वडार समाजाचे " हिरो " हिरोजी इटळकर
हिरो हा शब्द जरी इंग्लिश असला तरी , हिरो हा शब्द आपल्या हीरोजी इटळकर ह्यांच्याशी साधर्म्य दाखवतो म्हणून त्या संदर्भात आमचीही त्याबाबतीत हि थोडीसी चिकित्सा …
हिरो ह्या शब्दाचा शब्दकोशात आलेला अर्थ , शूर , मर्द , रणवीर , मुख्य व्यक्ती , नायक असा आहे .
छत्रपति शिवाजी महाराज ह्यांच्या काळात रूढ असलेल्या नावांच्या पुढे आदराने "जी " हा शब्द जोडला जात असे . काही उदाहरणे देतो म्हणजे आपली खात्री पटेल व त्या काळात हि अशी नावे ठेवण्याची पद्धत असावी . शिवा = शिवाजी , संभा =संभाजी , जीवा = जिवाजी ( महाले ) , संता = संताजी , धना = धनाजी , यसा = यसाजी , व्यंको ( व्यंकट राव ) = व्यंकोजी , महादू ( महादेव ) = महादजी ( शिंदे ) … इत्यादी इत्यादी . मी सुरुवातीलाच म्हटल्या प्रमाणे आपल्याकडे परंपरेने चालत आलेल्या देवादिकांच्या नावाला वा चांगल्या प्रतीकांची व्यक्तींना नावे देण्याची प्रथा होती . ह्यातील काही कर्तबगार पुरुषांनी आपला कर्तृत्वाने आपल्या व्यक्तिमत्वाचा तत्कालीन समाजामध्ये एक प्रकारचा दबदबा निर्माण केला होता व त्यामुळे त्यांना आदराने व सन्मानाने त्यांच्या नावाच्या शेवटी " जी " हा शब्द लावण्याची पद्धत रूढ झाली असावी .
आता आपण ज्यांना वडार समाजाचे म्हणतो ते श्री हीरोजी इटळकर ह्यांच्या नावातील " हिरो " हा शब्द कसा आला असावा हे पाहणे रंजक असेल कारण हिरो हा शब्द त्या अगोदर कधी वापरत असलेला कुठे आढळत नाही . हिरा वा हिरालाल अशा ह्या नावाचा साधर्म्य असलेले नाव आढळते परंतु त्यांच्या उच्चारात जाणवेल येवढा फरक आहे त्यामुळे हिरा ह्या शब्दाचा हिरो हा अपभ्रंश असेल हि शक्यता निकालात निघते . त्यामुळे हिरो हा मूळ शब्द व त्याला जोडून " जी " लावून हिरोजी हे नाव झाले असावे असे सिद्ध होते .
रायगडचा जीर्णोद्धार करण्या अगोदर व तसेच महाराष्ट्रात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात , कड्या कपाऱ्याना संरक्षणाच्या दृष्टीने असलेले महत्व पाहता उंच अशा डोंगर माथ्यावर पाण्याची व अन्य कुटुंब व सैनिकांच्या दृष्टीने यथायोग्य व्यवस्था कशी असेल ह्याचे ज्ञान त्या काळातील ठराविक असे जमातीनाच होते . त्यात दगडाशी संबंदित , बांधकामा संबंदित व अंग मेहनतीच्या दृष्टीने असे काम करणारी एकमेव जमात होती व ती म्हणजे वडार समाज . हा वडार समाज उत्तम असे दगडावर कोरीव काम करीत असे , मोठ मोठाले दगड एकमेकावर रचण्याचे अद्भुत तंत्र त्यांना अवगत होते , हाच वडार समाज चुणकळी वापरून असे काही भक्कम बांधकाम करी कि शत्रू कितीही बलाढ्य असला अथवा तोफा / उखाल्यानी जरी मारा केला तरी तटबंदीला काहीही फरक पडत नसे . गरज असेल तिथे कथिल व अन्य खनिज पदार्थ वापरून त्याला पोलादीपणा आणण्याचे कसब व तंत्र फक्त व फक्त वडार समाजाच्या त्या काळातील मुख्य मुख्य कारागीराकडे होती असे दिसते . एवढेच नाही तर रानावनात व वेगवेगळ्या ठिकाणी काम करावे लागत असल्याने जंगली श्वापदांचा व विरोधी शत्रूंचा आपल्या वडार समाजाला नेहमीच त्रास होत असे परंतु आपल्या वडार स्त्रिया व पुरुष शरीराने काटक व अंग मेहनत खूप असल्यामुळे मजबूत शरीर यष्टी असल्या कारणाने कसल्याही प्रकारच्या आक्रमणाला नेहमीच तयार असायचे . आक्रमण व insatant action ( लगेच हल्ला ) हा वडार समाजाचा गुण विशेस राहिला आहे , प्रसंगी अन्ना , दादा, बाबा करणारा आपला वडार समाज चवताळून उठून इरेला पेटला कि समोरच्याला सुपडा साफ केल्या शिवाय राहणार नाही असा वडार समाजाचा लौकिक होता . आपला वडार रानटी प्राण्यांची शिकार करण्यात हि वाकबगार होता . हरीण , ससे , रानडुकरे , घोरपडी ह्यांची शिकार करण्यात वडार समाजाचा हातखंडा होता . त्या काळातील राजे / संस्थानिक ह्यांना जेंव्हा शिकार करायची लहर येत असे त्यावेळी ते आपल्या सोबत राकट , दणकट व निष्टावान वडार बांधवालाच सोबत घेवून जात असत. शिवाजी महाराज ह्यांच्या काळाच्या अगोदर हि विहिरी , सार्वजनिक बारव , किंव्हा पाटील , ब्राह्मण किंवा जमीनदाराच्या घरात हमखास असणारी आड ( छोट्या तोंडाच्या परंतु खूप खोल असणारी व घरोघर असणारी एक प्रकारची विहीर ) ह्या बांधायला कुणी वरून देवदूत आले नव्हते , गावोगावची मंदिरे , त्यावरचे नक्षीकाम , वेगवेगळ्या देवतांच्या वेगवेगळ्या आकारमानातील सुबक मुर्त्या ह्या कुणी बाहेर देशातून मागवत नव्हते तर भल्या पहाटे उठून डोंगर रान फिरून योग्य प्रकारचा दगड अभ्यासून हे काम केवळ आणि केवळ आपला वडार समाज बांधवच करत होता आणि हे सर्व करत असताना त्यांना तेथील स्थानिक ज्यांनी हे काम करायचा ठेका दिला असायचा केवळ त्यांचाच आधार असायचा . गावोगावी अशी कलात्मक व कलाकुसुरीने भरपूर अशी नाव निघेल अशी काम करणाऱ्या वडार समाज बांधवांचे नाव म्हणूनच सर्वदूर व जाणकारा मध्ये होते .
म्हणून जेंव्हा केंव्हा एखादी विहीर , बावडी , तळे , बंधारा , आड , मंदिर , महाल , वाडा , राजवाडा , हवेली , गावाची वेस , बुरुज , किल्ला , भूमिगत वाटा , भुयारे , मजबूत तटबंदी वा मोठ मोठ्या शिळा एकावर एक रचायच्या असतील त्यावेळी ह्या प्रकारचे तंत्र असणारी वडार जमात हि नावाजलेलीच असायची , मोठ मोठ्या राजा महाराजा पर्यंत आपल्या समाज बांधावा पैकी मुख्य मुख्य कारागिरांची खबरबात गेलेली असायची . त्यातही निष्टावान व सहिष्णू म्हणून वडार समाजाची तेंव्हाही ओळख असावी जसी आज हि आहे . त्यातच परकीय शत्रूच्या आक्रमण काळात गप्प आतल्या खोलीत चुली समोर बसेल तो वडार कसला ? . शिवाजी महाराज व त्यांच्या काळात त्यांच्या हिंदवी स्वराज्य च्या हाकेला निश्चितच वडार समाज बांधवाने साद दिली असणार ह्यात शंका नाही , आणि त्यातील एक शूरवीर व स्वामिनिष्ठ असणारे एक असतील ते म्हणजे आपले वडार समाजाचे कीर्ती भूषण हिरोजी इटळकर.
परंतु मला एक सार्थ अशी शंका आहे कि त्या काळात इंग्रज , पोर्तुगीज व डच लोक व्यापाराच्या निमित्ताने आपल्याकडे होते त्यातील कुणीतरी हिरोजी इटळकर ह्यांना कुठलीतरी कामगिरी सोपवली असावी व त्या बदल्यात त्यांना hero अर्थात हिरो म्हणजे मुख्य नायक , अलौकिक असा पराक्रम करणारा अशी पदवी दिलेली असावी . ( वडार समाजाची गुन्हेगार जमातीत समाविष्ट केल्या च्या नंतर वडार समाजाची आज पर्यंत जी अवस्था झालेली आहे तेवढी वाईट अवस्था त्या काळी आपल्या समाजाची नकीच नसावी . ) व ते नावच मग श्री हिरोजी इटळकर ह्यांनी पुढे कायम ठेवले असणार . कारण त्या अगोदर इतिहासात हिरो ह्या अर्थाची एकहि महाराष्ट्रीयन व्यक्ती सापडत नाही , दिसत नाही . काही जन अशीही शंका घेतील कि मग आता इटळकर ह्या नावाचे वंशज दिसत नाहीत तर त्यावर माझे असे अनुमान आहे कि होऊ शकते एखाद्या शत्रूच्या आक्रमणात हे संपूर्ण कुटुंब कामी आले असावे , किंवा त्या ठिकाणा वरून शत्रूच्या भयाने परागंदा होवून दुसरे नाव धारण केले असावे किंवा असे हि होऊ शकते पुढे एखादा हरामी राजा किंवा संस्थानिक भेटून ह्यांच्या कडून उत्कृष्ट असे काम करून घेवून त्यांचे हात कलम करून त्यांना देशोधडीला लावले असेल . शहाजहान ने नाही का आपल्या बेगम मुमताज साठी मुमताज महल बांधला व भव्य , सुंदर कलाकृती पृथ्वीतलावर अन्य कुणी बांधू नये म्हणून त्या कारागिराचे हात कलम केले होते . तसे केल्यामुळेच तशा प्रकारची आख्यायिका प्रसिद्ध आहे . परंतु ते काहीही असले तरी शिवाजी महाराजांनी हिरोजी इटळकर ह्यांना सुभेदारी देवून नवाजले होते हे आजचा इतिहास हि सांगत आहे ते त्यांनी दाखवलेल्या कर्तबगारी मुळेच असावे . श्री हिरोजी इटळकर. ह्यांचीही महाराजावर असीम निष्टा होती म्हणूनच त्यांनी महाराज स्वारीवर असताना त्यांनी सोपवलेली कामगिरी प्रसंगी आपले सर्वस्व गहाण ठेवून पैशाची अडचण भासू न देता स्वराजाच्या राजधानीच्या पुनर्बांधणी चे काम पूर्ण केले . ह्या सेवेची दखल शिवाजी महाराजांनी हि योग्य अशीच घेतली . आपल्या राज्याभिषेक सोहळ्यात श्री हिरोजी इटळकर. ह्यांचा यथोचित असा सन्मान केला . श्री हिरोजी इटळकर. ह्यांची इच्छा होती कि ह्या किल्ल्याच्या पायरीवर त्यांचे नाव कोरलेली एक पायरी असावी ती हि त्यांची इच्छा पूर्ण झाली व आज आपण सर्व वडार बांधव त्यांचा आभिमान पूर्णपणे बाळगून आहोत .
माझ्या वडार समाज बांधवानो , आपल्याला शिकवण्यात आलेला इतिहास हा सर्वस्वी खराच असेल ह्या भ्रमात कुणी राहू नका . हा इतिहास ठराविक समूहातील लोकांनी लिहिलेला व ठराविक समुहालाच लाभदायक ठरेल असाच लिहिला गेलेला आहे . अशा रंगवलेल्या इतिहासात वडिलांना दुर्लक्षित करून , गुरु दुसऱ्या कुणाला तरी भासवून , मुलाला बदफैली व नाकर्ता असे ठरवले आहे . असे म्हणणे संपूर्ण चूक आहे व ठराविक जातीचा ह्या मध्ये वेगळाच कावा दिसून येत आहे . ज्यांनी ह्या देशात वर्ण व्यवस्था आणली तेच लोक आपल्याला सोयीस्कर असा इतिहास लिहिण्यात नेहमी गर्क असतात . काहींनी तर शिवाजी महाराजांचे चरित्र हे रंजक तर केलेच परंतु त्याला अलंकारिक असे रूप दिले त्यामुळे शिवाजी महाराजांचा प्रसार झाला असा समाज झाला असला तरी खूप कल्पना विलास केल्या मुळे विपर्यास हि भरपूर झालेला आहे .
आपल्या पैकी कित्येकांना हे हि माहित आहे नाही कल्पना नाही परंतु साक्षात शिवाजी महाराजांचा इतिहास हि काही लोकांनी जाणून बुजून लपवून ठेवलेला होता . शिवाजी महाराजांना खर्या अर्थाने लोक समोर आणले असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले ह्यांनी . त्यांनी रायगडावर जावून महाराजांचे समाधी स्थळ शोधून काढले , त्याला नवीन रूप दिले तो पर्यंत ते समाधी स्थळ कित्येक दशके धूळ खात पडलेले होते . महात्मा फुले ह्यांनी सर्व प्रथम शिवाजी महाराजावर पोवाडा लिखित स्वरुपात लिहिला व तो प्रकाशित केला . लोकांचा असा समज आहे कि गणेशोत्सव व शिवजयंती टिळकांनी सुरु केली परंतु सत्य हे आहे कि त्यांचे कितीतरी अगोदर महात्मा फुले ह्यांनी शिवजयंती सुरु केली होती .
बंधुनो , महात्मा फुले ह्यांचे उदाहरण मी मुद्दाम दिले आहे कारण आपण काही समाजातील तथाकथित सुधारलेल्या वर्गाकडून दुर्लक्षित राहिलेलो आहोत . ह्याच वर्गाने आपला इतिहास दडपून टाकलेला आहे . ह्याच लोकांनी आपली इतिहासात नोंद ठेवलेली नाही व नोंद घेतली सुद्धा नाही . तुम्हाला माहित असतील शिवाजी महाराजांचा अभ्यास हा १ ९ ० ० साला नंतरच सुरु झाला ह्याला कारण महात्मा फुले व राजश्री शाहू महाराज ह्यांनी बहुजनांचा घेतलेला कैवार हा होय . बहुतांश शिव चरित्रे हि त्या नंतरची आहेत . असो
मला इथे असे ठोकून सांगायचे आहे कि आपला इतिहास लिहायला अन्य दुसरे कुणीही येणार नाही . आपला इतिहास आपल्यालाच लिहावा लागणार आहे . इतिहास म्हणजे थोडीफार अतिशयोक्ती येतेच तेंव्हा अशी काही अतिशयोक्ती झाली तरी रेटून बोला व ठोकून लिहा व सांगा कि हाच आमचा इतिहास आहे . इतिहास ह्या विषयाची एक गम्मत सांगतो . खोटे का असेना परंतु वारंवार तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली कि तीच गोष्ट लोक खरे मानून चालतात . तेंव्हा बधुनो , विनंती आहे . …आपला इतिहास लिहायला सुरुवात करा . ज्या आपल्या अस्मितेशी जोडल्या गेलेल्या गोष्टी आहेत त्यांचे जतन करा , त्या साठी एकत्रित या . ह्या एकत्र येण्यातच समाजाचे भले आहे .
श्री हिरोजी इटळकर. ह्यांच्या रूपाने आपल्या इतिहासातील , भूतकाळातील आपल्या स्मृती जाग्या आहेत , त्यांचे जतन करणे आपले कर्तव्य आहे . श्री हिरोजी इटळकर. ह्यांच्या वर आधारित एक पुस्तक श्री विजय साहेब चौगुले ह्यांच्या प्रयत्नाने प्रकाशनासाठी तयार आहे . त्याचे प्रकाशन साहेब लवकरच करतील परंतु साहेबांनी माझ्या जवळ अशी एक इच्छा प्रकट केली आहे कि आपण सर्व महाराष्ट्रातील निवडक महत्वपूर्ण व्यक्ती १ ० ० ० / २ ० ० ० रायगडावर जमून एक जंगी व भव्य कार्यक्रम घ्यायचा आहे . त्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवलेली आहे . आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया व सकारात्मकता च पुढील दिशा ठरवेल .
आपल्या सर्व वडार समाज बांधवांच्या सेवेसी ठाईच तत्पर …….
जय बजरंग ………. जय वडार
हिरो हा शब्द जरी इंग्लिश असला तरी , हिरो हा शब्द आपल्या हीरोजी इटळकर ह्यांच्याशी साधर्म्य दाखवतो म्हणून त्या संदर्भात आमचीही त्याबाबतीत हि थोडीसी चिकित्सा …
हिरो ह्या शब्दाचा शब्दकोशात आलेला अर्थ , शूर , मर्द , रणवीर , मुख्य व्यक्ती , नायक असा आहे .
छत्रपति शिवाजी महाराज ह्यांच्या काळात रूढ असलेल्या नावांच्या पुढे आदराने "जी " हा शब्द जोडला जात असे . काही उदाहरणे देतो म्हणजे आपली खात्री पटेल व त्या काळात हि अशी नावे ठेवण्याची पद्धत असावी . शिवा = शिवाजी , संभा =संभाजी , जीवा = जिवाजी ( महाले ) , संता = संताजी , धना = धनाजी , यसा = यसाजी , व्यंको ( व्यंकट राव ) = व्यंकोजी , महादू ( महादेव ) = महादजी ( शिंदे ) … इत्यादी इत्यादी . मी सुरुवातीलाच म्हटल्या प्रमाणे आपल्याकडे परंपरेने चालत आलेल्या देवादिकांच्या नावाला वा चांगल्या प्रतीकांची व्यक्तींना नावे देण्याची प्रथा होती . ह्यातील काही कर्तबगार पुरुषांनी आपला कर्तृत्वाने आपल्या व्यक्तिमत्वाचा तत्कालीन समाजामध्ये एक प्रकारचा दबदबा निर्माण केला होता व त्यामुळे त्यांना आदराने व सन्मानाने त्यांच्या नावाच्या शेवटी " जी " हा शब्द लावण्याची पद्धत रूढ झाली असावी .
आता आपण ज्यांना वडार समाजाचे म्हणतो ते श्री हीरोजी इटळकर ह्यांच्या नावातील " हिरो " हा शब्द कसा आला असावा हे पाहणे रंजक असेल कारण हिरो हा शब्द त्या अगोदर कधी वापरत असलेला कुठे आढळत नाही . हिरा वा हिरालाल अशा ह्या नावाचा साधर्म्य असलेले नाव आढळते परंतु त्यांच्या उच्चारात जाणवेल येवढा फरक आहे त्यामुळे हिरा ह्या शब्दाचा हिरो हा अपभ्रंश असेल हि शक्यता निकालात निघते . त्यामुळे हिरो हा मूळ शब्द व त्याला जोडून " जी " लावून हिरोजी हे नाव झाले असावे असे सिद्ध होते .
रायगडचा जीर्णोद्धार करण्या अगोदर व तसेच महाराष्ट्रात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात , कड्या कपाऱ्याना संरक्षणाच्या दृष्टीने असलेले महत्व पाहता उंच अशा डोंगर माथ्यावर पाण्याची व अन्य कुटुंब व सैनिकांच्या दृष्टीने यथायोग्य व्यवस्था कशी असेल ह्याचे ज्ञान त्या काळातील ठराविक असे जमातीनाच होते . त्यात दगडाशी संबंदित , बांधकामा संबंदित व अंग मेहनतीच्या दृष्टीने असे काम करणारी एकमेव जमात होती व ती म्हणजे वडार समाज . हा वडार समाज उत्तम असे दगडावर कोरीव काम करीत असे , मोठ मोठाले दगड एकमेकावर रचण्याचे अद्भुत तंत्र त्यांना अवगत होते , हाच वडार समाज चुणकळी वापरून असे काही भक्कम बांधकाम करी कि शत्रू कितीही बलाढ्य असला अथवा तोफा / उखाल्यानी जरी मारा केला तरी तटबंदीला काहीही फरक पडत नसे . गरज असेल तिथे कथिल व अन्य खनिज पदार्थ वापरून त्याला पोलादीपणा आणण्याचे कसब व तंत्र फक्त व फक्त वडार समाजाच्या त्या काळातील मुख्य मुख्य कारागीराकडे होती असे दिसते . एवढेच नाही तर रानावनात व वेगवेगळ्या ठिकाणी काम करावे लागत असल्याने जंगली श्वापदांचा व विरोधी शत्रूंचा आपल्या वडार समाजाला नेहमीच त्रास होत असे परंतु आपल्या वडार स्त्रिया व पुरुष शरीराने काटक व अंग मेहनत खूप असल्यामुळे मजबूत शरीर यष्टी असल्या कारणाने कसल्याही प्रकारच्या आक्रमणाला नेहमीच तयार असायचे . आक्रमण व insatant action ( लगेच हल्ला ) हा वडार समाजाचा गुण विशेस राहिला आहे , प्रसंगी अन्ना , दादा, बाबा करणारा आपला वडार समाज चवताळून उठून इरेला पेटला कि समोरच्याला सुपडा साफ केल्या शिवाय राहणार नाही असा वडार समाजाचा लौकिक होता . आपला वडार रानटी प्राण्यांची शिकार करण्यात हि वाकबगार होता . हरीण , ससे , रानडुकरे , घोरपडी ह्यांची शिकार करण्यात वडार समाजाचा हातखंडा होता . त्या काळातील राजे / संस्थानिक ह्यांना जेंव्हा शिकार करायची लहर येत असे त्यावेळी ते आपल्या सोबत राकट , दणकट व निष्टावान वडार बांधवालाच सोबत घेवून जात असत. शिवाजी महाराज ह्यांच्या काळाच्या अगोदर हि विहिरी , सार्वजनिक बारव , किंव्हा पाटील , ब्राह्मण किंवा जमीनदाराच्या घरात हमखास असणारी आड ( छोट्या तोंडाच्या परंतु खूप खोल असणारी व घरोघर असणारी एक प्रकारची विहीर ) ह्या बांधायला कुणी वरून देवदूत आले नव्हते , गावोगावची मंदिरे , त्यावरचे नक्षीकाम , वेगवेगळ्या देवतांच्या वेगवेगळ्या आकारमानातील सुबक मुर्त्या ह्या कुणी बाहेर देशातून मागवत नव्हते तर भल्या पहाटे उठून डोंगर रान फिरून योग्य प्रकारचा दगड अभ्यासून हे काम केवळ आणि केवळ आपला वडार समाज बांधवच करत होता आणि हे सर्व करत असताना त्यांना तेथील स्थानिक ज्यांनी हे काम करायचा ठेका दिला असायचा केवळ त्यांचाच आधार असायचा . गावोगावी अशी कलात्मक व कलाकुसुरीने भरपूर अशी नाव निघेल अशी काम करणाऱ्या वडार समाज बांधवांचे नाव म्हणूनच सर्वदूर व जाणकारा मध्ये होते .
म्हणून जेंव्हा केंव्हा एखादी विहीर , बावडी , तळे , बंधारा , आड , मंदिर , महाल , वाडा , राजवाडा , हवेली , गावाची वेस , बुरुज , किल्ला , भूमिगत वाटा , भुयारे , मजबूत तटबंदी वा मोठ मोठ्या शिळा एकावर एक रचायच्या असतील त्यावेळी ह्या प्रकारचे तंत्र असणारी वडार जमात हि नावाजलेलीच असायची , मोठ मोठ्या राजा महाराजा पर्यंत आपल्या समाज बांधावा पैकी मुख्य मुख्य कारागिरांची खबरबात गेलेली असायची . त्यातही निष्टावान व सहिष्णू म्हणून वडार समाजाची तेंव्हाही ओळख असावी जसी आज हि आहे . त्यातच परकीय शत्रूच्या आक्रमण काळात गप्प आतल्या खोलीत चुली समोर बसेल तो वडार कसला ? . शिवाजी महाराज व त्यांच्या काळात त्यांच्या हिंदवी स्वराज्य च्या हाकेला निश्चितच वडार समाज बांधवाने साद दिली असणार ह्यात शंका नाही , आणि त्यातील एक शूरवीर व स्वामिनिष्ठ असणारे एक असतील ते म्हणजे आपले वडार समाजाचे कीर्ती भूषण हिरोजी इटळकर.
परंतु मला एक सार्थ अशी शंका आहे कि त्या काळात इंग्रज , पोर्तुगीज व डच लोक व्यापाराच्या निमित्ताने आपल्याकडे होते त्यातील कुणीतरी हिरोजी इटळकर ह्यांना कुठलीतरी कामगिरी सोपवली असावी व त्या बदल्यात त्यांना hero अर्थात हिरो म्हणजे मुख्य नायक , अलौकिक असा पराक्रम करणारा अशी पदवी दिलेली असावी . ( वडार समाजाची गुन्हेगार जमातीत समाविष्ट केल्या च्या नंतर वडार समाजाची आज पर्यंत जी अवस्था झालेली आहे तेवढी वाईट अवस्था त्या काळी आपल्या समाजाची नकीच नसावी . ) व ते नावच मग श्री हिरोजी इटळकर ह्यांनी पुढे कायम ठेवले असणार . कारण त्या अगोदर इतिहासात हिरो ह्या अर्थाची एकहि महाराष्ट्रीयन व्यक्ती सापडत नाही , दिसत नाही . काही जन अशीही शंका घेतील कि मग आता इटळकर ह्या नावाचे वंशज दिसत नाहीत तर त्यावर माझे असे अनुमान आहे कि होऊ शकते एखाद्या शत्रूच्या आक्रमणात हे संपूर्ण कुटुंब कामी आले असावे , किंवा त्या ठिकाणा वरून शत्रूच्या भयाने परागंदा होवून दुसरे नाव धारण केले असावे किंवा असे हि होऊ शकते पुढे एखादा हरामी राजा किंवा संस्थानिक भेटून ह्यांच्या कडून उत्कृष्ट असे काम करून घेवून त्यांचे हात कलम करून त्यांना देशोधडीला लावले असेल . शहाजहान ने नाही का आपल्या बेगम मुमताज साठी मुमताज महल बांधला व भव्य , सुंदर कलाकृती पृथ्वीतलावर अन्य कुणी बांधू नये म्हणून त्या कारागिराचे हात कलम केले होते . तसे केल्यामुळेच तशा प्रकारची आख्यायिका प्रसिद्ध आहे . परंतु ते काहीही असले तरी शिवाजी महाराजांनी हिरोजी इटळकर ह्यांना सुभेदारी देवून नवाजले होते हे आजचा इतिहास हि सांगत आहे ते त्यांनी दाखवलेल्या कर्तबगारी मुळेच असावे . श्री हिरोजी इटळकर. ह्यांचीही महाराजावर असीम निष्टा होती म्हणूनच त्यांनी महाराज स्वारीवर असताना त्यांनी सोपवलेली कामगिरी प्रसंगी आपले सर्वस्व गहाण ठेवून पैशाची अडचण भासू न देता स्वराजाच्या राजधानीच्या पुनर्बांधणी चे काम पूर्ण केले . ह्या सेवेची दखल शिवाजी महाराजांनी हि योग्य अशीच घेतली . आपल्या राज्याभिषेक सोहळ्यात श्री हिरोजी इटळकर. ह्यांचा यथोचित असा सन्मान केला . श्री हिरोजी इटळकर. ह्यांची इच्छा होती कि ह्या किल्ल्याच्या पायरीवर त्यांचे नाव कोरलेली एक पायरी असावी ती हि त्यांची इच्छा पूर्ण झाली व आज आपण सर्व वडार बांधव त्यांचा आभिमान पूर्णपणे बाळगून आहोत .
माझ्या वडार समाज बांधवानो , आपल्याला शिकवण्यात आलेला इतिहास हा सर्वस्वी खराच असेल ह्या भ्रमात कुणी राहू नका . हा इतिहास ठराविक समूहातील लोकांनी लिहिलेला व ठराविक समुहालाच लाभदायक ठरेल असाच लिहिला गेलेला आहे . अशा रंगवलेल्या इतिहासात वडिलांना दुर्लक्षित करून , गुरु दुसऱ्या कुणाला तरी भासवून , मुलाला बदफैली व नाकर्ता असे ठरवले आहे . असे म्हणणे संपूर्ण चूक आहे व ठराविक जातीचा ह्या मध्ये वेगळाच कावा दिसून येत आहे . ज्यांनी ह्या देशात वर्ण व्यवस्था आणली तेच लोक आपल्याला सोयीस्कर असा इतिहास लिहिण्यात नेहमी गर्क असतात . काहींनी तर शिवाजी महाराजांचे चरित्र हे रंजक तर केलेच परंतु त्याला अलंकारिक असे रूप दिले त्यामुळे शिवाजी महाराजांचा प्रसार झाला असा समाज झाला असला तरी खूप कल्पना विलास केल्या मुळे विपर्यास हि भरपूर झालेला आहे .
आपल्या पैकी कित्येकांना हे हि माहित आहे नाही कल्पना नाही परंतु साक्षात शिवाजी महाराजांचा इतिहास हि काही लोकांनी जाणून बुजून लपवून ठेवलेला होता . शिवाजी महाराजांना खर्या अर्थाने लोक समोर आणले असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले ह्यांनी . त्यांनी रायगडावर जावून महाराजांचे समाधी स्थळ शोधून काढले , त्याला नवीन रूप दिले तो पर्यंत ते समाधी स्थळ कित्येक दशके धूळ खात पडलेले होते . महात्मा फुले ह्यांनी सर्व प्रथम शिवाजी महाराजावर पोवाडा लिखित स्वरुपात लिहिला व तो प्रकाशित केला . लोकांचा असा समज आहे कि गणेशोत्सव व शिवजयंती टिळकांनी सुरु केली परंतु सत्य हे आहे कि त्यांचे कितीतरी अगोदर महात्मा फुले ह्यांनी शिवजयंती सुरु केली होती .
बंधुनो , महात्मा फुले ह्यांचे उदाहरण मी मुद्दाम दिले आहे कारण आपण काही समाजातील तथाकथित सुधारलेल्या वर्गाकडून दुर्लक्षित राहिलेलो आहोत . ह्याच वर्गाने आपला इतिहास दडपून टाकलेला आहे . ह्याच लोकांनी आपली इतिहासात नोंद ठेवलेली नाही व नोंद घेतली सुद्धा नाही . तुम्हाला माहित असतील शिवाजी महाराजांचा अभ्यास हा १ ९ ० ० साला नंतरच सुरु झाला ह्याला कारण महात्मा फुले व राजश्री शाहू महाराज ह्यांनी बहुजनांचा घेतलेला कैवार हा होय . बहुतांश शिव चरित्रे हि त्या नंतरची आहेत . असो
मला इथे असे ठोकून सांगायचे आहे कि आपला इतिहास लिहायला अन्य दुसरे कुणीही येणार नाही . आपला इतिहास आपल्यालाच लिहावा लागणार आहे . इतिहास म्हणजे थोडीफार अतिशयोक्ती येतेच तेंव्हा अशी काही अतिशयोक्ती झाली तरी रेटून बोला व ठोकून लिहा व सांगा कि हाच आमचा इतिहास आहे . इतिहास ह्या विषयाची एक गम्मत सांगतो . खोटे का असेना परंतु वारंवार तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली कि तीच गोष्ट लोक खरे मानून चालतात . तेंव्हा बधुनो , विनंती आहे . …आपला इतिहास लिहायला सुरुवात करा . ज्या आपल्या अस्मितेशी जोडल्या गेलेल्या गोष्टी आहेत त्यांचे जतन करा , त्या साठी एकत्रित या . ह्या एकत्र येण्यातच समाजाचे भले आहे .
श्री हिरोजी इटळकर. ह्यांच्या रूपाने आपल्या इतिहासातील , भूतकाळातील आपल्या स्मृती जाग्या आहेत , त्यांचे जतन करणे आपले कर्तव्य आहे . श्री हिरोजी इटळकर. ह्यांच्या वर आधारित एक पुस्तक श्री विजय साहेब चौगुले ह्यांच्या प्रयत्नाने प्रकाशनासाठी तयार आहे . त्याचे प्रकाशन साहेब लवकरच करतील परंतु साहेबांनी माझ्या जवळ अशी एक इच्छा प्रकट केली आहे कि आपण सर्व महाराष्ट्रातील निवडक महत्वपूर्ण व्यक्ती १ ० ० ० / २ ० ० ० रायगडावर जमून एक जंगी व भव्य कार्यक्रम घ्यायचा आहे . त्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवलेली आहे . आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया व सकारात्मकता च पुढील दिशा ठरवेल .
आपल्या सर्व वडार समाज बांधवांच्या सेवेसी ठाईच तत्पर …….
जय बजरंग ………. जय वडार
No comments:
Post a Comment