Wednesday, February 26, 2014

चणे आहेत तर दात नाहीत . . . दात आहेत तर चणे नाहीत


चणे आहेत तर दात नाहीत . . . दात आहेत तर चणे नाहीत

धन आहे पण आरोग्य नाही . . . आरोग्य आहे पण ( दरिद्री पणामुळे ) धन नाही 


डोकं आहे पण चालत नाही . . . युक्ती आहे पण शक्ती नाही

बोलता येतंय पण करता येत नाही . . . करता येतंय पण बोलताच ( भाषण ) येत नाही 


कळतंय पण वळत नाही . . . उशिरा आलेल्या शहाणपणाचा आता काही उपयोग नाही

आपलेच दात अन आपलेच ओठ ,. सांगता कुणाला ? दात टोकरून पोट भरायची हि खोट 


अति झाल आणि हसू आलं . . . . जीवावरच बेतलेलं काना मागून गेलं

" राम " आता कशात राहिलाच नाय . . . उरलंय आता फक्त " दे माय , धरणी ठाय " 


११ : २० pm . . . . . २६ / ०२ / २०१४ . . . . . . बुधवार
Like ·  · Promote · 

" अवकाळी पाऊस "

" अवकाळी पाऊस " 



यौवन बहरात  होते 

भ्रमर हि पिंगा घालीत होते 

नव कोंबाना  , नव्या कळ्यांना 

नवी स्वप्ने खुणावत होते 


झुळूक ती हवेची . . . 

प्रीती खुलवीत होती 

बेधुंद आणि बेभान 

जगणे हे झाले होते 


अशातच आला " अवकाळी " 

होत्याचे नव्हते  करुनी गेला 

 स्वप्नांच्या त्या कळ्या , फुलांचा 

खच चोहीकडे पसरला 


स्वप्ने देठातूनच  उखडली 

खाली धरती , वर नभे हि आसुसलेली 

१० : ११ . . . . . . .  २ ७ / ० २ / २ ० १ ४ . . . . .  . गुरुवार ( महाशिवरात्री ) 

मी आज भुंगा झालो . .




मी आज भुंगा झालो . .  

आठवणीतल्या त्या कळीला स्मरूनी 

भोवती तिच्या , पिंगा घालाया लागलो 

मी आज भुंगा झालो . . .


गंध तिच्या श्वासांचा 

उन्माद आणी मनाला 

स्पर्शातच तिच्या अधराना 

सर्वांगी मी थरथरलो . . . .  मी आज भुंगा झालो 


तिरका कटाक्ष तिच्या नयनांचा 

घायाळ होवुनी गोंडा घोळीतो 

घुसुनि अलगद तिच्या बाहूत  

डोळे मिटूनि मी घेतो . . .  मी आज भुंगा झालो 

९ : ० ० . . . . . .  बुधवार . . . . .   २ ६ / ० २ / २ ० १ ४ 

Tuesday, February 18, 2014

शिवाजी महाराजांचा पोवाडा



दगड , धोंड्याचा , 
दाट  जंगलाचा , 
मर्द मावळ्यांचा , 
किल्ले - दुर्गांचा , 
सह्याद्रीच्या रांगाचा , 
---  ऐसा हा महाराष्ट्र माझा . . . जी जी जी 

इथली माती लावता  कपाळाला . … 
इथली माती लावता कपाळाला . .  
वीरश्री चढे बुझदिल इसमाला , 
रक्त तापे,  सळसळे  त्याच  समयाला , 
त्याच समयाला  , , , , जी जी जी 

काळी , तांबडी , पांढरी  हि माती , इथली खास ,.
 त्यात मिसळली अनेक योद्ध्यांची राख , 
शिवबा इथे पुजला जातो घराघरात …. जीर हे  जीजी . . 

ऐका माझ्या शिवबाची हि मात , 
बाळ मुखी करी हिंदवी स्वराजाची बात , 
सवंगडी मिळवले हे खास ,
 रक्ताचा अभिषेक करून  शिवलिंगास . . .  
म्हणे मुक्त करीन या मुलुखास , 
अन्यायी  अत्याचारी मुघलास ,
 दावूनी गनिमी कावा समयास ,
 मुक्त करू महाराष्ट्र देशास . . . . जीर हो जीजी 

बाळकडू भेटले राजमातेचे , 
जिजाऊ मातोश्रींचे , 
महाराष्ट्राच्या माउलीचे , 
सावूली  त्यांची खास देत असे साथ ,
 शहाजी राजांचा असे वरद हाथ , 
गरुडापरी असे शिवबाकडे ध्यान ,
 युद्ध - कौशल्यात आणि युद्ध - नीतीत ,
 शिवबा झाला अति तरबेज . . 
दांडपट्टा आणि तलवार  फिरावी चपळाईत . . जीर हो जी जी 

मिशुरडे  फुटले हि नव्हते त्या समयाला , 
किल्ले जिंकले आणि जोडले हिंदवी स्वराजाला , 
चढाया  करी आणि मिळावी किल्ल्यांस , 
जोर चढे मग मावळ्यास ,….
 एक एक करुनी जिंकी प्रदेशास. . .  जीर हो जीजी 

डोंगर दऱ्या  ची हि वाकडी वाट , 
सरसरा चढे मावळा  अति अवघड घाट , 
एक एक भारी पडे  चार चौघास , 
गनिमी काव्याने लोळावती  शंभर पन्नासाच , 
लपती - छपति  , अचानक दिसती ,
 वार  वर्मी करती ,
 पळता  भुई थोडी करती गनिमास , 
. .  शत्रू हा घाबरे " शिवबाच्या " नावास   , 
ऐसा हा दरारा वाढला  खास , जीर र जीजी 

हैराण झाली  कुतुबशाही  , 
घाबरूण गेली  आदिल शाही , . .
 पोहोचली खबर शिवबाची दिल्लीच्या तख्ख्तास . . 
औरंग्या म्हणे हा असे कोण मराठी मुलुखास , 
किसकी मझाल  है  जो हमे ललकारे,
 है  किसमे इतनी औकात ?  ? ,
 हम को न जाने ? 
हम है  यहा के शहजादे  , 
किसीकी हो गयी इतनी बिशाद ? 
 औरंग्याने पाचारिले शाहिस्तेखानाला , 
पाठवले पुण्याला . . 
बंदोबस्त करण्या शिवरायांच्या मनसुब्याना …जी जी जी 

शाहिस्तेखानाने येवूनी पुण्याला ,
 लाल महालात  तळ  ठोकिला , 
बायका आणि  कुटुंब कबिला ,
 खानाच्या  होता संगतीला , 
सैन्य हि तसेच असे बेसुमार , 
बेसावध - पाहुनी रात्र ,
 शिवबा तुटून पडला खानाच्या  तळावर . . . 
खानाला हिसका  कळला शिवबाचा , 
अल्ला - अल्ला म्हणे त्या समयाला ,
 लागला पळायला  , 
वार  वर्मिचा  हुकला , पण बोटे छाटली शाहिस्तेखानाची . . . 
धास्ती घेतली शाहिस्तेखानाने ,
 जीवाच्या आकांताने पळून तो गेला . . 
हाय अल्ला कहर ये कैसा केला. . . .  जी जी जी 

जिंकुनी कित्येक किल्ल्यांना आणि दुर्गाना ,
 वाढविले आपल्या आरमाराला ,
 दक्षिणेला आणि पश्चिमेला  ,
 प्रजेवर ममता असे शिवबाची फार , 
न्याय करी , दंड करी चुकणारास , 
मोठा आदर वाटे स्त्रिया ,लेकी , सुनास , 
सुखी होते शेतकरी , बहुजन कष्टकरी त्या समयास … 
रयतेचा राजा शोभे शिवाजी महाराज , , , , ,  जी जी जी 

औरंग्या आणि दिल्ली खवळली ,
 पाहता पाहता शाहिस्त्याची खबर त्याला समजली . .  
बोलावला त्याने सरदारांचा दरबार , 
म्हणे शिवाजी ला मारायचा विडा कोण उचलणार ? . . . 
शिवरायांचे नाव ऐकताच , सन्नाटा पसरला सभाग्रहात , 
धजेना कुणी विडा उचाण्यास . . . जीर हा जी जी जी 

अगडबंब देह आणि उंच एक सरदार , 
नाव त्याचे असे अफजलखान , 
रुबाब त्याचा खास , 
वकूब हि तसाच , 
पिरगाळी मुंडी बगलेत धरुनी , 
पंजात पकडुनी मारी ,
 होती त्याची ख्याती चहु  मुलखात . . 
म्हणे मी जातो शिवाजीच्या बंदोबस्तास …… जी जी जी 

चाल करुनी अफजल्या आला , 
चतुर शिवबा धूर्त मुत्सदी होता , 
हेर आपला पाठवला बोलणी करायला , 
तह करण्याला . . .  
कावेबाज अफजल म्हणे संपवतो शिवाजीस मी आज , 
शिवबा हि असे युक्तिवान खास , 
घातली चिलखत लपवले वाघ नखे 
 … आणि गेला सामोरा  अफ़जलास  . . . . जिजिजि 

या राजे , मिलो हमसे …
ऐसे बोले अफजल्या हसुनी उन्मादात , 
आलिंगन देता  झाला शिवरायास .
जखडून ठेवले आपल्या शिवबास , 
विसरला तहाच्या बोलण्यास , 
शिवबा हि मग सरसावला , 
कोथळाच बाहेर काढला . .  
ये क्या हो गया  अल्ला ?अफजल्या ओरडला 
 खान धाडदिशी उन्मळून पडला . 
शिवबा त्याला पहाडावाणी दिसला . 
हाहाकार तिथे माजला , 
जीवा हा धावून आला ,
 महाराजांनी उडवले कुळकर्ण्याला ,
 जो मिळाला होता अफजल्याला . . . . .  जी जी जी 

शत्रू मेल्यावर त्याची दफ़नाची  योग्य व्यवस्था जो करतो , 
तोच आपला शिवबा असतो , 
प्रजेला जो छळतो त्याला …… 
त्याला शिवबा कर्दनकाळ असतो , 
पोहोचली शिवाजी राजांची कीर्ती दस  दिशाला , 
त्याच समयाला राज्यभिषेकाचा घातला घाट  ,
 नेमले अष्ट मंडळास , 
प्रजेच्या केवळ हितास ,
 सार्वभौम राज्य करण्यास , 
हिंदवी स्वराज्याची राखण्य लाज . . . जिजिजि 

ब्राह्मण वर्गाने राज्याभिषेकास , 
अडथळा घातला खास , 
म्हणून त्या समयास काशिवरून  बोलावले गागाभट्टास , 
राज्यभिषेक झाला मोठ्या दिमाखात .
 छत्रपति शिवाजी महाराज म्हणू लागले आपल्या शिवबास . . . 
 कीर्ती गेली दस मुलखात  . 
धडकी बसे " शिवाजी " उच्चारताच काळजात ,
 प्रजेची काळजी वाहे दिन रात , 
शत्रू पासून वाचवले महाराष्ट्र देशास . . . जी जी जी  

ऐसा हा महाराष्ट्राचा महावीर , 
अभ्यासिती इंग्रज , अमेरिकी आणि पोर्तुगीज , 
धर्म मंदिरे , स्त्रिया , मुले यांचा राखला आदर , 
दिमतीला होते हिंदू आणि मुसलमान सरदार , 
बहुजन कारागीर आणि कलाकार , 
 सर्वाना मिळे आदर आणि सत्कार , जी जी जी 

शिवबा असे महाराष्ट्रात प्रत्येकाच्या रक्तात 
 थेंबाथेंबात , 
नसानसात , 
रोमारोमात , 
वीर बाहूत  , 
शब्दा शब्दात , 
कित्येक शतके होवुनी गेली ,
 शिवबाची स्मुर्ति  अजुनी राहिली , 
किल्ले , गड जो पर्यंत , 
माझा शिवबा हि असेल अंतापर्यंत . . . . . जी जी जी 

शिवबा , शिवाजी , शिवराय , ,
 हा असे असा एक देव  ( महामानव ) . . . 
जो जगला  प्रत्यक्षात , 
आपल्या महाराष्ट्रात , 
अजून हि ऐकू येतात ते निनाद , 
" शिवाजी महाराज कि जय " शिवाजी महाराज कि जय " 
" अमर " कीर्तीला त्यांच्या पाहुनी , 
आमच्या हि माना  झुकतात . . . . . . जी जी जी 

 शिवाजी महाराज कि जय ! ! !

१ ८ / ० २ / २ ० १ ४ . . . . . ६ : ० ०  . . . . . . मंगळवार 


Saturday, February 15, 2014

तू तुझा attitude जपत रहा , . . . मी माझे कर्तव्य बजावत राहतो



तू तुझा attitude जपत रहा  

मी माझे कर्तव्य बजावत राहतो 


तू तुझी मनमानी करत रहा  

मी माझे औदार्य जपत राहतो 


तू मला टाळत  रहा  

मी तुझी काळजी वाहत राहतो 


तू मला गृहीत धरून चलत रहा 

मी आकाशाकडे बघत राहीन 


तू तिकडे मुक्तपणे हसत रहा   

मी तुला स्वप्नात पाहत राहील 


तू तिकडे साज शृंगार करत रहा 

मी तुला " कवितेतून " सजवीत राहीन 

१ ६ / ० २ / २ ० १ ४ . . . .  रविवार . . . .  १२ : ०९ 


Friday, February 14, 2014

वडार समाजाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा नेता . . . रयतेचा राजा




१९ फेब्रुवारी तारखेनुसार छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती 

वडार समाजाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा नेता . . .

रयतेचा राजा 

बा आदब , बा मुलाहिजा , होशियार . . . 

महाराष्ट्र देशाचे वैभव , महाराष्टाची ओळख , महाराष्ट्राची अस्मिता , महाराष्ट्रात ज्यांचे नाव घेतले कि अजून हि रक्त गरम होवून सळसळते , महाराष्ट्रातील दगड - धोंडे , दऱ्या - खोऱ्या ज्यांच्या पद स्पर्शाने पावन होवून स्फूर्तीचे गीत गात असतात . . . अशा आपल्या शिवबांचे , आपल्या शिवरायांचे , जगभरातील शिवप्रेमींचे , छत्रपति श्री शिवाजी महाराज यांची जयंती येत्या १९ फेब्रुवारीला साजरी होत आहे . 

काल velentine डे होता , आम्ही तो " छत्रपति शिवाजी महाराज व त्यांचे राजकारण " या प्रतित्यश लेखक श्री संजय सोनवणी यांचे व्याख्यान ऐकून साजरा केला व आमचे नैसर्गिक शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम जागृत झाले . 

महाराष्ट्रात जे जे इतिहासकार झाले त्यांनी वडार समाजाचे महाराष्ट्रातील किल्ले , महाल वाडे , तलाव , पाण्याचे जिवंत विहिरी या बांधण्यात ज्यांचे योगदान आहे त्यांचा इतिहासाच्या पानावर उल्लेख्ख करायचा टाळून वडार समाजाला व वडार समाजाच्या योगदानाला दुर्लक्षिलेले आहे . 

आज जो वडार समाजात जन्माला येतो , त्याला शिवाजी महाराजांचा आदर करायला व त्यांच्या साठी जीव ओवाळायला शिकवायला लागत नाही कारण हि जन्मताच वडार समाजाला मिळालेले रक्तातले शिवप्रेम आहे . 

आज रोजी वडार समाजाची ओळख इतिहासात शोधावी म्हटले तर आमच्या हाती काहीच लागत नाही . लागणार सुद्धा नाही , कारण आमच्या पूर्वजांच्या हाती कपट - कारस्थानी लेखणी नव्हती तर छनि आणि हातोडी होती . छनि आणि हातोडी थोडाच इतिहास लिहू शकणार होती ? परंतु त्याच छनी आणि हातोडीने , सुतकी आणि पहारीने इतिहास निर्माण केला . महाराष्ट्र देशात जो दगड धोंड्यांचा देश म्हणून ओळखला जातो , जो अति घनदाट जंगलाचा प्रदेश म्हणून परिचित होता , असल्या दुर्गम , अति दुर्गम भागात त्यांनी आपल्या छत्रपति शिवाजी महाराज यांच्यासाठी अवघडातील अवघड अशी किल्ले बांधणी केलेली आहे , समुद्रातील दुर्ग बांधले आहेत , इतिहास साक्षीला आहे , अशी नोंदी सापडतात कि कित्येक शेकडो वडार पाथरवट हे किल्ले बांधणीसाठी कित्येक महिने कित्येक वर्षे सतत झटत होते . 

आज महाराष्ट्रातील वडार समाजाची खरी ओळख जर कुणा मुळे टिकून राहिले असेल तर शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या या भव्य दिव्य किल्ले , दुर्ग व वास्तू मुळे . व त्यामुळेच प्रत्येक वडार समाज बांधवाला श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्यावर निस्सीम प्रेम आहे . 

वडार समाजाला आज पर्यंत इतिहासात किंव्हा वर्तमानात खरा मान कुणी दिला असेल तर तो फक्त शिवाजी महाराज यांनीच . बाकीच्या सर्व लबाड लोकांनी वडार समाजाचा आता पर्यंत फक्त वापर करून घेतला व त्याला देशोधडीला लावून टाकले . 

वडार समाज बंधुनो , वडार समाज बांधवाना छत्रपति शिवाजी महाराज यांच्या काळात जो शिल्पकार म्हणून , कलावंत , कलाकार , कसबी तंत्रज्ञ म्हणून जो सन्मान होता तो त्यांच्या नंतर समाप्त झाला . धाकले महाराज अर्थात संभाजी महाराजा नंतर वडार समाजाला तर कुणीच वाली राहिला नाही . पेशव्यांचे व ब्राह्मणाचे कपट कारस्थाना मुळे खुद्द शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना सुद्धा अनेक कौटुंबिक तसेच राजकीय , सामाजिक प्रश्नांना तोंड द्यावे लागले होते तसेच हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला फितुरीची जी कीड लागली होती ती ब्राह्मण व त्यांच्या सडलेल्या डोक्यातून निघत असलेल्या सडक्या विचारामुळे .

या ब्राह्मण लोकांनी बुद्धी भेद करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्ती मुळे पुढे राज्य कारभार हि स्वताकडे नियंत्रित केला . त्यांचे पाप एवढ्यावरच संपले नाही तर वडार समाज व अशाच काही नैसर्गिक पोटा पाण्यासाठी गावोगावी गुजराण करण्यासाठी फिरणाऱ्या जमातीवर ते " गुन्हेगार " असल्याचा ठपका ठेवला . 

पुढे इंग्रज भारतात आले , या इंग्रजांना भारतात स्थिरावू देण्यात व त्यांच्याशी मसलत करण्यात अन्य दुसरा कुठलाही समाज जबाबदार नव्हता तर तो फक्त कर्मदरिद्री ब्राह्मण समाज होता . या ब्राह्मण समाजाने स्वताच्या स्वार्थी विचारापोटी हा समाज अक्षरश इंग्रजांच्या हवाली केला व महाराष्ट्रातील गाव - खेड्यातील जी चालत आलेली अर्थकारण होते ते पार बिघडवून टाकले , आलुतेदार - बलुतेदार उघड्यावर पडले , त्यांच्या पोटा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला . पेशव्यांच्या व इंग्रजांच्या काळात स्थायी व नवनिर्मिती अशी महाराष्ट्रात झालीच नाही , 

आणि हाताला काम नसल्यामुळे मूळ कलाकार असलेले वडार समाजा सारखे अन्य समाज हि आपली गुजराण करण्यासाठी अत्यंत हातघाई वर आले . त्यातच ब्राह्मण समाज हा चातुर्वर्ण पाळणारा , शुद्र दि भेद मानणारा होता व वडार समाजा सारख्या काही जातींना त्यांनी गाव - खेड्यातील मुख्य वस्तीत वास्तव्यास मज्जाव केलेला होता त्यामुळे जे आज SC / ST म्हणू प्रचलित आहेत व ज्या काही भटक्या विमुक्त जाती म्हणून प्रचलित आहेत त्यांचे जगणे या ब्राह्मण संचालित व्यवस्थेमुळे पार मोडकळीस आले . त्यांना कुणीही वाली राहिला नाही . 

भटका समाज हा खर्या अर्थी पेशवे व इंग्रजांच्या कार्यकाळात शिवाजी महाराजा विना पोरका झाला होता . बायका मुलांची भयंकर आबाळ व स्वताला काहीही काम नसलेला परंतु मुलाचा कलाकार असलेला हा समाज त्यामुळे पुरता खचून गेला . पोटासाठी हा काहीतरी करू पाहत होता , आपल्या बायका मुलांना जागवू पाहत होता तर ह्या कारस्थानी ब्राह्मणांनी व ब्राह्मणाची बटिक झालेल्या काही औलादी यांनी इंग्रज लोकांशी संधान साधून या भटक्या लोकांना इंग्रजां करावी गुन्हेगार जमात म्हणून घोषित करवून घेतले . 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जो समाज सन्मानाने , आब्रुने महाराष्ट्रात नव निर्मितीच्या कार्यात योगदान देवून गेला होता व ज्याच्या बद्दल खुद शिवाजी महाराजांना हि आदर होता तो वडार समाज व अन्य ज्यांना भटके सन्बोदले गेले हा क्षणात ब्राह्मण समाजाच्या कट कारस्थानामुळे " गुन्हेगार " समाजाला गेला . 

आज वडार समाज हा जवळ जवळ दोनशे वर्षे हा " गुन्हेगार जमात " म्हणून ठपका मिरवत आहे . ब्राह्मण संस्कृतीने वडार समाजाला अगोदर शुद्र तर समजले होतेच व त्याला सामाजिक अधिकारापासून वंचित ठेवलेले होतेच , वडार समाज बंधुनो , लक्षात ठेवा - - आपल्याला पिण्याच्या पाण्यावर सुद्धा बंधने होती इतकी भयंकर व्यवस्था त्याकाळी ब्राह्मणांनी संपूर्ण समाजावर लादलेली होती . हे मार्तंड त्यांना वाटेल तो नियम शोधायचे व अन्य समाजावर लादायचे . इतके हे हलकट व विलक्षण कपटी , स्वार्थी , बुद्धी भेद करणारी जात आहे . या ब्राह्मणांना बळी पडले ते देशमुख , पाटील व त्यांनी ज्यांना क्षत्रिय म्हणून गौरव केला अशा काही जाती . 

सन १८७१ ला ब्राह्मण वर्गाने रीतसर इंग्रजांना भडकावून वडार समाज व भटक्या विमुक्त जातीना " गुन्ह्गार " असा अधिकृत ठपका ठेवून त्याला कायद्यात बसवले .

रानावनात राहणारा , आपली पारंपारिक कारागिरी जपणारा , छत्रपति सारख्या राजाच्या आदेशावर शत्रूवर तुटून पडणारा , नैसर्गिक शूर वीर असलेला हा वडार समाज हा अचानक कायमचाच " गुन्हेगार " झाला . 

छत्रपति शिवाजी महाराज जर असते तर त्यांनी वडार समाजाला " गुन्हेगार समाज " असे संबोधले असते का हो ?

आज २०१४ मध्ये हि वडार समाजाला महाराष्ट्रातील आपले अस्तित्व सिद्ध करा असे महाराष्ट्र सरकार सांगत आहे . १९६१ च्या रहिवाशी असल्याची अट घालत आहे . हे रयतेचे राज्य आहे का हो ? 

इथे जनतेला मोफत व सक्तीचे आणि समान शिक्षण अत्यंत गरजेचे असताना हे कागोद्पत्री घोडे कोण नाचवत आहेत हो ?

इथे मराठा असून कुणबी बनून लोक निवडणुका जिंकत आहेत , आपली जात , आपले आई बाप बदली करत आहेत , शिवाजी महाराजांच्या काळात हे चालले असते का हो ?

इथले सरकार व इथली प्रस्थपित झालेली मंडळी हि त्रिवार धिक्कार करण्यासारखी आहेत . शिवाजी महाराजांना सुद्धा अखेच्या काळात या राजकारणी लोकांनी अक्षरश त्रस्त केले होते अशी हि निगरगट लोक आहेत . सत्तेची सर्व सूत्रे यांना स्वताकडे हवी असतात . कागद पत्रांचा खेळ करून कायदे करून कायद्याच्या कचाट्यात पकडून हे लोक जनतेला , प्रजेला वेठीस धरत असतात . 

आज आपल्या देशात फक्त नावालाच लोकशाही आहे . चाललेली आहे ती हुकुमशाही पण नाही परंतु गुंड शाही नक्की आहे . तोच इथे चांगले आयुष्य जगतो आहे . सफेद कपड्यातील गुंड जागोजागी झालेले आहेत . ते डल्ले मारत आहेत , कुणाची कुणाला आजीबात फिकीर नाही , हा देश लुटमारीचा देश आहे का नाही . 

ज्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतात तो फक्त नावातच पुरोगामित्व जपून आहे परंतु या महाराष्ट्राचे कपाळ कलंकित झालेले आहे . या महाराष्ट्राला डाग लागलेले आहेत , हा महाराष्ट्र नको त्या गोष्टीनी डागाळलेला आहे . इथे सर्व जाती धर्मांना आपल्यात सामावून घेतले जात नाही , इथे नरेंद्र दाभोलकर यांच्या सारख्यांची हत्त्या दिवसा ढवळ्या होत आहे . सामाजिक समतोल इथे नाही . गरीब व श्रीमंत या मध्ये भयंकर दरी निर्माण झालेली आहे . सर्व मंडळी कातडी बचाव हे धोरण अवलंबत आहेत . 

- - - - आणि म्हणूनच श्री छत्रपति शिवाजी महाराजांची आज प्रकर्षाने आठवण होत आहे . आज असा रयतेचा राजा होणे नाही . सर्व सामान्य जातींना व व्यक्तींना प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा हा महान धैर्यवान नेता होणे नाही . 

वडार समाजाला खर्या अर्थाने ऐतेहासिक खुणा निर्माण करून ओळख प्राप्त करून दिली त्या छत्रपति शिवाजी महाराज यांचे वडार समाजावर खूप उपकार आहेत आणि म्हणूनच प्रत्येक वडार समाज बांधवाला शिवाजी महाराजा बद्दल नितांत आदर तर आहेच परंतु आम्ही तेवढा आभिमान देखील बाळगत असतो . 

छत्रपति शिवाजी महाराज यांचा गौरवपूर्ण इतिहास व त्यांनी निर्माण केलेल्या वास्तुमुळे जो पर्यंत शिवाजी महाराजांचे नाव या पृथ्वी तलावर राहणार आहे , जो पर्यंत महाराष्ट्रातील किल्ले, दुर्ग , राजवाडे , महाल अस्तित्वात राहणार आहेत तो पर्यंत त्यांना जोडून हे सर्व बांधणीत वडार समाजाचे नाव त्याला लागून येणार आहे . शिवाजी महाराजामुळे वडारसमाज हि प्रतिष्ठा जपून राहणार आहे . 

त्यामुळेच आम्हाला छत्रपति शिवाजी महाराज यांचे ज्या ज्या वेळी नाव निघेल त्या त्या वेळी आमची छाती अभिमानाने फुगेल आम्ही छत्रपतींचा जयजयकार केल्याशिवाय राहणार नाही . 

जय शिवराय ! ! !

जय बजरंग . . . जय वडार .

Thursday, February 13, 2014

मन किती ओढाळ ना ?..... एका फुलावर कधी भुंगा टिकणारच नाही



मन किती ओढाळ ना ?

एका फुलावर कधी भुंगा टिकणारच नाही 


फुलपाखराने हि ठरवले कि गिणती  करावी  

किती पुष्पावरून  वरून हुंदाडलो  आज ?

पुष्पे हि म्हणतील मग . . . 

पुष्कळसे भुंगे , फुलपाखरे येवून गेली आज . 


फुलांनी आपल्या पंखात भुंग्यांना 

गुदमरून प्रेमात मारून टाकावे 

हीच खरी प्रीती 


भुंग्याने हि मकरंद शोधत शोधत  

द्यावी आपुलीही आहुती त्या फुलासाठी 

क्षणात मग  येईल प्रेमाची प्रचीती 

१ ४ / ० २ / २ ० १ ४ . . . . .  शुक्रवार . . . . . .  १२ : ०६ 

Tuesday, February 11, 2014

वडार समाजातील स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! ! !



वडार समाजातील स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी  सुवर्णसंधी ! ! !

महाराष्ट्रातील वडार समाजातील उच्च शिक्षित व UPSC व MPSC या स्पर्धा परीक्षा देवू इच्छिणाऱ्या विध्यार्थ्यासाठी " वडार समाज संघ , महाराष्ट्र राज्य " या संघटने कडून जाहीर आवाहन ! ! !

वडार समाजातील महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील तरुण जर आपल्या हुशारी व मेहनतीवर राज्य व केंद्र शासनाच्या स्पर्धा परीक्षा देवू इच्छित असेल तर …. व त्याबाबत काही पूर्व तयारी म्हणून पुण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी व सर्व शैक्षणिक साधने व वातावरण असलेल्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छित असेल तर " वडार समाज संघ , महाराष्ट्र राज्य " या आपल्या संघटनेला व " वडार समाज चारीटेबल ट्रस्ट " सामाजिक संस्थेला याबाबत आपले दायित्व व सहकार्य देण्यास खूप आनंद होईल .

उच्चतम कौशल्य प्राप्त करण्यासाठी आज आपल्या वडार समाजातील तरुणांना स्पर्धा परीक्षे शिवाय पर्याय नाही . राज्य सरकार व केंद्र सरकार मध्ये महत्वाच्या पदावर आपल्या समाजाच्या व्यक्ती असायला हव्यात व त्या माध्यमातून देशाची सेवा करता येईलच परंतु आपल्या काही वडार समाज बांधवांचे जीवनमान सुधारण्यास नक्कीच आपण हातभार लावू शकतो .

भविष्यकालीन दूरदृष्टी चा भाग म्हणून वडार समाज संघ आपल्या तरुण सुशिक्षित विध्यार्थ्याकडून खूपच अपेक्षा बाळगून आहे . आज अशा प्रयत्नात वडार समाजात कुठलीही संघटना अथवा संस्था कार्यरत नाही व त्यामुळेच वडार समाज संघाचे हे एक क्रांतिकारी पाऊल  समाजाला एक नवीन दिशा दिल्या शिवाय राहणार नाही . वडार समाजाचे बांधव हे कुठल्याही आस्थापनात उच्च पदावर असले पाहिजेत हे आपल्या संघटनेचे अधिकृत धोरण आहे . व संघटनेचे त्या दृष्टीने भविष्यात अजून हि चांगले प्रयत्न होतील .

तूर्त , वडार समाज संघ , अशा स्पर्धात्मक परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी कुणी इच्छुक तरुण असतील तर त्यांना पुण्यामध्ये अगदी माफक दरात  राहण्याची व जेवणाची सोय करू शकते . त्यात हि काही अडचण वाटली तर संघटनेतील जबाबदार कार्यकर्ते व हितचिंतक आपल्याला योग्य ती मदत करतील . पुस्तके अथवा लायब्ररी संदर्भात काही अडचणी येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल .

मोठ्या खेदाने इथे असे नमूद करावे लागत आहे कि हे सर्व आपण तूर्त तरी फक्त विध्यार्थ्यांसाठी  करू शकतो व मुलीसाठी त्यांच्या राहण्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न असल्यामुळे आम्ही त्यात काही करू शकत नाहीत परंतु या विषयावर संघटना भविष्यात नक्कीच ठोस पाऊले टाकील व कुठलाही भेद संघटनेकडून होणार नाही यची काळजी घेतली जाईल . आपल्या संघटनेकडून पुण्यात मुलींचे वसतिग्रह असावे म्हणून प्रयत्न चाललेले आहेत . गोष्टी प्राथमिक अवस्थेत आहेत त्यामुळे त्या विषयी न बोललेलेच बरे परंतु आम्ही महिला व मुलींच्या विषयात गंभीर आहोत .

आपल्या वडार समाजात आदर्श व्यक्ती निर्माण व्हाव्यात व त्यांच्याकडून समाजाला प्रेरणा मिळावी व जो आपला समाज व्यसनासाठी व अंधश्रद्धा या साठी प्रसिद्ध होता ती आपली ओळख मिटावी या साठी वडार समाजातील तरुणांनी मोठ मोठी स्वप्ने उराशी बाळगून , सरकार दरबारी जी कि राजकारणाची सर्व सूत्रे तेथून चालत असतात अशा महत्वाच्या जागावर कार्यरत राहून वडार समाजाची व देशाची सेवा करावी .

वडार समाज संघ , महाराष्ट्र राज्य व वडार समाज चारीटेबल ट्रस्ट  आपल्या क्षमतेत व मर्यादेत शक्य ती मदत विध्यार्थ्यांना करण्याचा प्रयत्न करेल .

विध्यार्थी बांधव याचे कसे स्वागत करतील , कसा प्रतिसाद देतील त्यावर भविष्यकालीन दिशा हि ठरली जाईल .

याबाबत अधिक माहितीसाठी , वडार समाज संघाचे मुख्य संघटक श्री राकेश विटकर साहेब व माननीय अध्यक्ष श्री श्रावण रेपणवाड  यांच्याशी सरळ संपर्क साधला तरी हरकत नाही परंतु वडार समाज संघाच्या तालुका पातळीवरिल पदाधिकारी व जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्फत जर आपण आलात तर खूप उत्तम राहील व संघटनेला त्या विध्यार्थ्या  बद्दल पूर्ण खात्री होईल . पूर्णपणे गंभीर व जबाबदार व्यक्तीनेच याबाबत संपर्क करावा . केवळ माहिती काढण्याच्या उद्देशाने विचारपूस झाली तर आमच्या प्रयतानानाच हरताळ फासल्यासारखे होईल . वडार समाज चारीटेबल ट्रस्ट  चे पदाधिकारी अथवा सभासद आपल्या परिचयाचे असतील तर ते हि आपणास याबाबत सहकार्य करतील .

आम्ही वडार समाज संघ , महाराष्ट्र राज्य हे कार्य कुणाबद्दल कुठलाही पूर्वग्रह , कुठलाही आकस न ठेवता करत आहोत . हे म्हणण्याचा हाच उद्देश आहे कि अन्य कुठल्याही संघटने मार्फत वा संस्था मार्फत विध्यार्थी आले तरी ते वडार समाजाचे आहेत म्हणून त्यांचे स्वागतच असेल .

सकारात्मक प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आहोत . काही सूचना सुचवू इच्छित असाल तर त्यांचे हि स्वागत आहे . या विषयातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आवश्यक आहे .

चला एक नवीन वडार समाजाची निर्मिती करूयात , वडार समाजाला प्रतिष्ठा प्राप्त करून देवुयात .

जय बजरंग ! ! !……. जय वडार ! ! !















माझे चाचरत - चाचरत बोलणे , तुला कळले कसे नाहीं ?

माझे चाचरत - चाचरत बोलणे ,
 
                                        तुला कळले कसे नाहीं ?
 
माझे तुला न भेटणे ,
 
                                         तुला कळले कसे नाहीं  ?

 
माझे उद्वेगाचे वागणे ,
 
                                        तुला कळले कसे नाहीं ?
 
निष्कारण माझे हसणे ,
 
                                        तुला कळले कसे नाहीं ?

 
माझे डोळे झाकून (तुला) पाहणे ,
 
                                  तुला कळले कसे नाहीं ?
 
क्षण अन क्षण तुज्यासाठी  झुरण ,
 
                                  तुला कळले कसे नाहीं ?

 
माझ्या  प्रेमच ओला गंध ,
 
                                  तुला कळले कसे नाहीं ?
 
तुझ्या साठी माझे सतत चालणे ,
 
                              तुला कळले कसे नाहीं ?

 
 
तुला कळले कसे नाहीं ?
 
                                मी तुझ्यावर किती प्रेम करतोय ते ?
 
तुला मी देवी बनवून बसलोय ,
 
                          हे हि तुला कळले कसे नाहीं ?
 
                                                                   
 
11/01/2011.....12;35 pm .......मंगळवार

" वडार समाज " व " भटके - विमुक्त समाज " ह्यांच्या बद्दल त्यांचे स्पष्ट व निर्धारित धोरण




September 17, 2013 


काल नरेंद्र मोदींच्या पोस्टवरून आपल्या समाजातील बऱ्याच वडार समाज बांधवांच्या चांगल्या / वाईट प्रतिक्रिया आल्या . काहींनी माझ्या हेतू बद्दल शंका घेतली परंतु माझ्या दृष्टीने मी वडार समाजात अशा पद्धतीने चर्चा घडवून आणण्यात यशस्वी झालो ह्यात समाधानी आहे . असे वडार समाजात ह्या पूर्वी कधी झाले असेल असे मला वाटत नाही कारण तशी मानसिकता व व्यासपीठ उपलब्धच नव्हते . असो

मी विश्व हिंदू परिषद ला १९८० च्या काळापासून पाहतोय . " अखंड हिंदुस्थान " हि त्यांची कल्पना तेंव्हा बालमनाला खूप सुखावणारी होती . त्यांचे पत्रक , बुक लेट्स , , अखंड भारताचा नकाशावर " भारतमातेचा " फोटो हि आम्ही त्याकाळी प्रथम पहिला होता . पुढे " राम मंदिराचा " विषय आला . RSS चे प्रचारक अक्षरश गावोगावी प्रचार करत फिरायचे . श्रे अशोक सिंघल हे नाव खूप भारी वाटायचे . त्याकाळी अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी हे दोघेच फर्डे वक्ते म्हणून नावाजलेले होते . बाकी बाळासाहेब देवरस व अन्य RSS चे अन्य अध्यक्ष हि खूप विद्वान होते . अशातच श्री राम मंदिराचा मुद्दा खूप संवेदनशील होऊ लागला व अडवाणी ह्यांची ९० च्या आस पास रथ - यात्रा निघाली ह्या दरम्यानच श्री प्रमोद महाजन , नरेंद्र मोदि हे राष्ट्रीय पातळीवर नावे चमकू लागली .

संसदेतील रटाळ कामकाज खर्या अर्थाने मंत्रमुग्ध होवून पाहायला व ऐकायला ह्या देशाला कुणी शिकवले असेल तर ते श्री अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी . त्यांना जोड होती हजरजबाबी व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या प्रमोद महाजन ह्यांची . ( बाकीचे हि होते . . परंतु ध्यान आकर्षित करून घेणारे हे खरे दोघेच ) . अशातच श्री नरेंद्र मोदींचे नाव अधून मधून ऐकायला मिळायचे . ते तेंव्हा संघटनात्मक कार्यात व्यस्त असायचे व कुठलाही फोकस आपल्यावर असावा असा त्यांचा स्वभावात : पिंड नसावा . दिलेले काम व्यवस्थित तडीस न्यावे हेच त्यांचे काम असायचे .

गुजरात ची शासन राजवट "तिथल्या पटेल " ह्यांच्याकडेच असायची ९० च्या अगोदर कॉंग्रेस प्रणीत सरकारच बहुमताने तिथे असायची . ९० नंतर एक पंच वार्षिक कॉंग्रेस व दुसरी पंच वार्षिक भाजपा असा सिलसिला चालू असायचा . केशुभाई पटेल , शंकर सिंग वाघेला ( हे आता कॉंग्रेस वासी आहेत ) ह्यांचा भाजपा चा सत्ता संघर्ष टिपेला गेल्यामुळे दिल्लीच्या राजकारणात महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असलेले संघटनात्मक कार्यात मश्गुल असलेले परंतु निवडणुक न लढलेले नरेंद्र मोदि हे दिल्लीवरून गुजरात वर लादले गेलेले मुख्यमंत्री होते .

नरेंद्र मोडी हे त्यांना दिलेली वा सोपवलेली जबाबदारी किती निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पडतात ह्याचे सरळ साधे उदाहरण म्हणजे त्यांनी फक्त गुजरात वरच नंतर लक्ष केंद्रित केले व कधीही पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात लुडबुड केली नाही . देशातील त्यांचे विरोधक , काही तथाकथित विचारवंत " गोध्रा - कांड " सोयीस्कर रित्या विसरतात व " गुजरात दंगली " चा इश्यू करतात . परंतु नरेंद्र मोदि हे एवढे " खमके " आहेत कि ते आपल्या परंपरागत विरोधकांना तर नेस्तनाबूत करतातच परंतु पक्षांतर्गत विरोधकानाही पुरून उरतात . ह्याचेच ढलधळीत उदाहरण म्हणजे त्यांनी तीन पंचा वार्षिक निवडणुका पक्षाच्या हिमतीवर नाही तर स्वताच्या कार्य करिष्म्यावर निवडून दाखवल्या आहेत . तरीही ते टीकेचे लक्ष्य होत आहेत .

आज श्री नरेंद्र मोदि ह्यांचे सादरीकरण ( presentation ) , त्यांची दूरदृष्टी ( vision ) , त्यांच्याकडे असलेले आकडेवारी ( statistics ) व त्यांचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यांची प्रशासनावर असलेली पकड हे खरोखरीच पुढे जावून अभ्यासाचे विषय ठरतील . प्रशासनावर पकड ह्याचा अर्थ " हम बोले सो कायदा " असा विचित्र अर्थ विरोधक काढतील परंतु त्याचा खरा अर्थ त्यांनी प्रशासना मध्ये जागवलेला विश्वास हा आहे व त्यामुळे त्यांनी सर्वांचीच कार्यक्षमता वाढण्यास मदत झालेली आहे .

आज गुजरातच्या प्रगतीचे ढोल वाजत आहेत , त्यात गैर काय आहे ? मुबलक वीज आहे , प्रशस्त व त्यांचे समर्थक म्हणतात तसे चकाचक रस्ते आहेत , मुबलक पाणी आहे , जगातील सर्व भागातून गुंतवणुकीचा गुजरातकडे ओघ सुरु आहे , मोठ मोठे उद्योग तिथे येत आहेत , तसा विश्वास निर्माण करण्यात मोदि यशस्वी झालेले आहेत . शिक्षणावर व शिक्षकावर विशेष लक्ष देवून तिथे प्रगती साधली आहे , मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष्य दिले जात आहे , पर्यटनावर विशेष लक्ष देवून गुजरातचा स्वाभिमान व नाव जगभर पोहचेल ह्याची काळजी घेतली जात आहे . तंत्रज्ञानावर विशेष भर देवून विकास साधला जात आहे . जागतिक दर्जाचे औद्योगिक व कृषी विषयक प्रदर्शने भरवली जात आहेत , अशा कामाला मोदी सहकार्य व प्रोत्साहन देत आहेत , एक माहितीवर आधारित असे त्यांनी विद्यापीठ च स्थापन केले आहे ( नाव आता आठवत नाही ) . .

असे एक न अनेक कार्ये गुजरात मध्ये चालू आहेत . ह्याच त्यंच्या कार्यामुळे आज देशभर श्री नरेंद्र मोदी हे नाव भारताचे भविष्य म्हणून गाजत आहे . त्यांच्या नावामुळे भाजपा ला एक नवा चेहरा मिळालेला आहे . आज अटल बिहारी बाजपेयींच्या वृधत्वामुळे , प्रमोद mahajan hyanchya अकाली जाण्यामुळे व अडवाणींच्या " जिना - प्रकरणामुळे " भाजपा ची अवस्था कुपोषण ग्रस्त मुलासारखी झालेली होती . श्री मोदींच्या येण्याने समाजातील सर्व थरातून त्यांना पाठिंबा व्यक्त होत आहे .

लोक कॉंग्रेस ला पुरते विटले व वैतागलेले आहेत , लोक भाजप कडे एक पर्याय म्हणून बघत होते परंतु अडवाणींचा म्हतारचळ अजून गेलेला नाही . अटलबिहारी वाजपेयींना सुद्धा ह्यांनी कमी त्रास दिला नव्हता . ह्यांच्या बद्दल खूप आदर होता . त्यांनीच स्वत तो घालवून घेतला आहे . अशा राजकीय धांदलीत कॉंग्रेस स्वैर पणाने वागत आहे / होती . " मी नाही त्यातली " असे म्हणत म्हणत खपाखप भ्रष्टाचाराचे मोठ मोठाले गफले सहजी पचवत होते . वरून " करून सावरून " पतिव्रतेच्या " गोष्टी करत होती . अजून हि कॉंग्रेसला वाटते आहे ती खूप सोज्वळ , नाकासमोर चालणारी व आपले चारित्र्य सांबाळून राहणारी आहे परंतु हि " कैदाशीण " पार स्विस बँकेत आपले तोंड काळ करून आलेली आहे , स्थानिक घोटाळये नि तर हि अगदी बरबटलेली आहे . पण हि कॉंग्रेस व तिचे साथीदार आहेत खूप मस्तवाल , राजकारणात कुठल्या थराला जातील सांगता येत नाही असो .

वडार समाज बंधुनो , मुद्दा इथून पुढे सुरु होत आहे , आपल्याला एक समाज म्हणून कुठल्याही पक्षाचे वावडे नाही व नसावे . व्यक्ती म्हणून कुणाचा द्वेष करण्याचेही कारण नाही . व असा द्वेष कुणीही करू नये . विरोध " विचाराला " असावा परंतु " विचाराच्या आडून " वार करू नये , तसे राजकारण करू नये .

आज ६६ वर्षे झाले आपल्याला स्वतंत्र मिळून . आपल्यातले वडार समाजाचे काही लोक स्वताच्या कष्टाने अनंत हाल अपेष्टा सहन करत शिकले आहेत , सावरले आहेत , अन्य समाजाच्या प्रवाहात सामील होत आहेत तिथे हि आपली ओळख " वडार " अशीच आहे . परंतु मी धाडसाने असे म्हणतो कि हे शिकालेल्यांचे प्रमाण हे २५% च्या वर नसावे . मग आपला ७ ५ % वडार समाज हा अजून हि शहरात झोपडपट्टीत व गावखेड्यात पालात , उघड्यावर राहत आहे . अजून हि आपल्याकडे स्थानिक रहवासी दाखल्यासाठी फिर फिर फिरावे लागत आहे , कितीतरी लोकाकडे अजून रेशन कार्ड नाहीत , मतदान कार्ड नाहीत , आधार कार्ड नाहीत . कितीतरी लोक अजून अंधारात रात्र काढत आहेत , कितीतरी लोक अजून आजार अंगावर काढून अकाली मरत आहेत , कितीतरी जणांना अजूनही जाळण्यासाठी लाकूड फाटाहि उपलब्ब्ध होत नाही , कितीतरी जणांचे लग्न लवकर जमत नाहीत , कितीतरी हाताना अजून काम नाही , हाताला काम नसल्यामुळे कितीतारी लोक गैर - कृत्य करण्यात मश्गुल आहेत . कितीतरी आमच्या बहिणी जवानीतच विधवा झालेल्या आहेत . कितीतरी वृद्ध मरण येत नाही म्हणून कर्माला नावे ठेवून दिवस कंठत आहेत
.आपल्या देशाने एवढी प्रगती केली आहे मग हे आमचे हाल का आहेत ? ? ? . . हि कुठली शासन व्यवस्था आहे ? ? ? ? ? ? ?

हि कुठली शासन व्यवस्था आहे ? ? ? ? ? ? ? . . . चकाचक रोड काय चाटायचे आहेत काय ? विकासाच्या गप्पा मारून , दुरून सुंदर देखावे दाखवून आपले जीवन सुधारणार आहे काय ? ? ? स्वताचे भागले म्हणून जगाचे पोट भरले असे होत काय ? ? ? अरे चकाचक रोड हवा आहे कि आपल्या वडार समाजाचे जीवन मान सुधारायला पाहिजे ते सांगा ? ? ? किती वर्षे , अजून किती वर्षे ह्या हरामखोर राजकारण्यांच्या " गमज्या " वर विश्वास ठेवत बसणार तुम्ही ? ? ? चोराला चोरू द्यायचे व बलात्कार्याला बलत्कार करू द्यायचा , आपण निमुटपणे सहन करत बसायचे , नाही का ? ? ?

ह्या वडार समाजाला स्वताचा असा मान , अभिमान , स्वाभिमान आहे कि नाही ? ? ?

वडार समाज बंधुनो , भाजप हा पक्ष उच्च वर्णीय लोकांचा पक्ष आहे , हे पटत असेल तर मी पुढे चालतो , इथे " नागपूर " चा आदेश चालतो, नव्हे नव्हे तो आदेश बंधनकारकच असतो . तिथे काही अपील नसते . माझ्या माहितीतील २ /३ तालुका अध्यक्ष आपल्या समाजाचे आहेत . परंतु ह्याच्या पुढे ते आपल्याला स्थान देणार आहेत का ? ? ? . . . माझे काही आक्षेप आहेत . ते मी पुढे मांडतो . . .

१ ) भाजपा मध्ये आरक्षणाला विरोध करणारे खूप लोक आहेत . मंडल / कमंडल हा वाद आठवून पहा . . . .OBC ला विरोध कोण करत आहे ? . . . . . तुम्हाला काय वाटते भाजपा सत्तेत आल्यावर हे लोक गप्प बसतील ?

२ ) भाजपा मध्ये विवेकानंद ह्यांना अभिप्रेत हिंदू धर्मा पेक्षा " सनातन " हिंदू धर्माला मानणारे लोक जास्त आहेत , शस्त्रे , हत्यारे , व अतिरेकी विचारसरणी व भडकावू भाषणे करणारे आहेत व ह्यांचे गुप्त इरादे असतात . नरेंद्र दाभोलकरांचे उदाहरण समोर आहे . . . . . तुम्हाला काय वाटते भाजपा सत्तेत आल्यावर हे लोक गप्प बसतील ?

३ ) भाजपा हा पक्ष शहरी विचारसरणी चा पक्ष आहे , त्यांचे " शायनिंग इंडिया " चालते , विविध तन्द्रज्ञान वापरून खरे खोटे आकडे समोर मांडून " आकडेमोडीचा " खेळ करण्यात हे लोक खूप पटाईत आहेत , पटवून देण्यात हे कुणालाच ऐकत नाहीत व आपला हेका सोडत नाहीत . . . . . . . . . बहुजन समाज व मागासलेल्या समाजाचे हे उत्तम प्रकारे प्रतिनिधित्व करतील असे आपल्याला खरोखरच वाटते ?

४ ) आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो व आपण हि सर्व विविध धर्माचे लोक एकमेकांच्या धर्माचा आदर करून एकत्रितपने राहतो . . . . . परंतु " आसाराम " सारख्या ताज्या प्रकरणामध्ये फक्त हिंदू म्हणून हे लोक अशा लोकांना पाठीशी घालणार नाहीत कशावरून ? ? ? ( ताजा संदर्भ : राम जेठमलानी ह्यांनी ह्यांचे वकील पत्र घेतले आहे )

असो . . . अजून हि काही मुद्दे आहेत परंतु मला समाजाशी संदर्भातच बोलायचे आहे .

बंधुनो , वडार समाजात राजकीय व्यक्ती प्रत्येक पक्षात आहेत , परंतु ते त्यांच्या स्व हिमतीवर आहेत , संपूर्ण महाराष्ट्रातील वडार समाजाचा एका पक्षातील अमुक एक नेता म्हणून असे सांगता येणार नाही . तसे अद्याप झालेले नाही हे आपले दुर्दैव आहे .

आपल्याला वडार समाज ह्या नावाने अद्याप राजकारण करताच आलेले नाही . बंधुनो ते करता आले पाहिजे . संपूर्ण समाजाची एक मागणी हवी .

प्रत्येक पक्षात आपल्या समाजाचे लोक आहेत तसे ते राहतील . प्रत्येकाची एक विचारसरणी असते व प्रत्येकाला आदरणीय असा राजकीय नेता हि असतो . परंतु आपण विभागले गेलो आहोत ह्याचा अर्थ असा नाही कि आपण सर्वांनी एका पक्षाला समर्थन द्यावे असे मी सांगत आहे परंतु . . . .

प्रत्येक पक्षाला आपल्या " वडार समाज " व " भटके - विमुक्त समाज " ह्यांच्या बद्दल त्यांचे स्पष्ट व निर्धारित धोरण त्यांचा कडून वदवून घेतले पाहिजे .

२ ० १ ४ चे पडघम वाजू लागले आहेत . राजकीय वातावरण दिवसे दिवस तापणार आहे , मी हि एका एका पक्षाला व त्यांच्या नेत्याला टार्गेट करणार आहे . आमच्या " वडार समाजाचा " आपण काय विचार केला आहे ? ? ? हा प्रश्न खुले आम विचारणार आहे ? त्यांना ह्याची दखल घ्यावीच लागणार आहे कारण आम्ही हि त्यांच्या पक्षाला मानणारी माणसे आहोत .

जो पक्ष खुले आम समोर येवून समाजाला व समाजाच्या प्रश्नांना सकारात्मक राहील मला आशा आहे समाज हि त्यांना साथ दिल्या शिवाय राहणार नाही . परंतु मला हा आवडतो व मला तो आवडत नाही हि नेभळट भूमिका समाजाच्या हिताची नाही .

हे सर्व सामान्य वडार बांधवासाठी आहे , वेगवेगळ्या पक्षाशी संबंधित आहेत त्यांनी त्यांना योग्य वाटते तसे करावे व समाजहित साधावे .

शेवटी नरेंद्र मोदींना माझा वैयक्तिक विरोध असण्याचे काहीच कारण नाही , त्यांच्या भाषणाचा व विषय मांडण्याच्या त्यांच्या पद्धतीचा मी हि चाहता आहे . खरे तर हा खरेच बब्बर शेर आहे . ह्या माणसाला किती विरोधक आहेत परंतु खरेच ह्यांच्याकडे जिगर आहे .

वरील आमच्या काही शंकांचे त्यांनी अथवा त्यांच्या पक्षाने " खुले - आम " खंडन करावे व वडार समाजाला सहकार्य करू असा आम्हाला जाहीर शब्द द्यावा . आमचे बरेचसे वडार समाज बांधव श्री नरेंद्र मोदि ह्यांना पंतप्रधान पदी असावेत म्हणून आसुसलेले आहेत , आशावादी आहेत , त्यांना ही तुम्ही भ्रमनिराश करणार नाहीत अशी भाजपा कडून अपेक्षा .

ताजा कलम : सर्व पक्षीय लोकासाठी , महाराष्ट्रामध्ये वडार समाज हा प्रत्येक जिल्ह्यात असून समाजाची लोक संख्या हि अंदाजे सुमारे ४५ लाख ते ५० लाखाच्या आसपास असावी . काही लोक ७० / ७५ लाख म्हणतात .

वडार समाज व सर्व भटके - विमुक्त समाज हे मिळून महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बिघडवू शकतात त्यामुळे ह्या पुढे जास्तीत जास्त समाजाच्या मागण्या व आमचा जीवनस्तर सुधारण्यासाठी राजकीय पक्षाकडून प्रयत्न व्हावेत .

सुज्ञास व मुत्सद्धी लोकांना जास्त सांगावयाची गरज नाही .

जय बजरंग ! ! ! . . . . . . जय वडार ! ! !