जालना येथे २ फेब्रुवारी ला झालेल्या चिंतन शिबिराला महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री राजेश टोपे उपस्थित होते .
त्यांचा सत्कार करताना वडार समाज संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्री श्रावण रेपणवाड , वडार समाज संघाचे मुख्य संघटक श्री राकेश विटकर , वडार समाज संघाचे सरचिटणीस श्री दिलीप गुंजाळ व अन्य मान्यवर .
श्री मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने आपल्या वडार समाजाला मार्गदर्शन केले त्यावरून असे म्हणता येईल कि येणाऱ्या एक / दोन वर्षात वडार समाज संघाकडून वडार समाजासाठी निश्चितच भरीव असे कार्य केलेले संपूर्ण महाराष्ट्रातल्या वडार समाजाला दिसेल .
मेळावा झाल्यानंतर आम्ही पहिले हे काम केले कि तातडीने " मंत्रालयीन कामासाठी - पाठपुरावा समिती " स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे . त्यानंतर ताबडतोब श्री राजेश टोपे साहेब यांची मंत्रालयात बैठक बोलावून तिथे त्यांना आवश्यक ती कागदपत्रे देवून त्यांच्या मार्फत ती कागद पत्रे सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेली आहेत .
वंजारी समाजाला जसे भगवान गड आहे तसा वडार समाजासाठी " बजरंग गड " अथवा त्या संकल्पनेवर केवळ वडार समाजासाठी वन विभागाची १०० एकर जागा सरकार कडून मिळवायची आहे . श्री राजेश भैय्या टोपे साहेबांनी त्यांच्या भागात अशा कार्यासाठी त्यांची पूर्ण मदत होईल असा शब्द आपल्या वडार समाजाला दिला आहे व त्यांनी ताबडतोब मंत्रालयात तशी बैठक बोलावून ते त्या बाबत गंभीर आहेत हे त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले आहे .
दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्यात वडार समाजाच्या नावाने २० गुंठे जमीन आहे त्यावर वडार समाजाच्या विध्यर्थिनि वसतिग्रह अथवा वडार समाजाच्या अन्य सामाजिक व सार्वजनिक हितासाठी ती जागा विकसित करता येण्यासाठी श्री टोपे साहेब हे श्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्याशी बोलून महानगर पालिकेकडून ५० % निधी उपलब्ध करून देण्यासाठी बोलतील व निम्मा निधी वडार समाजाने उचलावा अशी त्यांनी सूचना केली आहे . या कार्यात काही तांत्रिक अडचणी असू शकतात परंतु वडार समाज बांधवानी दूरदृष्टीचा विचार करून समंजस पणा दाखवून यातून मार्ग काढावा अशी अपेक्षा आहे . हे जर कार्य पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात झाले तर महाराष्ट्रातल्या वडार समाजाला एक हक्काचे स्थान पुण्यात निर्माण होईल . वडार समाज संघ यावर आपले प्रयत्न निच्शितच पुढे चालू ठेवणार आहे .
तिसरी गोष्ट , १९६१ च्या पुराव्याच्या संदर्भात आपल्या वडार समाज संघा मार्फत एक निवेदन सरकारला देण्यात आलेले आहे . सरकार वडार समाजाला भटके आहे हे कबुल करत आहे व वडार समाज शिक्षित नव्हता हे हि सरकारला माहित आहे तरीही सरकार महाराष्ट्रातील वडार समाजाकडून जातीच्या प्रमाण पत्रासाठी १९६१ च्या पुराव्यासाठी अडून बसलेले आहे . त्या संदर्भात सरकारने आपली आडमुठी भूमिका जर वेळीच सोडून दिली नाही अथवा लोकसभे च्या निवडणुकी पूर्वी त्यावर ठोस असे निर्देश दिले नाहीत तर सरकारला जोरदार हिसका देण्याचे वडार समाज संघ ठरवत आहे . आमचा शक्यतो संघर्षाचा विचार नाही , सरकारने हा विषय अतिशय गंभीरतेने घ्यावा एवढीच अपेक्षा आहे , परंतु तसे नाही झाले तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील हा सज्जड इशारा आम्ही यातून देवू इच्छितो .
वडार समाजाने ६६/६७ वर्षे कॉंग्रेस ला साथ दिली , आता लाथ हि द्यायला विसरणार नाही , १९६१ चा आम्हाला पुरावा मागून आम्ही महाराष्ट्राचे सन्माननीय नागरिकच नाहीत असे सरकारला म्हणायचे आहे काय ? आमच्या ताकतीने तुम्ही निवडून येत नाहीत हे आम्हाला कबुल परंतु वडार समाजाने ठरवले तर तुम्हाला जागोजागी पाडू शकतो , हा विचार डोक्यात असू द्यात .
१९६१ च्या प्रश्नांवर संपूर्ण वडार समाजाला , त्यातील प्रत्येक संघटनांना निर्णायक स्थितीला येणे गरजेचे आहे . वडार समाज संघ या बाबत कुणाही संघटने बरोबर सहकार्याची भूमिका ठेवेल हे वडार समाज संघाचे वडार समाजाला दिलेले वचन आहे .
वडार समाज बंधुनो , श्री राजेश टोपे साहेब व अन्य काही सरकारमधील अथवा सरकारच्या बाहेरील प्रभावशाली व्यक्ती या आपल्या वडार समाजासाठी हितचिंतक व्यक्ती म्हणून हव्याच आहेत . जो वडार समाजाच्या हितासाठी वडार समाजाला साथ देईल त्याला वडार समाज हि साथ दिल्या शिवाय राहणार नाही . वडार समाजाला प्रत्येक पक्षात आपले हितचिंतक वाढवणे खूप गरजेचे आहे . ( हितचिंतक वाढवताना काही जन आपले वैयक्तिक हितसंबंध वाढवतात व संपूर्ण वडार समाज त्यांच्या पाठीमागे आहे हे दर्शवतात हे वडार समाजासाठी खूप घातक आहे , )
जालना मेळावा हा एका अर्थाने खूपच स्फूर्तीदायी झाला आहे यात काहीही शंका नाही . वडार समाज संघांतर्गत काही बाबी खटकल्या आहेत , नियोजनात काही बाबी राहून गेल्या आहेत , काही मंडळी या बाबत जास्त गंभीर नाहीत , आर्थिक बाबतीत खूप अवघड परिस्थिती आहे , यावर वडार समाज संघाने अत्यंत तातडीने आपल्यात बदल घडवून घ्यावा . संघटनात्मक बर्याच गोष्टी अजून करायच्या राहून गेल्या आहेत . एखादा मेळावा घेणे अथवा तो यशस्वी होणे यापेक्षा आपले संघटन किती मजबूत आहे यावर जास्त जोर असायला हवा . प्रत्येक गाव पातळीवरील शाखा , तालुका पातळीवरील कार्यकारिणी , जिल्हा पातळीवरील कार्यकारिणी यांचे योग्य ती सांगड अजून झालेली नाही . पदे दिलेली आहेत परंतु कामाचा हि पत्ता नाही व जबाबदारीचीही जाणीव नाही अशी एकंदरीत अत्यंत दयनीय अवस्था आहे . संघटनात्मक काम अत्यंत तातडीने , जिद्दीने व स्पुर्तिने होणे खूप गरजेचे आहे .
वडार समाज संघाचे नेते श्री श्रावण रेपणवाड व मुख्य संघटक श्री राकेश विटकर साहेब हे संघटनात्मक बदलासाठी खूप अनुकूल आहेत व त्याचाच भाग म्हणून त्यांनी अनेक जिल्ह्यांचे दौरे केले आहेत , करत आहेत . कार्यकर्त्यांनी आपल्या महत्वाकांक्षाना आवर घालावा व संघटने मध्ये शिस्तीला खूप महत्व असते याची जाणीव ठेवावी .
संघटन मजबूत असेल तर , सरकारला आपण वडार समाजाच्या भल्यासाठी वाकवू शकतो हि गोष्ट सर्व समाज बांधवानी लक्षात ठेवावी . आपला समाज मागे आहे याचे हे हि एक कारण आहे कि आपले संघटन मजबूत नाही व आपण खर्या अर्थाने संघटीत कधीच झालो नाही .
जुन्या खपल्या न काढता , आपल्याच कुठल्याही संघटनेशी संघर्ष न करता फक्त वडार समाज हितासाठी प्रत्येकाने आपले योगदान देत राहिले पाहिजे .
तेच प्रत्येक वडार समाज बांधवाचे कर्तव्य आहे .
जय बजरंग . . . . . जय वडार
त्यांचा सत्कार करताना वडार समाज संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्री श्रावण रेपणवाड , वडार समाज संघाचे मुख्य संघटक श्री राकेश विटकर , वडार समाज संघाचे सरचिटणीस श्री दिलीप गुंजाळ व अन्य मान्यवर .
श्री मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने आपल्या वडार समाजाला मार्गदर्शन केले त्यावरून असे म्हणता येईल कि येणाऱ्या एक / दोन वर्षात वडार समाज संघाकडून वडार समाजासाठी निश्चितच भरीव असे कार्य केलेले संपूर्ण महाराष्ट्रातल्या वडार समाजाला दिसेल .
मेळावा झाल्यानंतर आम्ही पहिले हे काम केले कि तातडीने " मंत्रालयीन कामासाठी - पाठपुरावा समिती " स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे . त्यानंतर ताबडतोब श्री राजेश टोपे साहेब यांची मंत्रालयात बैठक बोलावून तिथे त्यांना आवश्यक ती कागदपत्रे देवून त्यांच्या मार्फत ती कागद पत्रे सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेली आहेत .
वंजारी समाजाला जसे भगवान गड आहे तसा वडार समाजासाठी " बजरंग गड " अथवा त्या संकल्पनेवर केवळ वडार समाजासाठी वन विभागाची १०० एकर जागा सरकार कडून मिळवायची आहे . श्री राजेश भैय्या टोपे साहेबांनी त्यांच्या भागात अशा कार्यासाठी त्यांची पूर्ण मदत होईल असा शब्द आपल्या वडार समाजाला दिला आहे व त्यांनी ताबडतोब मंत्रालयात तशी बैठक बोलावून ते त्या बाबत गंभीर आहेत हे त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले आहे .
दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्यात वडार समाजाच्या नावाने २० गुंठे जमीन आहे त्यावर वडार समाजाच्या विध्यर्थिनि वसतिग्रह अथवा वडार समाजाच्या अन्य सामाजिक व सार्वजनिक हितासाठी ती जागा विकसित करता येण्यासाठी श्री टोपे साहेब हे श्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्याशी बोलून महानगर पालिकेकडून ५० % निधी उपलब्ध करून देण्यासाठी बोलतील व निम्मा निधी वडार समाजाने उचलावा अशी त्यांनी सूचना केली आहे . या कार्यात काही तांत्रिक अडचणी असू शकतात परंतु वडार समाज बांधवानी दूरदृष्टीचा विचार करून समंजस पणा दाखवून यातून मार्ग काढावा अशी अपेक्षा आहे . हे जर कार्य पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात झाले तर महाराष्ट्रातल्या वडार समाजाला एक हक्काचे स्थान पुण्यात निर्माण होईल . वडार समाज संघ यावर आपले प्रयत्न निच्शितच पुढे चालू ठेवणार आहे .
तिसरी गोष्ट , १९६१ च्या पुराव्याच्या संदर्भात आपल्या वडार समाज संघा मार्फत एक निवेदन सरकारला देण्यात आलेले आहे . सरकार वडार समाजाला भटके आहे हे कबुल करत आहे व वडार समाज शिक्षित नव्हता हे हि सरकारला माहित आहे तरीही सरकार महाराष्ट्रातील वडार समाजाकडून जातीच्या प्रमाण पत्रासाठी १९६१ च्या पुराव्यासाठी अडून बसलेले आहे . त्या संदर्भात सरकारने आपली आडमुठी भूमिका जर वेळीच सोडून दिली नाही अथवा लोकसभे च्या निवडणुकी पूर्वी त्यावर ठोस असे निर्देश दिले नाहीत तर सरकारला जोरदार हिसका देण्याचे वडार समाज संघ ठरवत आहे . आमचा शक्यतो संघर्षाचा विचार नाही , सरकारने हा विषय अतिशय गंभीरतेने घ्यावा एवढीच अपेक्षा आहे , परंतु तसे नाही झाले तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील हा सज्जड इशारा आम्ही यातून देवू इच्छितो .
वडार समाजाने ६६/६७ वर्षे कॉंग्रेस ला साथ दिली , आता लाथ हि द्यायला विसरणार नाही , १९६१ चा आम्हाला पुरावा मागून आम्ही महाराष्ट्राचे सन्माननीय नागरिकच नाहीत असे सरकारला म्हणायचे आहे काय ? आमच्या ताकतीने तुम्ही निवडून येत नाहीत हे आम्हाला कबुल परंतु वडार समाजाने ठरवले तर तुम्हाला जागोजागी पाडू शकतो , हा विचार डोक्यात असू द्यात .
१९६१ च्या प्रश्नांवर संपूर्ण वडार समाजाला , त्यातील प्रत्येक संघटनांना निर्णायक स्थितीला येणे गरजेचे आहे . वडार समाज संघ या बाबत कुणाही संघटने बरोबर सहकार्याची भूमिका ठेवेल हे वडार समाज संघाचे वडार समाजाला दिलेले वचन आहे .
वडार समाज बंधुनो , श्री राजेश टोपे साहेब व अन्य काही सरकारमधील अथवा सरकारच्या बाहेरील प्रभावशाली व्यक्ती या आपल्या वडार समाजासाठी हितचिंतक व्यक्ती म्हणून हव्याच आहेत . जो वडार समाजाच्या हितासाठी वडार समाजाला साथ देईल त्याला वडार समाज हि साथ दिल्या शिवाय राहणार नाही . वडार समाजाला प्रत्येक पक्षात आपले हितचिंतक वाढवणे खूप गरजेचे आहे . ( हितचिंतक वाढवताना काही जन आपले वैयक्तिक हितसंबंध वाढवतात व संपूर्ण वडार समाज त्यांच्या पाठीमागे आहे हे दर्शवतात हे वडार समाजासाठी खूप घातक आहे , )
जालना मेळावा हा एका अर्थाने खूपच स्फूर्तीदायी झाला आहे यात काहीही शंका नाही . वडार समाज संघांतर्गत काही बाबी खटकल्या आहेत , नियोजनात काही बाबी राहून गेल्या आहेत , काही मंडळी या बाबत जास्त गंभीर नाहीत , आर्थिक बाबतीत खूप अवघड परिस्थिती आहे , यावर वडार समाज संघाने अत्यंत तातडीने आपल्यात बदल घडवून घ्यावा . संघटनात्मक बर्याच गोष्टी अजून करायच्या राहून गेल्या आहेत . एखादा मेळावा घेणे अथवा तो यशस्वी होणे यापेक्षा आपले संघटन किती मजबूत आहे यावर जास्त जोर असायला हवा . प्रत्येक गाव पातळीवरील शाखा , तालुका पातळीवरील कार्यकारिणी , जिल्हा पातळीवरील कार्यकारिणी यांचे योग्य ती सांगड अजून झालेली नाही . पदे दिलेली आहेत परंतु कामाचा हि पत्ता नाही व जबाबदारीचीही जाणीव नाही अशी एकंदरीत अत्यंत दयनीय अवस्था आहे . संघटनात्मक काम अत्यंत तातडीने , जिद्दीने व स्पुर्तिने होणे खूप गरजेचे आहे .
वडार समाज संघाचे नेते श्री श्रावण रेपणवाड व मुख्य संघटक श्री राकेश विटकर साहेब हे संघटनात्मक बदलासाठी खूप अनुकूल आहेत व त्याचाच भाग म्हणून त्यांनी अनेक जिल्ह्यांचे दौरे केले आहेत , करत आहेत . कार्यकर्त्यांनी आपल्या महत्वाकांक्षाना आवर घालावा व संघटने मध्ये शिस्तीला खूप महत्व असते याची जाणीव ठेवावी .
संघटन मजबूत असेल तर , सरकारला आपण वडार समाजाच्या भल्यासाठी वाकवू शकतो हि गोष्ट सर्व समाज बांधवानी लक्षात ठेवावी . आपला समाज मागे आहे याचे हे हि एक कारण आहे कि आपले संघटन मजबूत नाही व आपण खर्या अर्थाने संघटीत कधीच झालो नाही .
जुन्या खपल्या न काढता , आपल्याच कुठल्याही संघटनेशी संघर्ष न करता फक्त वडार समाज हितासाठी प्रत्येकाने आपले योगदान देत राहिले पाहिजे .
तेच प्रत्येक वडार समाज बांधवाचे कर्तव्य आहे .
जय बजरंग . . . . . जय वडार
No comments:
Post a Comment