( ९ ऑगस्ट २०१२ ची हि जुनी पोस्ट आहे . )
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा ...
आपण राम नवमी , श्रीकृष्ण अष्टमी , हनुमान जयंती , शिवरात्र , दत्त जयंती , गणेश जयंती इत्यादी इत्यादी अनेक प्रकारचे सोहळे , उत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरे करतो ...परंतु आपल्या पूर्वजांनी ज्या उद्देश्यानी हे सर्व " आखून " देलेले आहे त्या कडे आपण साफ दुर्लक्ष्य करतो ...ह्या मधील आध्यात्मिक अर्थ शोधण्याचा प्रयत्न आपण यत-किंचितही करतनाहीं ..
खरे तर देवाचा जन्मच संभवत नाहीं ...तो मूळचाच स्वयंसिद्ध आहे ..तो कुठल्या उपाधीला भूलेल असेही नाहीं ...त्यामुळे त्या सर्वेश्वराला जन्म मरणाच्या चक्रात आपण त्यांना अडकवायला नको ..संतानी एका ठिकाणी म्हटले आहे कि " देवा नाहीं रूप , देवा नाहीं रंग ...देवा नाहीं पाठ , देवा नाहीं पोट ...."
असे सोहळे साजरे करण्याचे कारण संपूर्ण समाजात एक सामाजिक संदेश पोहचावा व सर्वांचे अध्यात्मिक व पारलौकिक आयुष्य संपन्न व्हावे असा असावा..
आपण म्हणतो हिंदू धर्म खूप श्रेष्ठ आहे ..वगैरे वगैरे ...परंतु त्यातील रहस्य , गूढ अर्थ कळले तर ...अन्यथा ...हिंदू धर्म हा एक परंपरांचा , खुळचट कल्पनांचा , अनेक देवांचा , अनेक जातींचा , अनेक रुढींचा ...बुवा - बाबांचा सूळ सुळात असणाऱ्या तथागतीत धर्मगुरूंचा धर्म म्हणायला हवे ...बरे तri ह्यातील काही वाईट प्रथा बंद झाल्या ..सतीची चाल , विधवा विवाह निशिब्द , विधवा केशवपन , स्त्री शिक्षण ...गावा- गावातून चालणारी कोंबड्या - बकर्यांचे , मेंढ्यांचे बळी , त्यासाठी केले जाणारे नवस ...अशा एक ना अनेक तर्हा ह्या हिंदू धर्माचे अभिन्न भागच होत्या ..
.महाराष्ट्रात होवून गेलेल्या संतांचे , पुरोगामी विचार सरणीच्या श्रेष्ठ व कर्तृत्व वाण युग पुरुषांचे सामाजिक बदला मध्ये खूप मोठे योगदान आहे ...आपल्या सारख्या " शुद्र " म्हणून हिणवल्या गेलेल्या जातीसाठी तर त्यांचे योगदान बहुमोल आहे ...त्यांच्या मूळेच आपण आज विकासाची थोडी बहुत रसाळ फळे चाखत आहोत ....अजूनही विसंगती आहेत , फरक आहे ...परंतु आपण लोक हि जागृत आहोत ...
परत एकदा सांगतो ...हिंदू धर्म श्रेष्ठ आहेच ...परंतु त्यातील मर्म लक्ष्यात आले तरच ...अन्यथा अशा किती देवाच्या जयंत्या येतील व जातील ...
असो . ...परत एकदा सर्वाना शुभेच्छा
No comments:
Post a Comment