऱ्या धर्मावर  का लादावा ? 


भारताचा रंग हा तिरंगाच असावा . . .  त्यापुढे ना दुसरा  धर्म रंग उरावा 

धर्मा -आधी हा देश असावा , 

देशासाठी सांडणाऱ्या रक्ताचा रंग " लाल च " असावा . . . 


६ : १२ - - - --  - - - -  ११ / ६ / २०१४  - - - -- - - बुधवार 

No comments:

Post a Comment