Wednesday, January 15, 2014

भटक्या - विमुक्ता , अरे मुरदाडा कुठे आहेस तू ? आहेस कुठे , जागा हो ! ! !



निषेध ! ! ! निषेध ! ! ! निषेध ! ! !

महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध ! ! !

भटक्या - विमुक्ता , अरे मुरदाडा कुठे आहेस तू ?

आहेस कुठे जागा हो ! ! !

महाराष्ट्र सरकार , कुंभ - मेळ्या सारख्या धार्मिक कार्याला २३८० कोटी रुपये मंजूर करत आहे व आपले भटके - विमुक्त लोक अन्न , वस्त्र , निवारा ह्या मुलभुत गोष्टी पासून हि वंचित आहेत आणि हे रात - आंधळे झालेले सरकार सर्व समजत असून हि मतांचे राजकारण करण्यात मश्गुल आहे . एकीकडे पुरोगामित्वाचा टेंभा मिरवायचा ! , तिथेच फुले , शाहू , आंबेडकरांचे नाव उठ-सुठ घेत बसायचे व दुसरीकडे तीर्थ यात्रा करायला ( हज ) कोट्यावधी रुपये मजूर करतात , आता नाशिक कुंभ - मेळ्या साठी २३८० कोटी रुपये मंजूर केले आहेत . पुरोगामित्वाच्या नावाखाली सरकार हे कुठले धोरण अवलंबू पाहत आहे ? भटके - विमुक्त हे ह्या देशाचे , ह्या महाराष्ट्र भूमीचे पुत्र नाही आहेत काय ? मग ह्या सरकारला ह्यांची दयनीय अवस्था दिसत नाही काय ? कि कुठला तरी मोठा आगडोंब करायला लागेल तेंव्हाच ह्यांना जाग येणार आहे ?

हे महाराष्ट्र सरकार खूप अति करायला लागले आहे . भेद - भाव व सापत्न वागणूक देत आहे भटक्या - विमुक्तांना . श्री हरी नरके सर ह्यांच्या म्हणण्या नुसार केंद्र सरकारने भटक्या विमुक्तांसाठी २०१२ साली १ कोटी एवढी सढळ ( ? ) मदत केली होती. त्यातील १ लाख फक्त खर्च झाले. बाकीचे परत गेले....(सोर्स: प्रा. हरी नरके)। .वसंतराव नाईक महामंडळाला अनुदान अगदी मार्च महिन्यात मान्य होते , ते हि अगदी तुटपुंजे असते . बाकीच्या जातीना ४००० कोटी / ५००० कोटी व भटक्या - विमुक्तांना धतुरे हि मिळत नाही . निधी आला कधी व परत जातो कधी किंवा दुसरीकडे कधी वळवला जातो कुणालाच कळत नाही , कारण आपल्यातीलच ज्यांचे भागले आहे ते सुस्तावले आहेत , बायका मुलात रममाण आहेत , शिक्षण घेवून समाजासाठी त्या शिक्षणाचा उपयोग करतील असे वाटले होते परंतु हे लुगड्यातच गुरफटले आहेत सगळे , मर्द बनून बाहेर जातीसाठी लढायला ह्यांच्याच्याने बाहेर हि निघवत नाही .
दोष कुणाला द्यावा ? ? ? ? सरकारला कि आमच्या आम्हालाच ? ? ? ?

भटक्या - विमुक्तानो , हे सरकार सहजा - बधणारे नाही , ह्यांचे जातीचेच राजकारण चालू असते . हे लोक फक्त आपल्याला वापरून घेत असतात . आपण वापरले जात आहोत हे हि आपल्यातील कित्येकांना कळत नाही . कळले तरी वळत नाही . आणि कळून ते दुसऱ्यांना सांगायची दानत नाही . बरे ऐकून घेण्याचा हि मोठेपणा हि आमच्यात नाही , साले , आम्ही मिजासीतच मरतो . दोष कुणाला द्यावा ? ? ? ?

उठा , भटक्या - विमुक्तातील हर एक समाज बांधवानो , ह्या सरकारचा पुरोगामित्वाचा बुरखा टराटरा फाडून टाका , भटक्या - विमुक्ता मधील खदखदता असंतोष जाहीर पणे प्रकट करा . सरकारचा जाहीर निषेध करा . ह्यांच्या डोक्यावरचे केसच नाही तर ओठावरल्या मिशाही ताठ झाल्या पाहिजेत .

आमचा कुंभ - मेळ्याला विरोध असण्याचे कारण नाही , परंतु कुंभ - मेळ्यासाठी ज्या सहजतेने अशी रक्कम मंजूर झाली त्या प्रवृतीला आमचा विरोध आहे . आम्ही इकडे आंदोलने करतॊय , मेळावे घेतोय , वर्षोन वर्षे मागणी करतोय तरी हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखी ढम्मच आहे . ह्या सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहू नका समाज बंधुनो .

मी आज महाराष्ट्र सरकारच्या ह्या दुटप्पी धोरणाचा , फसव्या पुरोगामित्वाचा , समाजामध्ये विषमता टिकवून ठेवण्याच्या धोरणाचा व महाराष्ट्रातील आपल्याच नागरिकांना मुलभुत सोयी - सुविधापासून व हक्कापासून वंचित ठेवले आहे म्हणून जाहीर निषेध करत आहे . . . . .

मला ह्या असल्या सरकारची लाज वाटत आहे . .( जे सरकार फक्त आमच्यासाठीच निधी शिलक नाही असे कारण सांगत असते . )

जय बजरंग . . . . . जय वडार

( आणि हे २३८० कोटी रुपये जे आहेत ते फुकाफुकी व खाण्या - पिण्यावारी व सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्यावारीच जाणार आहेत . मेळा संपला कि महानगरपालिका कामगारांचे ती घाण काढता काढता नाकी नऊ येणार आहेत . . त्याच्या साठी अवश्य करा परंतु जी माणसे अन्न , वस्त्र व निवाऱ्या वाचून हाय हाय करतात , त्यांच्यासाठी तरी जर मोठे मन ठेवून काही गोष्टी सरकारने कराव्यात .६६ वर्षा नंतर हि आम्हाला जातीचा दाखला शोधायला कुठे कुठे फिरायला लागते , मग ह्या सरकारच उपयोग काय ? हे सरकार मुळात आमचे नाहीच अशीच आमची आता भावना झाली आहे . ज्या सोयी - सवलती मिळत आहेत त्यात असा काही लोच्या करून ठेवला आहे कि त्या मिळूच नयेत . . . . . आपल्याला हीच प्रवृत्ती आड येत आहे ,. कुंभ - मेळ्याला आमच्या शुभेच्छा )


No comments:

Post a Comment