Sunday, January 19, 2014




नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज रोजी ५ महिने पूर्ण होत आहेत .

सरकार अजून हि त्या बाबत उदासीन कसे काय ?

शासन कर्त्यांचा व या षड्यंत्रात सामील असलेल्यांचा जाहीर निषेध

आज चा दिवस " काळा  दिवस " समजून सरकारला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचा हा एक प्रयत्न . 
पुणे शहरात बुरखाधारी लोकांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे ...पूर्वी ठराविक भागात व ठराविक ठिकाणीच हे लोक दृष्टीस पडत असत ...आज काल पुणे शहरात व उप नगरात ह्यांची मोहल्ले वसलेले आहेत ...काही ठिकाणी संपूर्ण लोकवस्तीच ह्यांचीच झालेली आहे ..

.आपले सच्चे मुस्लीम बंधू आपल्या परिचयाचे असतात ...आजकाल खूप नवीन चेहरे दिसत आहेत .

..माननीय बाळासाहेब ठाकरे गेल्या २० / २५ वर्षापासून एकच सांगत आहेत ....बांगला देशीय लोकांना हाकला , अराजक माजेल ..परंतु सरकारला व काही देशद्रोही मंडळीना आपली वोट bank प्यारी आहे ....पुण्यात सध्या जे चालू आहे ते योग्य नक्कीच नाहीं ....पुण्यातून शिक्षणासाठी आलेल्या विध्यार्ध्याना पुणे सोडून जावे लागणे हे पुण्याला शोभनीय नक्कीच नाहीं ..

आपल्या अवती भोवती संशयित लोक जर नजरेस आली तर ताबडतोब त्याला हटका ...संबधितांना कळवा ...होऊ शकते एखादी वाईट घटना टळू हि शकेल

....पुण्यातील वातावरण दुषित होऊ नये हि प्रत्येकाचीच जबाबदारी आहे ....नको त्या अफवा वर विश्वास ठेवू नका व अफवांना फसू नका ......

बांगला देशीय व अन्य विध्वंसक वृत्तीच्या लोकांचे मनसुबे काही ठीक दिसत नाहीत ....त्यामुळे सावधानता बाळगा ...ह्यातच सर्वांचे हित आहे ...

कांग्रेस पक्ष व राष्ट्रवादी तिल आपल्या वडार समाजाच्या तथागतीत नेत्यानो




August 22, 2012

कांग्रेस पक्ष व राष्ट्रवादी तिल आपल्या वडार समाजाच्या तथागतीत नेत्यानो ...आपण ह्या पक्ष्यात फक्त " चादरीच " उचलण्याच्या लायकीचे आहात ....बघा ह्यांनी आपला तुटपुंजा निधी सुद्धा पळवला .....आपल्या वडार समाजाची एवढी दयनीय अवस्था आहे व त्या साठी फक्त १० कोटीचा निधी ह्यांनी दिला ( तो हि भटक्या - विमुक्त साठींचा )...तो हि दुसरीकडे वळवला ....वडार समाजातील सुज्ञ लोकांनी आता , कॉंग्रेस व राष्ट्रवादी ह्या पक्षांना मतदान करू नये व ह्या पक्ष्यात जे आपले नेते मंडळी आहेत त्यानाही किमत देवू नये ....हि मंडळी सरकार मध्ये राहून आपल्या वडार समाजासाठी काहीच करत नसतील तर त्यांचा समाजाला काहीच उपयोग नाहीं ....जो समाजासाठी झटतोय , राबतोय त्यांच्याच पाठीमागे समाजाने राहावे ...स्वताचा स्वार्थ पाहणाऱ्या व गडगंज झालेल्यांनी किती " थुंकी चाटायची " ह्याचा जरूर विचार करावा ...कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील वडार समाजातील नेत्यांनी वेळीच " वडार समाज बांधवांचा व वडार समाज हिताचा विचार करायला सुरुवात करावी "....व सरकारकडून व आपल्या "आवडत्या जाणत्या नेत्याकडून " योग्य तो निधी वडार समाजासाठी उपलब्ध करून द्यावा ....अन्यथा तुम्हाला (वडार बांधवात ) काही भवितव्य राहणार नाहीं ....

जय बजरंग ....जय वडार
श्री भूपेंद्र कुसाळे साहेब ( worked at Irrigation Department (Engineer at Irrigation Department)Studied at Hislop College, NagpurLives in Amravati )...ह्यांचा आज वाढदिवस आहे ...एक अष्टपैलू व्यक्तिमत्व , पेशाने engineer , लेखक , मनस्वी कवी , वर्तमान पत्रातून सतत लेखन , सर्व धर्माचा सखोल अभ्यास व त्यातून निर्माण झालेले अभ्यासपूर्ण मते .,..सतत मित्र - मंडळी मध्ये रमणारे , आपल्या कामावर विश्वास ठेवणारे ...ह्यांना आम्ही आमचे मोठे दादा म्हणतो ...खरे तर ह्यांच्या बद्दल मलाही जास्त माहिती नाहीं ...जेवढी जुजबी माहिती आहे त्या आधारेच पुढे चालतो ....

खरे तर फेसबुक वर आपल्या बांधवा पैकी सर्व तरुण मंडळीच दिसतात ..१५ ते २५ ह्या वयोगटातील जास्त मित्र आहेत ..२५ ते ३५ च्या दरम्यानची निवडक लोक आहेत ....३५ च्या पुढील तर तुरळक मध्येच मोडतात...त्यातीलही बोलतात किती हा संशोधनाचाच विषय आहे ....खरे तर ३५/४० च्या पुढील लोक हि अनुभव संपन्न लोक असतात ...त्यांनी आपले अनुभव share करावीत अशी अपेक्षा असते ..परंतु technology मुळे बरेचशे फेसबुक / tweeter च्या फंदात पडत नाहीत ...जे पडलेत त्यातील बरेचसे आहारी गेलेली आहेत ...ह्या सोशल साईट चा समाजसाठी उपयोग करता आला पाहिजे ... हे एवढे सांगायचे कारण असे कि , श्री भूपेंद्र कुसाळे साहेब हे एक आपले जेष्ठ समाज बांधव आहेत व आपल्या अभ्यासपूर्ण व विचारपूर्वक काढलेल्या निष्कर्षाने आपल्या स्तंभ लेख लिहून समाजात चांगली जागृती निर्माण करत आहेत ...चालू घडामोडीवर आपली मते व्यक्त करत असतात ...अंधश्रद्धा व चुकीच्या गोष्टीवर कडक ताशेरे ओढत असतात .

अशा ह्या अनुभव संपन्न व्यक्तिमत्वाचा आपल्या समाज बांधवानी विशेष आदर करून आपल्या मित्र वर्गात समावेश करून घेतला पाहिजे ...

साहेबांची ओळख आपण सर्वांशी करून द्यायची होती पण हा योग आज त्यांच्या वाढदिवस निमित्त आला आहे ...साहेब , आपल्याला वाढदिवसाच्या खुप खुप मनापासून शुभेच्छा .....आपण आयुष्यात बरेचसे टप्पे यशस्वी पणे पार केलेले आहेत ...आपले आताही चिंतन , मनन व लेखन चाललेले आहे ...आपले पुढील आयुष्य समाधानात व शारीरिक तंदुरुस्तीचे व हर्ष -उल्हासात जावो ...

साहेब ,आम्ही आज आपल्याला फक्त शुभेच्छा देवू शकतो कुठले गिफ्ट नाहीं ...परंतु आम्हाला आपल्याकडून return गिफ्ट हवे आहे ....आज आपल्या वडार समाजातील खूप तरुणाई फेसबुक वर एकवटत आहे ...त्या व इतर माध्यमातून आपण त्यांनाच नाहीं तर आम्हाला सुद्धा मार्गदर्शन करावे ..ह्या अगोदर आम्ही पैशाने लादलेले नेतृत्व व त्या पैशाने त्यांना आलेली " वाढीव " बुद्धी व तिचे अविष्कार पाहिलेले आहेत ...आपल्या समाजाला सु-संस्कृत , सुशिक्षित , समतोल , तत्वनिष्ट व स्वाभिमानी नेतृत्व असावे ...असे नेतृत्व आपल्या वडार समाजात निर्माण व्हावे ह्यासाठी आपण योगदान ध्यावे अशी ह्या आपल्या लहान भावाची मनीषा आहे ...

पैशाने मोठेपणा मिरवणारी आम्ही अनेक पहिले आहेत परंतु उच्च शिक्षण घेवून तिथे आपले कर्तृत्व सिद्ध करून , आपल्या ज्ञानाने व बुद्धीने समाजमनात आपण विशिष्ट असे स्थान निर्माण केले आहे म्हणूनच आपल्या बद्दल आम्हाला अतीव आदर आहे ....

पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा व आपला आजचा दिवस आपल्या कुटुंबीय सोबत , आपल्या मित्र-मंडळी सोबत मौज मस्तीत जावो ...

जय बजरंग ......जय वडार





छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो !!!

( शिवाजी महाराज म्हटले की लगेच आपण " जय भवानी ...जय शिवाजी " अशी प्रेरणादायी घोषणा द्यायला सुरुवात करतो ...परन्तु आपण अनवधानाने हे विसरतो की आपण " भवानी मातेचा " पण व " शिवाजी महाराज ह्यांचा " सुद्धा नकळत एकेरी उल्लेख करतो ....लहान मुले , दारू पिवून तर्राट झालेले , हातात चाकू -सुरे असलेली , वयस्कर मन्डळी सुद्धा जोश मध्ये आले कि अशाच घोषणा देतात ...एव्हाना , आता ती रीत किंव्हा प्रथाच झाली आहे असे वाटते ....

परंतु सुज्ञ लोकांनी असा प्रमाध आपल्या हातून होऊ देवू नये ....

महाराजांचा एकेरी उल्लेख कुठेही होऊ नये ह्याची सर्वानीच काळजी घ्यायला हवी ..

होऊ शकते स्वराज्याची प्रतिज्ञा करते वेळी शिवाजी महाराजांच्या बाल - मावळ्यांनी उत्स्पुर्त पणे अशा घोषणा दिल्या असतील व त्या पुढे ते देत राहिले असतील ....स्वराज्य स्थापनेतील त्या मावळ्यांचा कदाचित तो अधिकार हि असेल ...

परंतु म्हणून महाराजांना एकेरी बोलण्याचा अधिकार कुणीही आपल्याकडे घेवू नये ....
जो तसा अधिकार घेतो तो मूर्खच म्हणावा ...

( तथाकथित इतिहास तज्ञानो ...कृपया मला माफ करा.....मी चुकण्याची शक्यता नाकारता येत नाहीं .....
( तुमच्या दृष्टीने ...माझ्या दृष्टीने मी बरोर्बर आहे ) ...

आम्हा बहुजनासाठी शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य आणण्याचा प्रयत्न केला ...

म्हणून शिवाजी महाराजासाठी आम्ही कुठेही , कसेही , कशासाठी सुद्धा रक्त सांडायला तयार आहोत ...........

..जय शिवराय ......जय माता जिजाऊ !!!





अडथळे किंवा विघ्ने तुम्हाला थोपवू शकत नाहीत .....

अडचणी हि तुम्हाला बाधा आणू शकत नाहीत .....

सर्वात महत्वाचे म्हणजे ...

...कुणी तुम्हाला तुमच्या निर्णया पासून परावृत्त करू शकत नाहीत ....

प्रयत्न करण्या पासून तुम्हाला जर कोण रोखू शकत असेल तर ते .....

"...फक्त तुम्ही स्वत : च आहात " ...
श्री सुधीर पवार ...." मी वडार महाराष्ट्राचा " ह्या संघटनेतील सर्वात महत्वाचे नाव ....सरकारी नोकरी सांभाळून वडार समाज सुधारणे साठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरु असतात ...

गावो-गावीच्या बैठका , जेष्ठ वडार बांधवांचे सल्ले घेणे , व ह्यातून आपली " मी वडार महाराष्ट्राचा " हि संघटना कशी नवा रुपाला येईल हे पाहणे ..आणि मी जर एवढेच म्हणून थांबलो तर त्यांच्यावर अन्याय होईल ....त्यांचे व त्यांच्या मंत्रालय मित्र परिवाराचे सर्व प्रयत्न हे सर्व वडार बांधवांचे भल्यासाठी चाललेले आहेत ...श्री सुधीर पवार साहेबांचे नाव घ्यायचे व मंत्रालय मित्र मंडळींचा उल्लेख नाहीं असे होणार नाहीं ....

आपल्या वडार समाजाला " मंत्रालय टीम " हि एक भेटच आहे ...हे आपले बांधव शासकीय पातळीवरून आपल्यासाठी खास असे प्रयत्न करत आहेत ...

श्री सुधीर पवार व मंत्रालय टीमच्या प्रयत्नांना निच्शितच चांगले परिणाम दिसून येत आहेत , कधी नव्हे तो आपला समाज आता एकवटू लागलेला आहे ...चांगले शिकलेले तरुण वर्ग आपल्या वडार समाजाच्या नावाखाली " जय बजरंग ....जय वडार " अशी गर्जना करू लागला आहे ...तरुणांना आशेचा किरण दिसू लागलेला आहे तसेच आपली भोळे - भाबडे गरीब बांधव परिवर्तनाची आशा बाळगून आहेत ...श्री सुधीर पवार साहेब , आपल्या प्रयत्नांना आम्हा वडार बांधवांचा नेहमीच पाठिंबा राहील ......ह्यात काही किंतु नाहीं वा परंतु हि नाहीं ...

श्री विजय धनवडे ह्यांच्या पोस्टवर आपला " सच्च्या वडार बांधव " असा उल्लेख्ख वाचला ..वाचून मलाच खजील झाल्यासारखे झाले ..पवार साहेब तुमच्या बद्दल मी पूर्वीच लिहिणार होतो ..परंतु ते आता पर्यंत जमलेच नव्हते ...आमच्या म्हणण्याला व बोलण्याला काही किमत नाहीं परंतु श्री विजय धनवडे साहेब म्हणतात त्याप्रमाणे आपणच सच्चे वडार बांधव आहात .....व आपण अशाच सच्च्या वडार बांधवांची एक फळीच निर्माण करावी हीच आपल्या कडून अपेक्षा ....

श्री सुधीर पवार साहेब , मला माहित आहे मी तुमचा गुनेह्गार आहे ...तुम्ही माझ्याकडे काही विचारणा केली होतीत परंतु मी ती पूर्ण करू शकलो नाहीं ...ह्या बाबतीत मी तुमचाच नाहीं बर्याच जणांचा दोषी आहे ...परंतु भविष्यात प्रत्यक्ष भेटीचा योग नक्कीच येईल ...

श्री विजय धनवडे ह्यांचे आभार ,त्यांच्यामुळे वरील सर्व लिहिले ...आपल्या सर्वांचे एकाच लक्ष्य आहे ...ते म्हणजे फक्त आणी फक्त " वडार समाज हित " ...सुसंस्कृत , सुशिक्षित , संघटीत , निर्व्यसनी व भविष्याचा वेध घेणारा , दूखात व कष्टात न राहता ...सूखा - समाधानात राहणारा " आधुनिक वडार समाज " निर्माण झाला पाहिजे ......आणि hich सर्व वडार बांधवांची इच्छा आहे ....

जय बजरंग .......जय वडार
 






३ सप्टेंबर २०१२ 

श्री विजय साहेब चौगुले ह्यांचे ऐरोली , नवी मुंबई हे कार्य-क्षेत्र आहे व ते शिवसेनेचे आघाडीचे नेते आहेत त्यामुळे त्यांनी तिथे शाळा सुरु किली असेल तर विशेष काहीच नाहीं ....प्रत्येक राजकीय नेता तसे करतच असतो ...पैकी बर्याच राजकीय नेत्यांच्या शिक्षण संस्था असतातच .....माझी विजय साहेब चौगुलेना व " मी वडार महाराष्ट्राचा " ह्या संघटनेला अशी आग्रहाची विनंती आहे कि , पुणे , मुंबई , नाशिक , औरंगाबाद , नागपूर , सोलापूर , कोल्हापूर किंवा अन्य जिल्ह्याच्या जागी ...आपल्या वडार समाजाच्या विध्यार्थ्यान साठी " वसतिगृह " व जे खाणीवर काम करतात , फिरते जीवन अजूनही जगतात, मजुरी करतात अशांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय करून द्यावीत .....आपल्यासाठी हे काही अवघड गोष्ट नाहीं ...

आपल्याला बाकी वडार बांधव नक्कीच ह्या कार्यात साथ देतील .......

तो दिवस लवकर येवो ज्या दिवशी आपली खेडे गावातील गरजू मुले शहरात येवून त्यांना योग्य त्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होवो व जे वडार बांधव अजूनही मोल - मजुरी करून दिवस काढतात ...त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या सर्व वडार बांधवांचा हातभार लागो ....

जी कुचंबना आमच्या पिढीची झाली ....तशी येणाऱ्या पिढीची न होवो
जय बजरंग .........................जय वडार

आपल्या फेसबुक वरील सर्व वडार बांधवाना सांगण्यात अत्यंत दुख होत आहे कि , आपल्या फ्रेंड लिस्ट मधील सर्वात जेष्ठ , वयोवृद्ध व asistant इंजिनिअर म्हणून सरकारी खात्यातून निवृत्त झालेले श्री नागेश kalkutgi ह्यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने काल निधन झाले आहे ...

सांत्वना करण्या शिवाय पर्याय नाहीं ...त्यांच्या कुटुंबियांना , ह्या अवघड प्रसंगी सावरून घेण्याचे बळ मिळो ...त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळो .....

औपचारिकतेचा भाग नाहीं परंतु..... नागेश साहेब kalkutagi ह्यांचा व आमचा परिचय हा फक्त फेसबुक वरच होता....परंतु बंधुनो ,उतार वयामध्ये त्यांना वडार समाज व वडार समाज बांधवा बद्दल खूपच तळमळ व्यक्त होत होती ....आपल्या वडार समाजाच्या १७ मार्च च्या विजय साहेब चौगुले ह्यंच्या नेतृत्वा खालील मोर्चा साठी ह्यांनी आपल्या ३ बंधुंना व अजून घरातील दोन / तीन व्यक्तींना पाठवले होते . स्वत : प्रकृती अस्वस्थ्य मुळे येवू शकले नव्हते ...परंतु ते सतत मोर्च्याच्या update कde लक्ष्य देवून होते ...त्यावेळी आमचा त्यांच्याशी संवाद झाला होता व त्यानंतर अधून-मधून संवाद सुरूच असे ....आता ५ तारखेला त्यांना आम्ही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या ....त्या अगोदरची साहेबांची एक comment एक आठवण म्हणू सर्वांशी share करत आहे ...कुणीतरी अशीच comment केली होती कि तुम्ही " जय बजरंग ....जय वडार " असे का म्हणता ?...साहेबांचा उलट उत्तर देण्याचा स्वभाव नसावा परंतु त्यांनी बाणेदार उत्तर दिले होते ....ते म्हणाले " एवढे वर्षे आमच्या वडार समाजाचा राजकीय लोकांनी व एकूणच समाजाने फक्त वापर करून घेतला आहे व समाज अजूनही दुर्लक्षित राहिलेला आहे ...नवी तरुण पिढी आपली अस्मिता जागवण्यासाठी जर , " जय बजरंग जय वडार " अशी साद घालत असेल तर बिघडले कुटे ?" .

वरील शब्द आमच्या अजूनही कानात गुंजारव करत आहेत ...व करत राहतील ...त्यांच्या बद्दल व त्यांच्या कार्य बद्दल मी जास्त बोलू शकत नाहीं परंतु ...वैयक्तिक मला त्यांचा नेहमी पाठिंबा असायचा ...ते तरुणानाही प्रोत्साहित करत असत ...

मरणाच्या वाटेवरूनच सर्वाना मार्गक्रमण करायचे असते ..आम्ही हि इच्छित स्थळाचे जवळ जवळ पोहचत चाललो आहोत ....जेन्वा मन सैरभैर होते , सर्व बाजूनी अंधारून येते ,,,अशा वेळी खर्या वाटाड्याची ( मार्गदर्शक ) गरज भासते ...वडार समाज नुकताच कात टाकायला लागला आहे ,श्री नागेश साहेब kalkutgi ह्यांच्या जाण्याने आपण एक वडार समाजाचा सुशिक्षित , सुसंस्कृत " वाटाड्या " गमावला आहे ,

ह्याचे दुख तर आहेच परंतु आपल्या समाजातील इतर जेष्ठ , सुशिक्षित व समंजस वर्गाने ...हि " वाटाड्याची " भूमिका मरणाच्या क्षण पर्यंत निभवावी .....हीच खर्या अर्थाने श्री नागेश साहेब kalkutgi ह्यांना श्रद्धांजली असेल असे मला वाटते .....

मरणाच्या शेवट पर्यंत ज्यांनी " वडार समाजाचा विचार केला " ....मला वाटते ...श्री नागेश साहेब kalkutagi हेच सच्चे वडार बांधव होते......

अशा या वडार समाज नायकाला ......माझे लाख लाख प्रणाम !!! .....व ....त्यांना माझा शेवटचा ..." जय बजरंग .....जय वडार "

जय बजरंग .....जय वडार !!!!

एका वडार बांधवाला वर दिलेले हे उत्तर आहे .

काही मित्रांची  खूप दिवसाची इच्छा आहे सर्व फेसबुक मित्रांनी एकत्र यावे अशी ....परंतु....नेमके करायचे काय ? ...हा प्रश्न सर्वा समोरच आहे व तो सुटता सुटत नाहीं ..कारण तो सोपाही नाहीं ...

राज ठाकरे ह्यांनी " महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट " म्हणून एक कल्पना काढली होती( ती प्रत्यक्षात आली नाहीं ..हा भाग वेगळा ) ..त्या पद्धतीची आपल्या समाजातील गोर - गरिबांचे प्रश्न सुटतील अशी कुणाच्या डोक्यात काही कल्पना येत असेल तर ती कागदावर उतरवावी ...आपल्याला सरकारच्या भरवश्यावर बसण्याची सवय लागलेली आहे ...आपण अजूनही सरकार कडून अपेक्षा धरत बसलो तर हे समाज सुधारणेचे घोंगडे भिजलेलेच राहील ...समाज बांधव म्हणून आपलीही काही नैतिक जबाबदारी आहे म्हणून गोर - गरीब समाज बांधवासाठी आपला खिसा थोडा हलका करायची सवय सर्वानीच लावून घेतली पाहिजे ...पैशामुळे सर्व गोष्टी होतात असे नाहीं परंतु पैशामुळे अडत आहे हे हि सत्य आहे ...

आळशीपणा हे हि एक दारिद्र्याचे व गरीबीचे कारण असते , त्यावरही समाजाला काम करावे लागेल ...समाजाची क्रयशक्ती वाढवावी लागेल ....

पाणी मुरत मुरत गेले कि बराच काळ जमीन " ओल " धरून राहते ...अवकाळी पाऊसामुळे आलेल्या पुराचा लोंढा येऊन गेल्यावर पाठीमागे सुकलेले असते ...समाज हि बदलाला लगेच प्रतिसाद देत नसतो , हळूहळू परंतु ठोस प्रयत्न हवेत ...कृपया तुमच्या काही कल्पना असतील तर त्या मांडाव्यात ...

परंतु माझी सर्व वडार बांधवाना विनंती आहे ...सरकारच्या भरवश्यावर बसू नये व ते काहीतरी देतील अशी अपेक्षा धरू नये ( मिळेल तेंव्हा मिळेल ) ( gair-samaj karun ghenaryani ...gair-arth kadhu naye )

...त्या पेक्षा प्रत्येक जबाबदार व कमावत्या समाज बांधवाने गोर - गरिबांच्या हितासाठी थोडा थोडा भाग ( जसा जमेल तसा )आपणहून एक समाजाचे देणे म्हणून देण्यास सुरु करावे ..

हा उपक्रम जरी निस्वार्थ पणे सुरु राहिला तरी खूप मोठे काम होईल असे मला वाटते ..माझी हि कल्पना कुणाला आवडते का पहा ...त्यातील अडचणीवर विचार होऊ शकतो .....जय बजरंग ...जय वडार ..

( एका वडार बांधवाला वर दिलेले हे उत्तर आहे ..थोडे एडीट करून ..त्यातील काही मुद्दे पटल्या मुळे सर्वा समोर मांडत आहे ...विषयाचा संदर्भ लागणार नाहीं म्हणून मुद्दाम हा उल्लेख ....समझून व सांभाळून घ्या ...)
पोकळ अभिमान नको ...." समाजात " सहभाग हवा !!!

फुकटचे सल्ले नको ...." समाजासाठी " योगदान करा !!!

जय बजरंग ....जय वडार
 

स्वकर्तृत्वावर विश्वास असावा ....स्वमतावर ठाम असावे बुद्धी-चातुर्याचा उपयोग करावा ....अहंकार ना कधी धरावा

जय बजरंग .....जय वडार

स्वकर्तृत्वावर विश्वास असावा ....स्वमतावर ठाम असावे

बुद्धी-चातुर्याचा उपयोग करावा ....अहंकार ना कधी धरावा

हनुमान उडी तर अशी घ्यावी ......जगी त्याला तर तोड नसावी

जुन्या पुराण्या खुळचट कल्पना ....नकोत नुसत्या मिथ्या वल्गना


हनुमान , मारुती किंवा बजरंग ...परी तो असे एकची मारुत सुत

बुद्धी , शक्ती आणि ज्ञान ..... हे गुण तर त्याचे मर्मस्थान

आपणही सारे भक्त बजरंगाचे ...." आत्माराम " हि आपल्या ह्रदयी वसे

छाती काढू , पहाड फोडू ....परी बजरंगाचेच सदा गुणगान गाऊ

जय बजरंग ....जय वडार
 




साबरमती आश्रम में एक युवक आया और उसने गांधीजी को प्रणाम कर कहा , बापूजी , मै देश सेवा करना चाहता हूँ आप मेरे लायक कोई सेवा बताइए | मैंने काफी पढाई की है | अच्छी तरह अंग्रेजी जनता हूँ | मेरे रहन - सहन का स्टार भी बहुत ऊँचा है |

युवक को लगा के उसके ऐसा बताने से गांधीजी प्रभावित होंगे | गांधीजी युवक की बात सुनकर बोले , फ़िलहाल तो आश्रम के लोगों के भोजन के लिए गेहूं बीनने है , क्या आप इस काम  में मदद करेंगे ?

यह सुनकर युवक को थोड़ी निराशा हुई | उसे उम्मीद थी की उसे कोई महत्वपूर्ण काम मिलेगा |
 उसने बेमन से गेंहू बीनने शुरू कर दिए | 
वह जल्दी ही थक गया | थकावट से चूर युवक बोला , बापू अब आज्ञा दीजिये | दरअसल मै शाम का खाना जल्दी ही खा लेता हूँ | 
इस पर गांधीजी बोले , कोई बात नाही आज आप यही पर खाइए | आश्रम का भोजन तैयार होने ही वाला है |

युवक ने अश्रम का सदा भोजन बड़ी मुश्किल से अपने गले से उतरा |फिर औरों की तरह उसे अपने बर्तन भी स्वयं ही साफ करने पड़े |

जब वह जाने लगा तो गांधीजी उसके कंधे पर हाथ रखकर बोले , नौजवान , तुम्हारे अन्दर देश प्रेम की भावना होना अच्छी बात है , मगर इसके लिए मन भी निर्मल और स्वच्छ होना चाहिए | देश सेवा करने वाले व्यक्ति के मन में स्वयं को ऊँचा समजने के बजाय सबको एकसमान समजने की भावना होनी चाहिए | जो इन्सान मनुष्य के बिच फर्क नहीं करता |, वही सभी बन्धनों से ऊपर उठकर राष्ट्र की सेवा कर सकता है | 


युवक गाधी जी का अभिप्राय समजकर शर्मिंदा हो गया | उसने गांधीजी से माफ़ी माँगते हुए कहा ,

 आज से मै सच्चे मन से देश व व्यक्ति की सेवा करूँगा | गांधीजी ने उस युवक को गले लगाया |.......( सेवा -- संदीपन ह्या मासिकातून साभार )

गोष्ट संपली .....


moral of the stori सुरु..........ही गोष्ट खास आपल्या वडार समाज बांधवा साठी ...

जे समाज संघटने मध्ये काम करतात , करू इच्छितात ...जे करतात , त्यांच्यावर टीका टिपणी करतात , ज्यांना समाजासाठी काहीतरी करून दाखवायची उर्मी आहे अशाच्यांसाठी 
...जे स्टेज वर ऐन वेळी जागा अडवतात व खर्या कार्यकर्त्याला अडगळीत टाकून देतात ....

असले आयत्या बिळातले " नागोबा " आपल्या कडे खूप आहेत ....ती वृत्ती सुद्धा वाढत चाललेली आहे 

...कधीतरी खर्या कार्यकर्त्याला मोठेपण द्यायला शिका देवहो ....

कार्यकर्त्याचा " उपयोग किंवा वापरून घेण्याची " वृत्ती हि बरी नाहीं ...
आपला समाज ग्रामीण भागात व शहरात झोपडपट्टी असलेल्या भागात खूप वाईट अवस्थेतून जात आहे ...तिथे खरे कार्य करण्याची गरज आहे ..तेथील कार्यकर्त्यांना " सामर्थ्य / बळ " देण्याची गरज आहे ...

आपल्या वडार समाज बांधवा मध्ये नीतिमान , चारित्र्यवान कार्यकर्ते निर्माण व्हावेत ह्या साठी हा अल्पसा प्रयत्न ...

शेवटी एक म्हण सांगतो " जसा राजा , तशी प्रजा " ....जसा समाजाचा नेता , तसा समाज ...
नेता जर चारित्र्यवान , कर्तव्य दक्ष्य , कार्यकर्त्या प्रती संवेदन शील , समाजासाठी आदरणीय , वक्तशीर , व सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व गोष्टी ठरवून करणारा असला तर ....???????

.....तर काय हो ?????...कार्यकर्त्यांना हि हुरूप येतो ना !!!...

जय बजरंग ....जय वडार .....

लाचारीने पैशासाठी खाज सुटलेला ...असा हा हाथ




कधी अत्याचाराने रक्ताळलेला ...
कधी कोळशाने काळपटलेला ....
कधी भ्रष्टाचाराने बरबटलेला ....
कधी वासनेने वखवखलेला .....
कधी तडजोडीसाठी चटावलेला ....
कधी लाचारीने पैशासाठी खाज सुटलेला ...असा हा हाथ
 
| | गणपती अथर्वशीर्ष | |

ओम नमस्ते गणपतये | त्वमेव प्रत्यक्ष तत्वमसि | त्वमेव केवलं कर्तासी | त्वमेव केवलं धर्तासी | त्वमेव केवलं हर्तासी | त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्मासी | त्वं साक्षात आत्म्यासी नित्यम | | १ | |

हे ओंकार - रुपा गणपती देवा ( सर्व गणांचा ( जीवांचा ) अधिपती देवा ) , तुला नमस्कार असो .|..तूच प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मतत्व आहेस .| केवळ तूच सृष्टीचा निर्माता आहेस | . केवळ तूच सृष्टीचा पोशिंदा , तारक आहेस | .केवळ तूच सृष्टीचा संहारकर्ता आहेस .| ..संपूर्ण ब्रह्मांड व्यापून त्याला साक्षी हि तूच आहेस ,.| .प्रत्येक जिवामध्ये चैतन्य रूपाने आपले अस्तित्व दाखवणारा " आत्मा " हि तूच आहेत ....


र्तम (?) वच्मि | सत्यं वच्मि | | २ | |

मो योग्य तेच धर्म तत्व सांगत आहे . मी सत्य बोलत आहे .| | २ | |

अव त्वं माम | अव वक्तारम | अव श्रोतारम | अव दातारम | अव धातारम | अवनुचानम | अव शिष्यम | अव पश्च्यातात | अव पुरस्तात | अव उत्तरातात | अव दक्षिणातात | अव चोर्ध्वातात | अवधारातात | सर्वतो मा पाही पाही समंतात | | ३ | |

हे सर्व गणांचा अधिपती असणाऱ्या गणेशा , तू माझा सांभाळ कर .....तुझ्या रूपाचे , गुणांचे , बुद्धीचे , चातुर्याचे वर्णन करणाऱ्या " वक्त्याचे " रक्षण कर ......तुझे गुणगान अविरत पणे श्रवण करणाऱ्या तुझ्या भक्त गणांचे रक्षण कर .....जे ज्ञान दानाचे पुण्या कर्म करत आहेत , त्यांचे तू रक्षण कर .....जे ज्ञान घेवू इच्छितात त्या ज्ञान धारकांना तू सांभाळ ......जे शोधक वृतीने सृष्टीच्या रहस्याचा अभ्यास करतात त्या अभ्यासकांचा तू सांभाळ कर .....तू शिष्यांचे रक्षण कर .......तू आमचे पाठीमागील दिशेने रक्षण कर .....तू आमचे पुढील दिशेने , समोरून रक्षण कर ........तू उत्तर दिशेने आमचे रक्षण कर .....दक्षिण दिसेपासून आमचे रक्षण कर .....तू आम्हाला डावीकडून सांभाळ ...तू आम्हाला उजवीकडून सांभाळ ....ह्या सर्व आसमंतातील सर्व बाजूनी आमचे , तुझ्या भक्तांचे रक्षण कर ...| | 3 | |


त्वं वांग्मयास्तवम चिन्मय: | त्वं आनंदमयस्तवम ब्रह्ममय: | त्वं सच्चिदानंदाद्वितीयोसी | त्वं प्रत्यक्ष्य ब्रह्मासी | त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी | | ४ | |

हे देवाधिदेवा गणेशा , तू वाणीमय आहेस , सूक्ष्म रूपातही चैतन्यमय आहेस .......तुझे रूप हे सदोदित आनंदमय आहे व हा आनंद पूर्ण ब्रम्हमय झालेला आहे ........तूच सच्चिदानंद स्वरूप आहेस , सत - चित - आनंद ...ह्या सुर्ष्टी तील अंतिम सत्य जे आहेस ते तू आहेस , मनाचेही अंतर्मन ज्याला चित्त असे म्हणतात ते हि तूच आहेस , हे सत्य जे सदा चित्तात वसत असते व त्यामुळे जी आनंदाची अनुभूतू येते असा तू सच्चिदानंद घन तूच आहेस ......तूच प्रत्यक्ष्य ह्या सृष्टी मध्ये कणाकणा मध्ये व्यापून राहिलेले निखळ ब्रह्म आहेस ........तू प्रत्यक्षात ज्ञान आहेस , तुझ्याच द्वारे आम्हाला प्रत्येक पदार्थाची , काळाची व विश्वाचे ज्ञान मिळते , तुझ्याकडील ज्ञान हे विशेष करून आहे व तू सूक्ष्मतील सूक्ष्माची आणि अखंड ब्रह्मांडातील हर एक घटनेची जाण ठेवतोस म्हणून तू विज्ञानमयी सुद्धा आहेस .....| | ४ | |



सर्व जगदिदम त्वतो जायते | सर्व जगदिदम त्वत्तस्तिष्ठती | सर्व जगदिदम त्वयि लयमेश्यति | सर्व जगदिदम त्वाये प्रत्येति | त्वं भूमी रापोsनलोs निलो नभ : | त्वं चत्वारी वाक्यापदानी | | ५ | |

ह्या जगातील हर एक चेतन , अचेतन किंवा चराचर सृष्टी हि तुझ्यातूनच उत्पन्न होते , निर्माण होते ........हे संपूर्ण जग तुझ्याच आधाराने चालते , सर्व जगाचे व्यवहार सुरळीत पणे चालण्यास तूच कारणीभूत आहेस ........प्रत्येक जीवाला , पदार्थाला तू एक कालमर्यादा ठरवून दिली आहेत त्यामुळे तुझ्या निर्मितीचा लय हि तू तुझ्यातच करून घेतोस .........ह्या जगात अस्तित्वात असलेले ( जे मानवाला अजून माहित नाहीत तेही ) सर्व घटक तुझ्यातच लय पावून पुन्हा तुज्याच ठायी पुनरुपी जन्मास येतात , असे प्रत्येयास येते .....पृथ्वी ( जमीन / धरणी माता ) , जल ( पाणी ) , अग्नी , वायू व आकाश हि पाच महाभूते तूच आहेस ........ज्या चार वाण्याचा उल्लेख आपल्या धर्म शास्त्राने केलेला आहे अशा . परा , पश्यंती , मध्यम व वैखरी ह्या वाण्याही हि तूच आहेस ....| | 5 | |

त्वं गुणत्रयातीत : | त्वं देहत्रयातीत: | त्वं कालत्रयातीत: | त्वं अवस्थात्रायातीत: | त्वं मूलाधारस्थितोशी नित्यं | त्वं शक्ती - त्रयात्मक: | त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम | त्वं ब्रह्मा त्वं विष्णूस्तवम रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वामग्निस्तावाम वायू: त्वं सुर्यास्त्वम चान्द्रमास्त्वाम ब्रह्मा- भूर्भव - स्वरोम | | ६ | |

जीवन चक्राला कारणीभूत असे जे तीन गुण आपल्या धर्म शास्त्राने वर्णिले आहेत ते तीन गुण म्हणजे ..सात्विक गुण , राजस गुण व तमास गुण हि तूच आहेस परंतु तू ह्या हि गुणापलीकडील आहेस .....देहाचे ज्या तीन प्रकार आहेत , त्या हि तुझ्या पासूनच निर्माण झालेल्या आहेत ..ते तीन देह म्हणजे स्थूल देह ( जो दृष्टीला दिसतो तो ...) सूक्ष्म देह ( जो सूक्ष्म रुपात असतो ..) व कारण देह ( ज्या देहात प्रवेश करायचा आहे त्यामागील कर्मकार्य-कारण ) हे होत . ह्या देहाच्या तिन्ही प्रकारांच्या तू पलीकडील आहेस .......आपण ज्याला काळ असे म्हणतो त्या काळाच्या भूतकाळ , वर्तमान काळ व भविष्य काळ ह्या तिन्ही काळाच्या तू पलीकडील आहेस .......चैतन्यमय देहाच्या ज्या तीन अवस्था आहेत त्या म्हणजे जागृत अवस्था , स्वप्न अवस्था व सुषुप्ती अवस्था ह्या होत ..( जागृत म्हणजे जागेपणी अर्थात आपले दैनदिन व्यवहार चालू असतात ती अवस्था ...स्वप्न म्हणजे आपण झोपी गेल्यानंतर आपल्या शरीराची जी अवस्था असते ती अवस्था ...सुषुम्ना अवस्था म्हणजे ....मी देह आहे ह्याचाच विसर पडणे ..जागृत व स्वप्न ह्यांना आपले मन नकळत साक्षी असते ,,सुषुम्ना मध्ये मन निर्विकार होते ) , ह्या तिन्ही देहाच्या अवस्थांच्या तू पलीकडील आहेस .....तू नेहमी मूलाधार चक्राच्या ठिकाणी असतोस , तुला लोक कुठे कुठे शोधतात परंतु तू आपल्या माकड हाड जेथून सुरु होते त्या ठिकाणी मूलाधार चक्र असते त्या ठिकाणी तू सुप्त अवस्थेत असतोस व तेच तुझे नित्याचे ठिकाण आहे ...( बाकी लोक तुला इकडे - तिकडे शोधात बसतात ) .....ह्या सृष्टीला कारण म्हणून ज्या तीन शक्ती कार्यरत आहेत त्या उत्पत्ती , स्थिती व लय ह्या तिन्ही शक्तींच्या ठायी तूच आहेस .........ऋषी , मुनी व योगीजन हे सदैव तुझेच ध्यान करत असतात ( कारण तू चित्त - आकर्षण करणारा आहेस व मनाला व चित्ताला अद्भुत शांती व निरंतर आनंद देणारा आहेस ) ........ब्रह्मा तूच आहेस , विष्णू तूच आहेस , रुद्र तूच आहेस( शंकर ) , इंद्र तूच आहेस, अग्नी तूच आहेस , वायू तूच आहेस , सूर्य तूच आहेस , चंद्र हि तूच आहेस ....हि जमीन , हे आकाश , हे संपूर्ण अंतराळ व ओंकार स्वरूप ब्रह्म हि तूच आहेस .......| | ६ | | ...( क्रमश: )

जीवन कि शतरंज वही रहेगी ....( और ) बाजी लगायी जायेगी ...

अंदाज अपना अपना , खुशिया अपनी अपनी

हकीकत अपनी अपनी , नजरिया अपना अपना

चाहत अपनी अपनी , मजबुरीया अपनी अपनी

नशीब अपना अपना , रास्ते अपने अपने

कल तक " वो " था ...आज दिखाई नही दे रहा है ...

आज " ये  " है ..अपने नाम का ढोल बजा रहा है ...

कल कोई और होगा ....नयी शोहरत , नये अरमान लिये

परसो , नरसो , तरसो ...कोई और दाव पे लगेगा ....

जीवन कि शतरंज वही रहेगी ....( और ) बाजी लगायी जायेगी ...

फेसबुक वरील प्रेम विरानो ,.....प्रेमात रक्त व रक्तपात चांगला नाहीं

फेसबुक वरील प्रेम विरानो ,.....प्रेमात रक्त व रक्तपात चांगला नाहीं ....प्रेमात शेवटच्या टोकाचा विचार करणे योग्य नाहीं ...मला हे कुणाला तरी सांगायचे आहे , परंतु " तसे " सांगू शकत नाहीं म्हणून " असे " सांगत आहे ...जबाबदारीने वागायची शिकवण दुसर्यांना देणे सोपे आहे ,परंतु आपण कसे वागत आहोत हे पाहणे हि महत्वाचे आहे ... आपल्या मागे आपली छोटी भावंडे असतील , आमच्या सारखे काही मंडळी बोलत नाहीत पण लक्ष्य ठेवून असतात ...चरित्र जपा बंधू हो , अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे ...नको तिथे आपली उर्जा का वाया घालवत आहात ....हल्ली मी एक डायलॉग वारंवार वापरत आहे .....तो इथे हि वापरतो .....दोस्ती , प्रेम - संबंध व नाते -संबंध हे आपल्या बरोबरीच्या लोकांशीच करावा ....जास्त त्रास , मनस्ताप व मानहानी होत नाहीं ......

आपल्या कडून आपल्या लहान्यानी काय आदर्श घ्यायचा व मोठ्यांना काय वाटत असेल ह्याचा जरूर विचार करावा ...आशा आहे माझे हे बोलणे संबंदिता पर्यंत पोहचेल ....बाकी मंडळीनी कृपया relax राहावे ...

सुविचार

सुविचार 


जिथे आपल्या सावलीचाही भरवसा नाहीं तिथे कुठल्याही नात्याचा , 

मैत्रीचा काय टिकाव लागणार आहे ? सावली पहा कशी आपल्याशी

 एकरूप झाल्या सारखी वाटते परंतु ती असते सूर्याबरोबर ....सूर्य 

मावळतीला जायला लागला कि सावली हि हळूहळू लुप्त होवून जाते ....


नाती , मैत्री व विश्वास जो पर्यंत आहेत तो पर्यंत तो पर्यंत टिकवण्याचा


 प्रयत्न असावा ...बालपणीचे मित्र शालेय जीवनात नसतात .....शालेय 

जीवनातील मित्र कोलेज च्या जीवनात नसतात .....कोलेजच्या 

जीवनातील मित्र नोकरी / धंद्यातील जीवनात नसतात ....नोकरी 

धंद्यातील मित्र म्हातारपणात नसतात ...

माणसाने कसे प्रवाह बरोबर वाहावे ...ओंजळीत येईल तेवढ्याच 


पाण्याला आपले म्हणावे .....

वडार समाजातील लग्न - कार्यात म्हणत असलेले लोकगीत




वडार समाजातील लग्न - कार्यात म्हणत असलेले लोकगीत 

काल आई गावा वरून आली आहे ..देवाक काढतात ते गाणे , गंधाच्या वेळेचे गाणे , आहेर घ्यायच्या वेळेचे गाणे तिच्याकडून लिहून घेतले ...आज हि काही लिहून घेणार आहे ...जुना ठेवा , पूर्वी जरी त्याबद्दल एवढे प्रेम नसायचे तरी आता शब्दामध्ये गोडवा व जिव्हाळा जाणवतो आहे ...आई कडून बरीचशी माहिती मिळवली आहे ...विशेषत: वाड-वडील , आजोबा - पणजोबा पासून , सोयरे -सोयरे कुठे कुठे आहेत त्या बद्दल हि ....त्यांची आता नामावलीच करायची ठरवली आहे ...ती पुढील पिढीला खूप उपयुक्त अशी ठरणार आहे .....आमच्या कुसाळकर कुटुंबीय व त्यांची वंशावळ ( सग्या -सोयर्या सहित ) ह्यावर मी एक पुस्तिकाच काढणार आहे ....त्याचा माझ्या पाहुणे - रावल्याना नक्कीच भविष्यात उपयोग होईल ...असो ..

आपल्यात लग्नाच्या वेळी देवाक काढताना म्हणतात ते गाणे ....पण आणि सुपारी ह्यांची एकेक ने संख्या वाढवायची आहे त्याच शब्दांची लांबट लावत बसायचे ....परंतु हे सुरात नीट पणे ऐकले कि खूप छान वाटते ..शब्दांचा गोडवा व त्यांची लय साधली कि ऐकणारही त्यात तल्लीन होवून जातो ...साधे - सोपे शब्द , बिन -वाद्याचा ठेका , लांबवलेला सूर ...एकदम मस्तच ...

......लग्नाच्या वेळी देवाक काढताना म्हणतात ते गाणे .....

रोन्डू आकाल , रोन्डू फोकाल... उप्पे गंगम्मा , निम्मे सेसा ....

निम सेसा निमगिरी , तुंबी कडवा ....तुम्बी कडवा आईराले ...

गंगाक वाराम येवार येशिरी ?....गंगाक वाराम येवार येशीर ?

गंगाक वाराम येशीर शंकर अण्णा ...गंगाक वाराम येशीर शंकर अण्णा ...| | धृ | |

मुडू आकाल , मुडू फोकाल... उप्पे गंगम्मा , निम्मे सेसा ....

निम सेसा निमगिरी , तुंबी कडवा ....तुम्बी कडवा आईराले ...

गंगाक वाराम येवार येशिरी ?....गंगाक वाराम येवार येशीर ?

गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...| | १ | |

नालग आकाल , नालग फोकाल... उप्पे गंगम्मा , निम्मे सेसा ....

निम सेसा निमगिरी , तुंबी कडवा ....तुम्बी कडवा आईराले ...

गंगाक वाराम येवार येशिरी ?....गंगाक वाराम येवार येशीर ?

गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...| | २ | |

आईद आकाल , आईद फोकाल... उप्पे गंगम्मा , निम्मे सेसा ....

निम सेसा निमगिरी , तुंबी कडवा ....तुम्बी कडवा आईराले ...

गंगाक वाराम येवार येशिरी ?....गंगाक वाराम येवार येशीर ?

गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...| | 3 | |

आर आकाल , आर फोकाल... उप्पे गंगम्मा , निम्मे सेसा ....

निम सेसा निमगिरी , तुंबी कडवा ....तुम्बी कडवा आईराले ...

गंगाक वाराम येवार येशिरी ?....गंगाक वाराम येवार येशीर ?

गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...| | 4 | |

योड आकाल , योड फोकाल... उप्पे गंगम्मा , निम्मे सेसा ....

निम सेसा निमगिरी , तुंबी कडवा ....तुम्बी कडवा आईराले ...

गंगाक वाराम येवार येशिरी ?....गंगाक वाराम येवार येशीर ?

गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...| | ५ | |

येन्मिद आकाल , येन्मिद फोकाल... उप्पे गंगम्मा , निम्मे सेसा ....

निम सेसा निमगिरी , तुंबी कडवा ....तुम्बी कडवा आईराले ...

गंगाक वाराम येवार येशिरी ?....गंगाक वाराम येवार येशीर ?

गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...| | 6 | |

तोमिद आकाल , तोमिद फोकाल... उप्पे गंगम्मा , निम्मे सेसा ....

निम सेसा निमगिरी , तुंबी कडवा ....तुम्बी कडवा आईराले ...

गंगाक वाराम येवार येशिरी ?....गंगाक वाराम येवार येशीर ?

गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...| | 7 | |

Saturday, January 18, 2014

प्रिय आमुचा एक इंडिया .....महान देश हा




August 3, 2012 


प्रिय आमुचा एक इंडिया .....महान देश हा

भारत देशाला जर खरोखरेच " महान " देश बनायचे असेल तर प्रथम हे चित्र बदलायला हवे ....नाहीतर इंडिया सुपर power होईल ह्यात काही शंका नाहीं परंतु ...भारत हा नेहमी ...एकवीस (२१) कलमीच राहील ....( एकवीस कलमी गरिबी हटाव कार्यक्रम ...फक्त पानावर )

ऐश्वर्या राय बच्चन च्या बाळाच्या डायपर चा खर्च हा ,,वरील चित्रातील आईच्या संपूर्ण दिवसातील रोजंदारीच्या पेक्षाही जास्तअसावा ... आमची हि फक्त शंकाच आहे ..त्या व्यतिरिक्त त्या बद्दल आम्हाला काही म्हणायचे सुद्धा नाहीं ....परंतु जगण्यातला हा किती मोठा विरोधाभास आहे ...काही जण करोडोत खेळतात , लोळतात तर काहीना कोथिंबिरीच्या जुडीसाठी विचार करावा लागतो ..... ज्यांचे रोजचे जगणेच रोज काम करून मिळणाऱ्या मोबदल्या वर असेल तर ..त्यांच्या मुलांनी शिकायचे तरी कसे ?...त्या बदल्यात त्यांना थोडे " आरक्षण " दिले ..थोडे " अनुदान " दिले तर बिघडले कुठे ?...नाहीतरी आपण सरकारी , राजकारणी ..खाऊ - गधडे " पांढरे -हत्ती " पाळले आहेतच ...आपल्या देशात " दलाल " ह्या जातीची हि कमतरता नाहीं ....हे दलाल सर्वच क्षेत्रात व्यापून आहेत ...कष्ट नको , गुंतवणूक नको ...नुसते टाळू वरील लोणी हाणायचे .....

...आता ह्या चित्रातील आई ने व बाळाच्या बापाने सुद्धा ..थोडे मनावर घेवून ..व्यसना पासून दूर राहिले पाहिजे..नुसतीच रोज " काळी पिशवी " व दारू - गुटाक्याची संगत सोडली पाहिजे ...आळस झटकला पाहिजे ...दोन दिवस कामावर व तीन दिवस बायकोच्या पुढे बसने सोडले पाहिजे ...देव-देव , अंधश्रद्धा , नको त्या ठिकाणी खर्च , जुगार , शर्यत लावणे ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ....गरिबीला शाप न समझता चार पैसे सोबत बाळगून श्रीमंतीच्या वाटेवरची पावुले चढायला सुरु केले पाहिजे ..." असतील शिते ..तर जमतील भुते " हा जगाचा व जगण्याचाही मुलभूत नियमच आहे ...

वैभव , संपत्ती , नाव लौकिक , हे हि काही उगीच येत नसतात ..त्या हि पाठीमागे प्रत्येकाची त्याग व तपश्चर्या असतेच ...उगीच कुणाला उठ-सुठ नाव ठेवणे हि योग्य नाहीं ...असो.
 

बाप्पा हनुमंता , बजरंगा , मारुती राया ....आम्हा सर्व वडार बांधवा वर कृपा दृष्टी ठेव ...




जय बजरंग ....जय वडार

बाप्पा हनुमंता , बजरंगा , मारुती राया ....आम्हा सर्व वडार बांधवा वर कृपा दृष्टी ठेव ...


आम्हाला सदैव कार्यरत ठेव ...आम्हा सर्व वडार बांधवा मध्ये मैत्रीचे नाते दृढ होऊ दे ...

आमच्या भावंडा मध्ये कुणीही हीन-दिन राहू नये....

कुणी शिकून खूप मोठा झाला किंवा अचानक " धनलाभ " होवून धनवान झाला तरी ....

वडार बांधव व वडार समाजा प्रती त्यांची नाळ जोडलेली राहू दे.....

बाप्पा , आम्हाला आधुनिक दृष्टीकोन दे , आमचा हि " इतिहास " सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा .....


अशी बुद्धिमान वडार बांधव आमच्या समाजात निर्माण होऊ दे ...

प्रत्येक जन संघटनेशी जोडला जावो व प्रत्येकाचा उत्कर्ष होवो ...

जय बजरंग ....जय वडार 

गोमातेची कत्तल - खाण्यात चाललेली कत्तल ह्याचा निषेधच परंतु गो -बळी चे काय ?





गोमातेची कत्तल - खाण्यात चाललेली कत्तल ह्याचा निषेधच परंतु गो -बळी चे काय ? 


August 8, 2012 


गाय ह्या आशराप ( गरीब ) प्राण्याला " गोमाता " असे म्हणतात  ...तिच्या मध्ये ३६ कोटी देवांचे वास्तव्य असते असे आपल्याला लहानपणा पासून बिंबवण्यात आले आहे ....एवढेच नाहीं तर गायीला " कामधेनु " असे हि म्हटले गेले आहे ...आणि तशी ती आहे ह्यात वादच नाहीं ...

परंतु काही धर्म-पंडित ह्याचे राजकारण करत आहेत किंवा स्वताच्या फायद्यासाठी हा मुद्धा राहून राहून उकरून काढत आहेत ....रक्ताळलेले , अति भीषण असे दृश्य facebook व अन्य माध्यमावर लोड करत आहेत ..हि चित्रे पाहून कुठल्याही संवेदनशील माणसाला गरगरून आल्या शिवाय राहणार नाहीं ...व ह्यातून असा एक समज निर्माण होत आहे कि गाय ( अथवा बैल ) ह्यांची सर्रास अशी कत्तल आपल्या देशात सुरु आहे ...



गाईची कत्तल हि आम्हाला कधीही निषेधार्ह आहे ..व तिची कत्तल होऊ नये ह्या मताचे आम्हीही आहोत ....परंतु काही लोकांचा ढोंगीपणा आम्हाला सलत आहे ...तेच तुमच्यापुढे विचार करण्यासाठी मांडतोय ...कारण का तर आपण हि सर्व ह्या गोष्टीशी ह्या ना त्या कारणाने जुडले जात असतो ...

(१) जे लोक गाईला गोमाता , कामधेनु , व देव स्वरूप मानतात तिचे दर्शन घेतात ...त्या गायीला ते लोक स्वताच्या घरी कधी पळताना दिसत नाहीत ...( १/२ % अपवाद वगळता )


(२) जो शोर - शराब चाललेला असतो ...तो फक्त शहरातूनच ....


(३) हे सर्व शेतकऱ्यांनी व इतर जातीतल्या लोकांनी करावे .अशी समजूत काही ढोंगी , लबाड ,हरामी लोकांची असते ...


(४) प्रत्यक्षात ज्यांच्या कडे गायी आहेत ..त्यांचे दुखणे हे लोक कधी लक्षात घेतच नाहीत


(५) हा मुद्दा खुप महत्वाचा आहे ...


....काही ठराविक जाती - जाती मध्ये सामाजिक असंतोष व दंगल -सदृश्य परिस्थिती नेहमी कशी राहील ....ह्यासाठी ह्यांचे चर्वित -चर्वण सतत चालू असते ..व हे आवर्जून सांगायला हवे कि ..हे एकूणच समाजासाठी व देशासाठीही हितकारक नाहीं ..

मुद्दे अजूनही आहेत ...माझी गायींच्या कत्तलीला विरोध आहेच परंतु माझी अशी भाबडी धारणा आहे कि ....



काही ठराविक लोकच अशी मागणी करतात त्यांनी आपापल्या घरी गायी पाळणे सुरु करावे व ३६ कोटी देव आपल्या घरी आणून आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्याव्यात ..असो .

ताजा कलम .....माझ्या घरी गाय नाहीं व मला म्हशिचेही दुध चालते .....