ना " जय हिंद " म्हणूशी वाटत . . . ना " जय महाराष्ट्र " म्हनुशी वाटत
ना " छत्रपतींचा " जयजयकार करुशी वाटत . . . ना आंबेडकरांना " जय भीम " बोलुशी वाटत . . .
काही मंडळीनीच त्यावर मालकी मिळवल्या सारखे वाटत आहे , . .
मोठ्या महा-पुरुषांना खुजेपणा आणला आहे काही लोकांनी
लुटायला देश सोडला नाही कि जात सोडली नाही
बलत्कार करायला अबला सोडली नाही कि बाहुलीशी खेळणारी मुलगी सोडली नाही
प्रत्येक धर्म आता शिव्यांचा कोठार झाला आहे . . .
तो ह्याला अन हा त्याला " खिंडीत " पकडू पाहत आहे
विद्वेष पसरवणारी नवीन तंत्रे अन माध्यमे निर्माण झाली आहेत . .
राजकारण आता प्राणाशी , जीवाशी खेळले जातंय . . .
माशाला पकडायला आकडा टाकताना ज्या सहजतेने गांडूळाचा धारदार टोकाला लावले जाते
त्याच सहजतेने गरिबाला मरण्यासाठी पुढे केले जात आहे
कधी कधी हा देश फक्त काहींचाच वाटतो . . .
कारण " काहीच " इथे सत्ता गाजवत आहेत ,
आपल्याच वैभवात , आपल्या मस्तीत , दिखाव्यात , राहत आहेत . . .
आम्ही केवळ भरडली गेलेली , भरडण्यासाठी असलेली प्रजा . . .
आमच्या देशाभिमानाला कसली आली आहे किमत , अन कसला आलाय गौरव ?
९ / ६ / २०१४ - - - - - १२ : ५३ Pm . . . , , , सोमवार
No comments:
Post a Comment