३ सप्टेंबर २०१२
श्री विजय साहेब चौगुले ह्यांचे ऐरोली , नवी मुंबई हे कार्य-क्षेत्र आहे व ते शिवसेनेचे आघाडीचे नेते आहेत त्यामुळे त्यांनी तिथे शाळा सुरु किली असेल तर विशेष काहीच नाहीं ....प्रत्येक राजकीय नेता तसे करतच असतो ...पैकी बर्याच राजकीय नेत्यांच्या शिक्षण संस्था असतातच .....माझी विजय साहेब चौगुलेना व " मी वडार महाराष्ट्राचा " ह्या संघटनेला अशी आग्रहाची विनंती आहे कि , पुणे , मुंबई , नाशिक , औरंगाबाद , नागपूर , सोलापूर , कोल्हापूर किंवा अन्य जिल्ह्याच्या जागी ...आपल्या वडार समाजाच्या विध्यार्थ्यान साठी " वसतिगृह " व जे खाणीवर काम करतात , फिरते जीवन अजूनही जगतात, मजुरी करतात अशांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय करून द्यावीत .....आपल्यासाठी हे काही अवघड गोष्ट नाहीं ...
आपल्याला बाकी वडार बांधव नक्कीच ह्या कार्यात साथ देतील .......
तो दिवस लवकर येवो ज्या दिवशी आपली खेडे गावातील गरजू मुले शहरात येवून त्यांना योग्य त्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होवो व जे वडार बांधव अजूनही मोल - मजुरी करून दिवस काढतात ...त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या सर्व वडार बांधवांचा हातभार लागो ....
जी कुचंबना आमच्या पिढीची झाली ....तशी येणाऱ्या पिढीची न होवो
जय बजरंग .........................जय वडार
No comments:
Post a Comment