छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो !!!
( शिवाजी महाराज म्हटले की लगेच आपण " जय भवानी ...जय शिवाजी " अशी प्रेरणादायी घोषणा द्यायला सुरुवात करतो ...परन्तु आपण अनवधानाने हे विसरतो की आपण " भवानी मातेचा " पण व " शिवाजी महाराज ह्यांचा " सुद्धा नकळत एकेरी उल्लेख करतो ....लहान मुले , दारू पिवून तर्राट झालेले , हातात चाकू -सुरे असलेली , वयस्कर मन्डळी सुद्धा जोश मध्ये आले कि अशाच घोषणा देतात ...एव्हाना , आता ती रीत किंव्हा प्रथाच झाली आहे असे वाटते ....
परंतु सुज्ञ लोकांनी असा प्रमाध आपल्या हातून होऊ देवू नये ....
महाराजांचा एकेरी उल्लेख कुठेही होऊ नये ह्याची सर्वानीच काळजी घ्यायला हवी ..
होऊ शकते स्वराज्याची प्रतिज्ञा करते वेळी शिवाजी महाराजांच्या बाल - मावळ्यांनी उत्स्पुर्त पणे अशा घोषणा दिल्या असतील व त्या पुढे ते देत राहिले असतील ....स्वराज्य स्थापनेतील त्या मावळ्यांचा कदाचित तो अधिकार हि असेल ...
परंतु म्हणून महाराजांना एकेरी बोलण्याचा अधिकार कुणीही आपल्याकडे घेवू नये ....
जो तसा अधिकार घेतो तो मूर्खच म्हणावा ...
( तथाकथित इतिहास तज्ञानो ...कृपया मला माफ करा.....मी चुकण्याची शक्यता नाकारता येत नाहीं .....
( तुमच्या दृष्टीने ...माझ्या दृष्टीने मी बरोर्बर आहे ) ...
आम्हा बहुजनासाठी शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य आणण्याचा प्रयत्न केला ...
म्हणून शिवाजी महाराजासाठी आम्ही कुठेही , कसेही , कशासाठी सुद्धा रक्त सांडायला तयार आहोत ...........
..जय शिवराय ......जय माता जिजाऊ !!!
No comments:
Post a Comment