Wednesday, January 15, 2014



ग्रेट भेट - दोन वडार समाजातील महान व्यक्तिमत्वांची

फेसबुक वरील वडार समाज बांधवांचे अण्णा अर्थात मोठे भाऊ श्री राजूअण्णा जाधव साहेब

मंगळवेढा व सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ वडार समाज नेते , मा . नगराध्यक्ष मंगळवेढा ,राष्ट्रवादी पक्षाचे नेते व प्रगतीशील शेतकरी श्री वसंतराव मुद्गल साहेब 

……… हा योग जुळून आला होता तो वडार समाज चारीटेबल ट्रस्ट च्या वडार समाज दिनदर्शिकेच्या प्रकाशन समारंभ ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने .

आज दिनदर्शिकेचे सर्वत्र वाटप सुरु आहे व त्याचे स्वागत हि चांगले झाले आहे , विरोधकांनीही खुल्या दिलाने त्याचे स्वागत केले आहे कारण त्यात आपण आपल्या वडार समाजाचाच केवळ विषय हाताळला आहे व कुठे हि स्वतःला प्रेझेंट करण्याचा स्वार्थीपणा आम्ही केलेला नाही .

या आमच्या पहिल्याच सार्वजनिक उपक्रमात आमच्या कार्याची चांगलीच दखल घेतली गेली . जे समाज बांधव फेसबुक वर नाहीत त्यांनीही ह्या कॅलेंडर ची व आमची खूप प्रशंसा केली .

परंतु एक सत्य तुमच्या पुढे मांडायचे आहे .

आपण या कॅलेंडर ची सुरुवात सर्व संस्था व संघटना ह्यांच्या आर्थिक सहयोगातून करण्याचे ठरवले होते व सर्व संस्था व संघटनाचे ज्यांनी ज्यांनी जे जे कार्य केले आहे ते त्या कॅलेंडर मध्ये आपण माहिती देणार होतो व ती माहिती सर्व दूर पर्यंतच्या वडार समाज बांधावा पर्यंत , त्यांच्या कार्याची माहिती पोहोचावी हा दूरदृष्टीचा विचार होता परंतु दुर्दैवाने तशी मला साथ कुणीच दिली नाही .
मी तर जाहीर करून बसलो होतो कि असे कॅलेंडर प्रकाशित करणार आहोत म्हणून .
संस्थेकडे हे कॅलेंडर प्रकशित होईल इतके भांडवल जमा नव्हते किंबहुना जी बाकी होती ती सभासदांच्या मासिक हप्त्यातील होती त्यामुळे त्या रक्कमेला मला अजिबात हात लावायचा नव्हता . माझ्या पुढे खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता .

आपल्या संस्थेचे जे २/३ सदस्य होते त्यांनी ५०००/ १०००० अशी एकूण २०००० ची रक्कम फक्त कॅलेंडर साठी आली होती .( बाकीचा कटू उल्लेख मी इथे टाळतो आहे ) . अशा परिस्थितीत कॅलेंडर होईल अशी शक्यताच नव्हती परंतु हि गोष्ट मी जेंव्हा राजू अण्णा ह्यांना सांगितली तेंव्हा त्यांनी मला अगदी सहज सांगितले कि तुम्ही कॅलेंडर चे काम पूर्ण करा व काहीही मदत लागली तर काहीही संकोच करू नका . कॅलेंडर साठी आपण खूप माहिती गोळा केली होती व ती माहिती समाजासमोर येणे खूप गरजेचे होते कारण या मागे असे कार्य कुणीही केले नव्हते .

सर्व संस्था व संघटना मिळून आपण २५००० हजार प्रती छापण्याचा विचार करत होतो परंतु आता फक्त ट्रस्ट च्या बळावर ( ?) ५००० कॅलेंडर छापण्याचे निश्षित केले . २५००० प्रतीसाठी कॅलेंडर ची किमत होत होती २५ रुपये परंतु ५००० कॅलेंडर साठी त्याची एका कॅलेंडर साठी किमत झाली ४७. ५० रुपये .

बंधुनो , पुढील आकडेमोड मी सांगत नाही परंतु आज आपण कॅलेंडर मोफत वाटत आहोत , काही स्वाभिमानी समाज बांधव त्या कॅलेंडरचा निर्मिती खर्च देत आहेत परंतु ते प्रमाण खूप कमी आहे व आमचीही धारणा सर्व वडार समाज बांधावा पर्यंत हे कॅलेंडर पोहोचावे हीच आहे .

आज कॅलेंडर चांगले झाले आहे ह्या आनंदात आम्ही सर्व आहोत , फेसबुक वरील वडार समाज बांधवांचा स्नेह मेळावा खूप यशस्वी झाला , त्याचे हि आम्हाला अप्रूप आहे , आज कुसाळकर ब्रदर्स चे व वडार समाज चारीटेबल ट्रस्ट या संस्थेचे नाव सर्वदूर पर्यंत जात आहे परंतु ह्या सर्व गोष्टी घडवून आणण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता ते अण्णा मात्र अन्य समाज बांधावा बरोबर प्रेक्षकात बसून होते
,( राजू अण्णा , हे मलाही अण्णा म्हणतात व मी हि त्यांना अण्णा म्हणतो ) …

अण्णांनी मला स्पष्ट शब्दात सांगितले होते कि , मला व्यासपीठावर बसवू नका व मी खालीच बसेन व मला कुठलाही speciel attention ( खास वागणूक ) नको आहे अन्यथा मी संकोचाने तो कार्यक्रम सर्वांच्या आधी सोडून जाईन . मी त्यांची विनंती मान्य केली . पर्याय नव्हता कारण मी हि तेवढाच संकोची होतो . परंतु मला सामोरे जाने भाग होते , दूर दूर वरून वडार समाज बांधव येणार होते . असो .

आज श्रेय घेण्याची जणू काही स्पर्धाच समाजात सुरु आहे त्यात असे व्यक्तिमत्व समाजात शोधायला निघाले तर कित्येक वर्षे जातील परंतु एक हि व्यक्ती तशी भेटणार नाही . म्हणूनच अण्णांचे मोठेपण वादातीत आहे . काही लोक न केलेल्या कामाचे हि ढोल बेंबीच्या देठाला रग लागे पर्यंत वाजवत असतात , काही जन तर आयत्या पिठावर मनसोक्त रेघोट्या मारत असतात परंतु एखाद्या कार्याचे पूर्ण " कारण " होवूनही स्वताला त्या पासून अलिप्त ठेवणारे अन्नासारखे व्यक्तिमत्व विरळाच आहे त्यामुळे कॅलेंडर व कॅलेंडर चे सर्व श्रेय हे फक्त आणि फक्त श्री राजू अण्णा जाधव साहेब ह्यांनाच जाते , त्यांच्या शिवाय हे कार्य पूर्णत्वास जावूच शकले नसते .

काही गोष्टी ह्या फक्त अण्णा व माझ्यातच झालेल्या आहेत व ह्या प्रकरणातून मी खूप काही शिकलो आहे व या पुढे असे कॅलेंडर अथवा अन्य कुठला कार्यक्रम घेण्यपूर्वी मी शंभर वेळा विचार करीन , करायचा का नाही ते हि मी नक्की सांगू शकत नाही कारण माझ्यावर मी भिक मागत फिरतो आहे असा आरोप काही सुज्ञ लोकांनी लावला आहे . एकाने / एकीने तर हद्द्च केली आहे . तिचे ( त्या व्यक्तीचे ) असे म्हणणे आहे कि मी हि संस्था बुडवणार आहे व एक दिवस सर्वांचे पैसे घेवून पळून जाणार आहे . याची खात्री समोर च्याला व्हावी म्हणून तिने ५०००० हजार ( पन्नास हजार ) रुपयांची पैज हि माझ्यावर लावली आहे . त्या व्यक्तीने समाजासाठी एक रुपया दिलेला ऐकवीत नाही . त्या व्यक्तीने हि पैज लावताना कुठलीही कालमर्यादा ठेवलेली नाही . मी अगदीच म्हातारा होई पर्यंत व मरे पर्यंत माझी काही त्या पैजेसाठी वाट पहायची तयारी नाही . त्या व्यक्तीने पाच पैसे दिलेले नाहीत कधी ,
समाजासाठी मला त्या व्यक्तीचे ५०००० हजार समाजाला भेटत असतील तर मी हर्ष-वायुने मरणे पसंद करील . असो

अण्णांनी मला स्टेज वर येणार नाही असे सांगितले होते तरीही माझ्यापुढे अचानक अनपेक्षित एक वेगळाच प्रसंग आला . कॅलेंडर प्रकाशन समारंभाला आलेल्या पाहुण्याचे एक आयोजक म्हणून निवेदकाने माझ्या हस्ते गुलाब पुष्प देवून स्वागत सत्कार सुरु केले , मला वाटले होते फक्त एखाद्याचे माझ्याकडून सत्कार होईल परंतु सर्वांचेच स्वागत माझ्याकडून सुरु झाले . आणि त्यात माझ्या खऱ्याखुऱ्या पाहुण्यांचेही नाव होते ( माझे सासरे ) . त्यांचे स्वागत माझ्याकडून म्हटल्यावर मी पुरता संकोचून गेलो परंतु पुढे अण्णा दिसल्यामुळे सरळ त्यांच्याकडेच जावून त्यांना पाहुण्यांचा सत्कार करण्याची विनंती केली .

अण्णांनी विनंतीचा स्वीकार केला व फोटोग्राफर ने एक खूप छान क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला व आम्हाला दोन परस्पर विरोधी परंतु आप आपल्या कर्तृत्वाने श्रेष्ठ असलेल्या वडार समाजातील दोन दिग्गज बांधवाची भेट घडवून आणली .

आमचे पाहुणे अर्थात श्री वसंतराव मुदगल हे मंगळवेढा येथील एक बढे प्रस्थ आहे . आपल्या मनगटाच्या बळावर , आपल्या बेडर वृतीने , जाईल तिथे आपली छाप सोडणाऱ्या व्यक्तिमत्वाने व माणसे जोडण्याच्या कलेने त्यांनी आता पर्यंत एकट्याच्या हिमतीवर स्वताचे साम्राज्य उभे केले आहे . सोलापूर जिल्यात " मालक " हि उपाधी तशी लावलीच जाते परंतु मुदगल साहेब हे खरेखुरेच बऱ्याच जणांचे " मालक " झाले आहेत . मंगळवेढ्याच्या आजू बाजूच्या गावातील स्थानिक गावकरी मुदगल साहेबांना अर्थात बापूंना ( ह्या नावाने ते त्या भागात प्रसिद्ध आहे व आम्हीही त्यांना बापू असेच म्हणतो ) ओळखणार नाही व आदराने बोलणार नाही असा व्यक्ती भेटणार नाही . राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री श्री लक्ष्मनराव ढोबळे हे जेंव्हा २५ / ३० वर्षापूर्वी मंगळवेढा राखीव मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवीत होते तेंव्हा त्यांना मतदार संघाची निट ओळख नव्हती , ढोबळे सर हे अक्कलकोट सोलापूरचे होते . लोक ढोबळे सरांना विरोध करत होते व एकदा तर दगड फेक सुरु झाली . ह्या आपल्या बहाद्दर वडाराने आपली चौडी छाती पुढे करत ढोबळे सरांना आपल्या मागे घेत दगड फेक करणाऱ्या जमावाला खुले आव्हान दिले , काही दगड अंगावर घेतले व काही दगडांनी जमावातील काहींची टाळकी शेकवलि . जमावातील लोकांना माहित होते कि हा वडार गडी बिथरला कि कुणाची हि गय राहणार नाही . संपूर्ण जमावाला काढता पाय घ्यावा लागला . ढोबळे सर विजयी नसते झाले तर नवलच झाले असते .

आज मंगळवेढ्यात ढोबळे सर व वसंतराव मुदगल हि जोडी आज हि कायम आहे . पुढे एका निवडणुकीत सर्व विरोधाला न जुमानता स्वताच्या ताकदीवर अपक्ष म्हणून निवडून येण्याची किमया केली . ४/५ नगरसेवक स्वताच्या ताकदीवर निवडून आणण्याची क्षमता मुदगल साहेब ठेवातात् व इतर मतदार संघावर हि प्रभाव टाकू शकतात .

मुदगल साहेब हे फोन नंबर व गाड्यांचे नंबरचे पक्के शौकीन आहेत , ह्यांच्या घरातील व सर्व कामगाराकडील सर्व फोन नंबर ला शेवटी ७६ हा आकडा पाहिजेच असतो , ह्यांची स्कोर्पिओ असो कि fortuner अथवा दु चाकी असो त्यांना ७००० हाच आकडा हवा असतो . ह्यावर कळस कि काय एकदा त्यांनी दहा चाकी , पाच मालवाहतूक गाड्या एकदम घेतल्या व सगळयांचा नंबर हा ६६६६ च होता . ( हि अतिशयोक्ती वाटेल , पण हि किमया आहे )

मंगळवेढा हे महाराष्ट्रातील ज्वारीचे गोदाम म्हणून ओळखले जाते व येथील ज्वारी हि खूप उत्तम प्रतीची म्हणून नावाजलेली आहे .मुदगल साहेबांचे ज्वारीचे रान हे २५ / ३० एकराच्या पुढे असावे व ते प्रत्येक वर्षी १२५/ १५० पोटी ज्वारीचे उत्पादन घेत असतात . साहेबांचे अत्याधुनिक बियाणाचे ऊसं लागवडी खालील क्षेत्र हे १५ ते २० एकर आहे व ते पूर्ण स्वयंम चलित ठिबक पद्धतीने केलेले आहे . पाण्याच्या साठ्यासाठी त्यांनी महाकाय अशा दोन विहिरी खणलेल्या आहेत व एक दगड खाणीचे रुपांतर केवळ पाण्याच्या साठ्यासाठी करत असतात . उसाच्या एका बेण्याला १७ / १८ फुटवे आहेत म्हणजे जवळ जवळ एक उसाची मोळी एकाच ठिकाणी .

आधुनिक जातीच्या द्राक्षाची मुदगल साहेबांनी पाच एकरात लागवड केलेली आहे व तेथेही ठिंबक व एक शेतकी तज्ञ त्यांनी नियुक्त केलेला आहे व वेळच्या वेळी औषध व फवारणीची योग्य ती काळजी घेतली जाते .

मुदगल साहेबांचे दगड खान आहे , स्टोन क्रशर मशीन आहे , सर्व प्रकारचे वाहने आहेत , ते रस्त्याचे contractor आहेत . transport वाहतुकीचा ( सरकारी ) व्यवसाय आहे .

मुदगल साहेबाना हे सर्व सहज शक्य झालेले नाही तर त्यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतलेलि आहे . जीवावर उदार होवून यश त्यांनी खेचून आणलेले आहे . प्रकृती अस्वस्थ्यावर मात करून ते मुंबई - पुणे - सोलापूर असे सतत फिरतीवर असतात .

कुणाला शंका येईल कि मी माझे पाहुणे आहेत म्हणून गुणगान करत आहे परंतु मंगळवेढा भागातील कुणाही मराठी / गैर मराठी व्यक्तीला मुदगल साहेबांचे नाव विचारले तरी तो दचकल्या शिवाय राहणार नाही . असा त्यांचा वचक आहे , भले भले त्यांच्या नादी लागत नाहीत .

बरे मी पुढे काय लिहिणार आहे ते वाचून तरी किमान काही शंका घेणार्यांचे समाधान व्हावे . श्री मुदगल साहेब हे खूप कुटुंब वत्सल आहेत . त्यांनी त्यांच्या सौ ना मंगळवेढा नगर परिषदेच्या नगरसेविका सुद्धा केलेले आहे व स्पष्टच बोलायचे तर पैसा आला कि चारित्र्य हि डागाळून जाते परंतु इथे तसला कुठलाही प्रकार नाही अजून एक अति महत्वाचे जे पैशामुळे होते ते म्हणजे दारूचे वा अन्य कुठले हि व्यसन . मुदगल साहेबाना दारूचेच सोडा अन्य कुठलेही व्यसन अजिबात नाही .
मी तरी आमच्या पाहुण्याकडे खरे कुठले भांडवल आहे म्हणून पाहतो ते म्हणजे त्यांची हिम्मत व निडर वृत्ती . सेटलमेंट वा दलाली असल्या फालतू धंद्यात त्यांनी कधीच लक्ष दिले नाही .मित्रांसाठी दिलदारी अगदी टोकाला जावून करणार परंतु कुणी वैरत्वाची भाषा केली तर समोरचा माणूस आवाजात गप्प बसला पाहिजे . नाते गोते सांभाळताना सर्व ती काळजी घेणार परंतु विरोधात गेला कि दुर्लक्षून त्या व्यक्तीला तिची जागा दाखवून देणार .

असे हे विलक्षण व्यक्तिमत्व व आमच्या सहित आमच्या सर्व नात्या गोत्यातील सर्वांचे आधार असलेले , ज्यांचे फक्त असणेही सुरक्षिततेचा आभास निर्माण करत असते .

श्री मुदगल साहेबाबदल शेवटचे बोलायचे ठरले तर मी एवढेच म्हणेन कि ह्या व्यक्तीची क्षमता अजून खूप आहे , हि व्यक्ती समाजासाठी खूप काही करू शकते , ह्या व्यक्तीच्या जाईल तिथे ओळखी आहेत , आमदाराकडे , मंत्र्याकडे ह्यांची कामे अगदी सहज मार्गी लागतात . ह्यांनी कुठल्याही विषयाला / कामाला हात घातला कि त्याचा पिच्छा पुरवल्या शिवाय राहत नाहीत .

मी मुदगल साहेबांच्या म्हणजेच आमच्या पाहुण्याच्या पाठीमागे लागलेलो आहे कि त्यांनी एकदा मंगळवेढा / पंढरपूर विधान सभा लढवावीच . हरलो तरी समाजात प्राण फुन्कण्यासाठी एक बाजी लावावीच . . . .

श्री राजू अण्णा जाधव साहेब व आमचे पाहुणे हे दोघे हि माझ्यासाठी आदर्श आहेत . या दोघांचा एकत्रित फोटो पाहून मी खूप आनंदित झालो आहे . एक जन सुप्तपणे समाजाला मदत करत आहे , एकाजनाची विलक्षण ताकत आहे समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची . दोघेही तेवढेच कर्तृत्ववान आहेत .

वडार समाज चारीटेबल त्रस्त च्या माध्यमातून हे ग्रेट भेट झाली …… अशाच अनेकानेक भेटी आमच्या माध्यमातून व्हाव्यात व वडार समाजाला एक वेगळीच झळाळी यावी .

कर्तृत्ववान माणसेच समाजाला दिशा देवू शकतात .

समाजाने सुद्धा कुणाही समाज बांधवाच्या कर्तृत्वाला सलाम करायला विसरू नये .

जय बजरंग . . . . . . जय वडार

No comments:

Post a Comment