Wednesday, January 15, 2014

भारत स्वतंत्र झालाय कि केला गेलाय फक्त ठराविक लोकासाठी ?

भारत स्वतंत्र झालाय कि केला गेलाय फक्त ठराविक लोकासाठी ?

जागे व्हा बंधुनो , ठराविकच लोक स्वातंत्र्याचा फायदा घेत आहेत , ह्या ठराविक लोकांना सीमेवर कोण मरत आहे ह्याच्याशी काही घेणे देणे नाही , १५ ऑगस्ट ला परीट घडीचे शुभ्र कपडे घालणारे , ध्वजा रोहानात मिरवणारे , सेलेब्रिटी लोकांना खरेच देशप्रेम आहे का ? प्रत्येकाचे स्विस बँकेतील आकडे दिवस गणिक मोठे होत चालले आहेत .

tax कोण चुकवीत आहेत ? , वीज कोण चोरीत आहेत ? पाण्याचे बिल कोण भरीत नाहीत ? सरकारी यंत्रणांना आपल्या बायका मुलांसाठी कोण वापर करून घेत आहे ? टक्केवारी कोण खात आहेत ? खून , कायदे मोडून कोण साळसूद पणे बाहेर फिरत आहेत ? पैशाच्या जोरावर कोण मते विकत घेत आहेत ? …… हे लोक खरे देशप्रेमी का ? ……………

असे जर असेल तर ह्यातच उत्तर आहे बाजूच्या चित्रातील बालकांना का असे जिने जगावे लागत आहे .

नेहमीच गरिबी हटाव चालू असते परंतु ती काही हटत नाही आणि ह्यांचा बँक balance काही कमी होत नाही . तो फुगतच चालला आहे . ह्यांच्या गाड्या आता लाखाच्या नाही कोटीच्या झालेल्या आहेत .

बंधुनो , एक रहस्य सांगतो ,… बघा तुम्हाला पटते का ते ……. आपल्या देशातील एक वर्ग असा आहे कि ज्यांची मानसिकता अजून हि बदललेली नाही , त्यांना काही जातीना , काही लोकांना त्या वर्गाच्या लोकांची सेवा / काम करण्यासाठी हवे आहेत . हेच लोक गरीब लोकांचा उत्कर्ष होण्यातील मुख्य अडचण आहेत . त्यांची जमीनदारी , सावकारी , पाटीलकी , देशमुखी त्यांना अजून हि गाजवायची आहे .

अरे " थु " आहे असल्या मानसिकतेच्या नेत्यावर व असली मानसिकता असलेल्या पक्षावर ,

बंधुनो , निवडून न येणाऱ्या उमेदवाराला मतदान करा परंतु असल्या धनलोभी भुजंगा ना मतदान करू नका . आपल्याच कष्टावर मोठे होवून हे लोक आपल्यालाच पिळून काढतात .

देश स्वतंत्र झाला परंतु बाजूचे जे चित्र दिसत आहे त्याचे काय ?

ये आझादी झुत्ठी है , देश कि जनता भूखी है

No comments:

Post a Comment