Saturday, January 18, 2014

प्रिय आमुचा एक इंडिया .....महान देश हा




August 3, 2012 


प्रिय आमुचा एक इंडिया .....महान देश हा

भारत देशाला जर खरोखरेच " महान " देश बनायचे असेल तर प्रथम हे चित्र बदलायला हवे ....नाहीतर इंडिया सुपर power होईल ह्यात काही शंका नाहीं परंतु ...भारत हा नेहमी ...एकवीस (२१) कलमीच राहील ....( एकवीस कलमी गरिबी हटाव कार्यक्रम ...फक्त पानावर )

ऐश्वर्या राय बच्चन च्या बाळाच्या डायपर चा खर्च हा ,,वरील चित्रातील आईच्या संपूर्ण दिवसातील रोजंदारीच्या पेक्षाही जास्तअसावा ... आमची हि फक्त शंकाच आहे ..त्या व्यतिरिक्त त्या बद्दल आम्हाला काही म्हणायचे सुद्धा नाहीं ....परंतु जगण्यातला हा किती मोठा विरोधाभास आहे ...काही जण करोडोत खेळतात , लोळतात तर काहीना कोथिंबिरीच्या जुडीसाठी विचार करावा लागतो ..... ज्यांचे रोजचे जगणेच रोज काम करून मिळणाऱ्या मोबदल्या वर असेल तर ..त्यांच्या मुलांनी शिकायचे तरी कसे ?...त्या बदल्यात त्यांना थोडे " आरक्षण " दिले ..थोडे " अनुदान " दिले तर बिघडले कुठे ?...नाहीतरी आपण सरकारी , राजकारणी ..खाऊ - गधडे " पांढरे -हत्ती " पाळले आहेतच ...आपल्या देशात " दलाल " ह्या जातीची हि कमतरता नाहीं ....हे दलाल सर्वच क्षेत्रात व्यापून आहेत ...कष्ट नको , गुंतवणूक नको ...नुसते टाळू वरील लोणी हाणायचे .....

...आता ह्या चित्रातील आई ने व बाळाच्या बापाने सुद्धा ..थोडे मनावर घेवून ..व्यसना पासून दूर राहिले पाहिजे..नुसतीच रोज " काळी पिशवी " व दारू - गुटाक्याची संगत सोडली पाहिजे ...आळस झटकला पाहिजे ...दोन दिवस कामावर व तीन दिवस बायकोच्या पुढे बसने सोडले पाहिजे ...देव-देव , अंधश्रद्धा , नको त्या ठिकाणी खर्च , जुगार , शर्यत लावणे ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ....गरिबीला शाप न समझता चार पैसे सोबत बाळगून श्रीमंतीच्या वाटेवरची पावुले चढायला सुरु केले पाहिजे ..." असतील शिते ..तर जमतील भुते " हा जगाचा व जगण्याचाही मुलभूत नियमच आहे ...

वैभव , संपत्ती , नाव लौकिक , हे हि काही उगीच येत नसतात ..त्या हि पाठीमागे प्रत्येकाची त्याग व तपश्चर्या असतेच ...उगीच कुणाला उठ-सुठ नाव ठेवणे हि योग्य नाहीं ...असो.
 

No comments:

Post a Comment