संघटनेसाठी " कुसाळकर ब्रदर्स " ह्यांच्याकडून काही मार्गदर्शक मुद्दे
( १ ) सर्व समाज बांधवाना आपल्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची त्यांच्या समाजकार्य व कौटुंबिक पार्श्वभूमी सहित माहिती करून द्यायला हवी . त्यांचे संघटनेतील स्थान , त्यांचा संपर्काचा पत्ता व त्यांचा संपर्क क्रमांक इत्यादी तपशील असावेत .
( २ ) संघटनेचे " उदिष्टे " व निश्षित केलेले " ध्येय " हे स्पष्टपणे अधोरेखित केलेले असावेत .
( ३ ) संघटनेची वर्षभराची करणाऱ्या / हाती घेणाऱ्या कामांची " कार्यक्रम - पत्रिका " हि अगोदरच तयार असावी .
( ४ ) संघटनेचे " आर्थिक धोरण " हे सुस्पष्ट असावे , संघटना हि आर्थिक - दृष्ट्या सक्षम असावी व त्यासाठी आर्थिक फंड उभे करण्यासाठी संघटने अंतर्गत एक जबाबदार समितीचे गठन करावे जेणे करून आयत्या वेळी माननीय अध्यक्षावर वा इतरावर आर्थिक बोजा पडू नये .
( ५ ) संघटने मध्ये एखादे बाहेरून सल्ले देणारे " सल्लागार मंडळ " अथवा एखादी " टीम " असेल तर त्या मंडळाने ने फक्त संघटनेच्या कार्यकारिणी शी धोरणात्मक दृष्ट्या चर्चा / मार्गदर्शन करावे व संघटनेच्या अंतर्गत कारभारात ढवळा - ढवळ करू नये . ( तशी संघटनेने पूर्ण वेळ जबाबदारी सोपवली असेल तर काहीच हरकत नाही )
( ६ ) पार्ट - टाइम अगर " on - duty " संघटनेचे कार्य करणे ह्या मुळे आपण संघटनेच्या कार्याला पूर्ण न्याय देवू शकत नाही व त्या मुळे संघटनेची वाढी ची गती व कार्य थांबते . संघटने मध्ये काही पदे व काही कर्मचारी हे पगारी हवेत त्यासाठी संघटने कडे आर्थिक धोरण व राखीव निधी हवा . ( ज्यांचा संघटनेच्या कार्य पद्धतीशी कर्तव्य नसून त्यांना सोपवलेल्या कामाशी निष्ठा असली पाहिजे )
.
( ७ ) कुठलेही उदिष्ट्य हे पूर्ण करण्यासाठी एकट्याचे प्रयत्न अपुरे पडत असतात त्यामुळे supporting टीम व back - up टीम असणे खूप गरजेचे आहे .
( ८ ) जबाबदाऱ्या ह्या वाटून घेतल्या पाहिजेत त्याचे व्यवस्थित distrubution झाले पाहिजे .
( ९ ) पदाधिकाऱ्याना व जबाबदार कार्यकर्त्यांना जेवड्या शक्य आहेत तेवढ्या powars दिल्या पाहिजेत .
( १ ० ) पदाधिकारी व जबाबदारी सोपवलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्य-कक्षेच्या मर्यादेत decision making चे अधिकार द्यायला हवेत .
( १ १ ) decision making अर्थात निर्णय प्रक्रिया हि कार्यकर्ता , पदाधिकारी , अध्यक्ष अशा पद्धतीने असावी व मधल्या जबाबदार व्यक्तीला decision making मध्ये गाळू नये नये त्यामुळे दुर्लक्षिले गेल्याची भवन निर्माण होवून व्यक्ती बद्दल व पर्यायाने संघटने बद्दल आपुलकी जिव्हाळा कमी होण्याची शक्यता आहे .
( १ २ ) संघटनेच्या अध्यक्षा पर्यंत सामान्य कार्यकर्त्याने केलेल्या कार्याची माहिती नियोजन बद्ध रित्या व step by step ने गेलीच पाहिजे व त्याची दखल अध्यक्षा - सहित संघटनेच्या पदाधिकार्यांनी घ्यायला हवी . तशी रचना बनवायला हवा , तशी पद्धती स्वीकारायला हवी .
( १ ३ ) संघटनेने घेतलेले निर्णय , सूचना , आदेश हे संघटनेच्या अधिकृत पत्रा मार्फत शेवटच्या कार्यकर्त्या पर्यंत , समाज बांधवा पर्यंत पोहोचली पाहिजे .
( १ ४ ) प्रत्येक जबाबदार कार्यकर्त्याचे कार्याची saparate file बनवली गेली पाहिजे व त्याला उत्तेजन / प्रोत्साहन दिले गेले पाहिजे .
( १ ५ ) कार्यकर्ता आर्थिक दृष्ट्या संपन्न कसा होईल व तो आर्थिक विवंचनेत न राहता समाज कार्यात कसा जास्तीत जास्त सहभाग घेईल हे संघटनेने त्यांच्या क्षमतेत पाहायला पाहिजे .
( १ ६ ) काही कार्यकर्त्यामुळे संघटनेची तसेच समाजाची बदनामी होत असेल तर संघटनेने त्याची त्वरित दखल घेतली पाहिजे व अशांना प्रसंगी समज देवून व गंभीर प्रसंगी संघटनेच्या बाहेर काढून संघटनेची प्रतिमा सतत जपली पाहिजे .
( १ ७ ) संघटने कडून नित्य नियमाने ठराविक दिवस , ठराविक उत्सव व ठराविक कार्यक्रम हे घेतलेच गेले पाहिजेत व त्याच्या तारखा ह्या पूर्व - नियोजित अथवा ठरलेल्याच असाव्यात .
( १ ८ ) संघटने कडून समाजातील जेष्टांचा , समाजातील विशेष कार्य केलेल्या गुणवंतांचा , महिलांचा व मुलांचा सत्कार हा वर्षातून एकदा ठराविक दिवशी घेतलाच गेला पाहिजे .
( १ ९ ) संघटनेच्या नावावर शिष्य - वृत्ती , उच्च - शिक्षणसाठी मदत , अभ्यस - दौरे इ. कार्यक्रम आखले गेले पाहिजेत .
( २ ० ) समाजातील वृद्ध , विधवा , निराधार कुटुंबीय बद्दल संघटनेचे उदार धोरण अवलंबून त्यांचा आधार बनले पाहिजे . तसे आपल्या संघटनेच्या घटने मध्ये त्यांना स्थान दिले पाहिजे
( २ १ ) समाजातील सर्व थरातील व्यक्तींना समाज प्रबोधन होईल असे / समाजाच्या हिताचे निर्णय पोहोचतील ह्या साठी प्रसिद्धी विभाग अथवा जाहिरात ह्या संबंधी सु - निश्षित असे दूरदृष्टीचे धोरण हवे .
( २ २ ) स्थानीय शाखा , तसेच तालुका / जिल्हा संपर्क कार्यालये व मुख्य संपर्क कार्यालय हे संघटनेच्या मालकीची अथवा भाड्याने अथवा तात्पुरत्या स्वरुपात असतील तर ते मुख्य संघटनेच्या नावावर असावेत .
( २ ३ ) स्थानिक / तालुका / जिल्हा वा कुठलेही कार्यालय हे कुणाच्याही घरात असू नये व व त्यावर कुणा एकाची मालकी आहे असे स्वरूप येवू नये . ते संघटनेच्या वाढीच्या दृष्टीने हानिकारक आहे . ( कधी तेथील स्थानिक पदाधिकारी बदलला तर संपूर्ण शाखेवरच त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे . )
( २ ४ ) कुठलेही पद देताना त्याची संपती , त्याचा दिखाऊपणा , त्याचे मौखिक बोलणे ह्यावर न जाता … त्याला समाजाबद्दल असलेली तळमळ , तो समाजासाठी करत असलेले संघटन , त्यासाठी गोळा करत असलेले दस्त-ऐवज , व त्याची प्रामाणिकता , चारित्र्य व समर्पण करण्याची वृत्ती ह्या गोष्टी पाहून दिली जावीत .
( २ ५ ) कार्यकर्त्याची / पदाधिकार्याची मूल्यमापनाची आधारभूत अशी व्यवस्था संघटनेत हवी व त्या आधारे त्यांना जबाबदारी व अधिकार देवून कुणावर हि संघटनेत अन्याय होत नाही हि भावना रुजवावी .
( २ ६ ) खुशामत , चापलुसी , नेत्यांच्या पुढे पुढे करून त्यांची मर्जी राखण्याचा प्रयत्न करणारे , बुद्धी - भेद करणाऱ्या व्यक्ती ह्या समाजासाठी तसेच संघटनेच्या वाढी साठी खूप अडचणीच्या असतात त्यामुळे त्यांना संघटनेच्या कार्य कक्षेतून नेहमी बाजूला ठेवावे .
( २ ७ ) संघटने मध्ये महिलांना विशेष व आदराचे , सन्मानाचे व बरोबरीचे स्थान हवे . त्यानाही जबाबदारीची पदे व अधिकार असायला हवेत . व संघटनेतील महिलाकडे विशेष आदराने पहिले जावे ह्याची दक्षता घेतली गेली पाहिजे .
( २ ८ ) आपल्या संघटनेला सहायभूत ठरतील अशा व्यक्ती , संस्था व अनेक राजकीय पक्ष , अशांना आपल्या संघटनेचे पर्यायाने आपल्या समाजाचे हित - चिंतक म्हणून जोडता आले पाहिजे .
( २ ९ ) कुणीही कार्यकर्ता , पदाधिकारी संघटनेच्या महत्वाच्या मिटींगला येताना योग्य ती सर्व कागद पत्रे , टिप्पणे , मुद्दे ह्यांच्या सर्व तयारी निशी आले पाहिजे व आपले म्हणणे मुद्दे सूद व प्रभावीपणे मांडले पाहिजेत .
( ३ ० ) सर्व आदरणीय व्यक्ती ह्या मीटिंग ला वेळात वेळ काढून आलेल्या असतात त्या मुळे आपण कुठल्या कारणासाठी एकत्र आलो आहोत त्याचे भान असणे गरजेचे आहे त्यामुळे निष्कारण विनोद करणे व बाष्कळ बडबड करणे टाळलेच पाहिजे .
( ३ १ ) मत - भेदानंतर हि निष्कर्षावर येता आले पाहिजे व आपल्या विचारात लवचिकता असली पाहिजे व सर्वांच्या समाधानासाठी " आपले तेच खरे " हा टोकाचा विचाराला मुरड घातली पाहिजे . सर्वाना सोबत घेताना ह्या गुणाचा अंगीकार करणे खूप गरजेचे आहे .
( ३ २ ) नव्या पिढीला व नवीन तरुणांना संघटनेत काम करायला संधी मिळावी म्हणून जेष्ठ व्यक्तींनी काळाची पाऊले ओळखून त्यांना संधी दिली पाहिजे .
( ३ ३ ) आपल्याला संघटने मध्ये पदाधिकारी म्हणून काम करायला संधी नाही मिळाली तरी त्यामुळे नेतृत्वावरील आपला विश्वास कायम राहायला हवा . नेतृत्वाने देखील योग्य ते बदल करून सामान्य कार्यकर्त्याच्या नेतृत्व गुणाला संधी दिली पाहिजे .
( ३ ४ ) आर्थिक योगदानाशिवाय कुठलेही संघटन योग्य रित्या कार्य करू शकत नाही म्हणून संघटनेतील प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून नियमित पणेआर्थिक भर हा उचललाच पाहिजे . व ऐनवेळी पैसे गोळाकरायचे टाळले पाहिजे .
( ३ ५ ) एखाद्या गरीब कुटुंबात मयत झाली अथवा एखाद्या गरीब कुटुंबातील लग्न आर्थिक कारणाने अडत असेल तर स्थानिक संघटना अंतर्गत शाखांना आपल्या अधिकारात आपल्या राखीव रक्कमेतून अशी मदत आपल्या गरीब वडार बांधवाना करता आली पाहिजे .
( ३ ६ ) सरकारी कामाचा पाठपुरावा करण्यासाठी सक्षम , जाणकार व त्या कामाला वेळ व न्याय देणाऱ्या कार्यकर्त्याची निवड केली जावी ( मान्य झालेल्या मागण्या , सरकारी अध्यादेश , मंत्र्यांना करावयाचा पाठ - पुरावा इ, )
( ३ ७ ) समाजाच्या हितासाठी काही मुद्द्यावर न्यायालयीन लढाई करावी लागते , मुद्द्यावर आधारित दीर्घकालीन लढाई साठी आपल्याकडे ( संघटनेकडे ) तसे धोरण हवे व आपल्या समाजातील सक्षम अशा वकिलांची मदत आपण ह्या कामी घेतली पाहिजे .
( ३ ८ ) संघटनेच्या नावावर कुणीही आपला वैयक्तिक अजेंडा अथवा स्वताला present करण्याचा प्रयत्न करू नयेत . हि वृत्ती संघटनेसाठी , संघटनेच्या वाढीसाठी हानिकारक / घातक ठरते .
छान बाबी आहेत सर....
ReplyDelete