Sunday, January 19, 2014

श्री सुधीर पवार ...." मी वडार महाराष्ट्राचा " ह्या संघटनेतील सर्वात महत्वाचे नाव ....सरकारी नोकरी सांभाळून वडार समाज सुधारणे साठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरु असतात ...

गावो-गावीच्या बैठका , जेष्ठ वडार बांधवांचे सल्ले घेणे , व ह्यातून आपली " मी वडार महाराष्ट्राचा " हि संघटना कशी नवा रुपाला येईल हे पाहणे ..आणि मी जर एवढेच म्हणून थांबलो तर त्यांच्यावर अन्याय होईल ....त्यांचे व त्यांच्या मंत्रालय मित्र परिवाराचे सर्व प्रयत्न हे सर्व वडार बांधवांचे भल्यासाठी चाललेले आहेत ...श्री सुधीर पवार साहेबांचे नाव घ्यायचे व मंत्रालय मित्र मंडळींचा उल्लेख नाहीं असे होणार नाहीं ....

आपल्या वडार समाजाला " मंत्रालय टीम " हि एक भेटच आहे ...हे आपले बांधव शासकीय पातळीवरून आपल्यासाठी खास असे प्रयत्न करत आहेत ...

श्री सुधीर पवार व मंत्रालय टीमच्या प्रयत्नांना निच्शितच चांगले परिणाम दिसून येत आहेत , कधी नव्हे तो आपला समाज आता एकवटू लागलेला आहे ...चांगले शिकलेले तरुण वर्ग आपल्या वडार समाजाच्या नावाखाली " जय बजरंग ....जय वडार " अशी गर्जना करू लागला आहे ...तरुणांना आशेचा किरण दिसू लागलेला आहे तसेच आपली भोळे - भाबडे गरीब बांधव परिवर्तनाची आशा बाळगून आहेत ...श्री सुधीर पवार साहेब , आपल्या प्रयत्नांना आम्हा वडार बांधवांचा नेहमीच पाठिंबा राहील ......ह्यात काही किंतु नाहीं वा परंतु हि नाहीं ...

श्री विजय धनवडे ह्यांच्या पोस्टवर आपला " सच्च्या वडार बांधव " असा उल्लेख्ख वाचला ..वाचून मलाच खजील झाल्यासारखे झाले ..पवार साहेब तुमच्या बद्दल मी पूर्वीच लिहिणार होतो ..परंतु ते आता पर्यंत जमलेच नव्हते ...आमच्या म्हणण्याला व बोलण्याला काही किमत नाहीं परंतु श्री विजय धनवडे साहेब म्हणतात त्याप्रमाणे आपणच सच्चे वडार बांधव आहात .....व आपण अशाच सच्च्या वडार बांधवांची एक फळीच निर्माण करावी हीच आपल्या कडून अपेक्षा ....

श्री सुधीर पवार साहेब , मला माहित आहे मी तुमचा गुनेह्गार आहे ...तुम्ही माझ्याकडे काही विचारणा केली होतीत परंतु मी ती पूर्ण करू शकलो नाहीं ...ह्या बाबतीत मी तुमचाच नाहीं बर्याच जणांचा दोषी आहे ...परंतु भविष्यात प्रत्यक्ष भेटीचा योग नक्कीच येईल ...

श्री विजय धनवडे ह्यांचे आभार ,त्यांच्यामुळे वरील सर्व लिहिले ...आपल्या सर्वांचे एकाच लक्ष्य आहे ...ते म्हणजे फक्त आणी फक्त " वडार समाज हित " ...सुसंस्कृत , सुशिक्षित , संघटीत , निर्व्यसनी व भविष्याचा वेध घेणारा , दूखात व कष्टात न राहता ...सूखा - समाधानात राहणारा " आधुनिक वडार समाज " निर्माण झाला पाहिजे ......आणि hich सर्व वडार बांधवांची इच्छा आहे ....

जय बजरंग .......जय वडार
 

No comments:

Post a Comment