१९ फेब्रुवारी तारखेनुसार छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती
वडार समाजाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा नेता . . .
रयतेचा राजा
बा आदब , बा मुलाहिजा , होशियार . . .
महाराष्ट्र देशाचे वैभव , महाराष्टाची ओळख , महाराष्ट्राची अस्मिता , महाराष्ट्रात ज्यांचे नाव घेतले कि अजून हि रक्त गरम होवून सळसळते , महाराष्ट्रातील दगड - धोंडे , दऱ्या - खोऱ्या ज्यांच्या पद स्पर्शाने पावन होवून स्फूर्तीचे गीत गात असतात . . . अशा आपल्या शिवबांचे , आपल्या शिवरायांचे , जगभरातील शिवप्रेमींचे , छत्रपति श्री शिवाजी महाराज यांची जयंती येत्या १९ फेब्रुवारीला साजरी होत आहे .
काल velentine डे होता , आम्ही तो " छत्रपति शिवाजी महाराज व त्यांचे राजकारण " या प्रतित्यश लेखक श्री संजय सोनवणी यांचे व्याख्यान ऐकून साजरा केला व आमचे नैसर्गिक शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम जागृत झाले .
महाराष्ट्रात जे जे इतिहासकार झाले त्यांनी वडार समाजाचे महाराष्ट्रातील किल्ले , महाल वाडे , तलाव , पाण्याचे जिवंत विहिरी या बांधण्यात ज्यांचे योगदान आहे त्यांचा इतिहासाच्या पानावर उल्लेख्ख करायचा टाळून वडार समाजाला व वडार समाजाच्या योगदानाला दुर्लक्षिलेले आहे .
आज जो वडार समाजात जन्माला येतो , त्याला शिवाजी महाराजांचा आदर करायला व त्यांच्या साठी जीव ओवाळायला शिकवायला लागत नाही कारण हि जन्मताच वडार समाजाला मिळालेले रक्तातले शिवप्रेम आहे .
आज रोजी वडार समाजाची ओळख इतिहासात शोधावी म्हटले तर आमच्या हाती काहीच लागत नाही . लागणार सुद्धा नाही , कारण आमच्या पूर्वजांच्या हाती कपट - कारस्थानी लेखणी नव्हती तर छनि आणि हातोडी होती . छनि आणि हातोडी थोडाच इतिहास लिहू शकणार होती ? परंतु त्याच छनी आणि हातोडीने , सुतकी आणि पहारीने इतिहास निर्माण केला . महाराष्ट्र देशात जो दगड धोंड्यांचा देश म्हणून ओळखला जातो , जो अति घनदाट जंगलाचा प्रदेश म्हणून परिचित होता , असल्या दुर्गम , अति दुर्गम भागात त्यांनी आपल्या छत्रपति शिवाजी महाराज यांच्यासाठी अवघडातील अवघड अशी किल्ले बांधणी केलेली आहे , समुद्रातील दुर्ग बांधले आहेत , इतिहास साक्षीला आहे , अशी नोंदी सापडतात कि कित्येक शेकडो वडार पाथरवट हे किल्ले बांधणीसाठी कित्येक महिने कित्येक वर्षे सतत झटत होते .
आज महाराष्ट्रातील वडार समाजाची खरी ओळख जर कुणा मुळे टिकून राहिले असेल तर शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या या भव्य दिव्य किल्ले , दुर्ग व वास्तू मुळे . व त्यामुळेच प्रत्येक वडार समाज बांधवाला श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्यावर निस्सीम प्रेम आहे .
वडार समाजाला आज पर्यंत इतिहासात किंव्हा वर्तमानात खरा मान कुणी दिला असेल तर तो फक्त शिवाजी महाराज यांनीच . बाकीच्या सर्व लबाड लोकांनी वडार समाजाचा आता पर्यंत फक्त वापर करून घेतला व त्याला देशोधडीला लावून टाकले .
वडार समाज बंधुनो , वडार समाज बांधवाना छत्रपति शिवाजी महाराज यांच्या काळात जो शिल्पकार म्हणून , कलावंत , कलाकार , कसबी तंत्रज्ञ म्हणून जो सन्मान होता तो त्यांच्या नंतर समाप्त झाला . धाकले महाराज अर्थात संभाजी महाराजा नंतर वडार समाजाला तर कुणीच वाली राहिला नाही . पेशव्यांचे व ब्राह्मणाचे कपट कारस्थाना मुळे खुद्द शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना सुद्धा अनेक कौटुंबिक तसेच राजकीय , सामाजिक प्रश्नांना तोंड द्यावे लागले होते तसेच हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला फितुरीची जी कीड लागली होती ती ब्राह्मण व त्यांच्या सडलेल्या डोक्यातून निघत असलेल्या सडक्या विचारामुळे .
या ब्राह्मण लोकांनी बुद्धी भेद करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्ती मुळे पुढे राज्य कारभार हि स्वताकडे नियंत्रित केला . त्यांचे पाप एवढ्यावरच संपले नाही तर वडार समाज व अशाच काही नैसर्गिक पोटा पाण्यासाठी गावोगावी गुजराण करण्यासाठी फिरणाऱ्या जमातीवर ते " गुन्हेगार " असल्याचा ठपका ठेवला .
पुढे इंग्रज भारतात आले , या इंग्रजांना भारतात स्थिरावू देण्यात व त्यांच्याशी मसलत करण्यात अन्य दुसरा कुठलाही समाज जबाबदार नव्हता तर तो फक्त कर्मदरिद्री ब्राह्मण समाज होता . या ब्राह्मण समाजाने स्वताच्या स्वार्थी विचारापोटी हा समाज अक्षरश इंग्रजांच्या हवाली केला व महाराष्ट्रातील गाव - खेड्यातील जी चालत आलेली अर्थकारण होते ते पार बिघडवून टाकले , आलुतेदार - बलुतेदार उघड्यावर पडले , त्यांच्या पोटा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला . पेशव्यांच्या व इंग्रजांच्या काळात स्थायी व नवनिर्मिती अशी महाराष्ट्रात झालीच नाही ,
आणि हाताला काम नसल्यामुळे मूळ कलाकार असलेले वडार समाजा सारखे अन्य समाज हि आपली गुजराण करण्यासाठी अत्यंत हातघाई वर आले . त्यातच ब्राह्मण समाज हा चातुर्वर्ण पाळणारा , शुद्र दि भेद मानणारा होता व वडार समाजा सारख्या काही जातींना त्यांनी गाव - खेड्यातील मुख्य वस्तीत वास्तव्यास मज्जाव केलेला होता त्यामुळे जे आज SC / ST म्हणू प्रचलित आहेत व ज्या काही भटक्या विमुक्त जाती म्हणून प्रचलित आहेत त्यांचे जगणे या ब्राह्मण संचालित व्यवस्थेमुळे पार मोडकळीस आले . त्यांना कुणीही वाली राहिला नाही .
भटका समाज हा खर्या अर्थी पेशवे व इंग्रजांच्या कार्यकाळात शिवाजी महाराजा विना पोरका झाला होता . बायका मुलांची भयंकर आबाळ व स्वताला काहीही काम नसलेला परंतु मुलाचा कलाकार असलेला हा समाज त्यामुळे पुरता खचून गेला . पोटासाठी हा काहीतरी करू पाहत होता , आपल्या बायका मुलांना जागवू पाहत होता तर ह्या कारस्थानी ब्राह्मणांनी व ब्राह्मणाची बटिक झालेल्या काही औलादी यांनी इंग्रज लोकांशी संधान साधून या भटक्या लोकांना इंग्रजां करावी गुन्हेगार जमात म्हणून घोषित करवून घेतले .
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जो समाज सन्मानाने , आब्रुने महाराष्ट्रात नव निर्मितीच्या कार्यात योगदान देवून गेला होता व ज्याच्या बद्दल खुद शिवाजी महाराजांना हि आदर होता तो वडार समाज व अन्य ज्यांना भटके सन्बोदले गेले हा क्षणात ब्राह्मण समाजाच्या कट कारस्थानामुळे " गुन्हेगार " समाजाला गेला .
आज वडार समाज हा जवळ जवळ दोनशे वर्षे हा " गुन्हेगार जमात " म्हणून ठपका मिरवत आहे . ब्राह्मण संस्कृतीने वडार समाजाला अगोदर शुद्र तर समजले होतेच व त्याला सामाजिक अधिकारापासून वंचित ठेवलेले होतेच , वडार समाज बंधुनो , लक्षात ठेवा - - आपल्याला पिण्याच्या पाण्यावर सुद्धा बंधने होती इतकी भयंकर व्यवस्था त्याकाळी ब्राह्मणांनी संपूर्ण समाजावर लादलेली होती . हे मार्तंड त्यांना वाटेल तो नियम शोधायचे व अन्य समाजावर लादायचे . इतके हे हलकट व विलक्षण कपटी , स्वार्थी , बुद्धी भेद करणारी जात आहे . या ब्राह्मणांना बळी पडले ते देशमुख , पाटील व त्यांनी ज्यांना क्षत्रिय म्हणून गौरव केला अशा काही जाती .
सन १८७१ ला ब्राह्मण वर्गाने रीतसर इंग्रजांना भडकावून वडार समाज व भटक्या विमुक्त जातीना " गुन्ह्गार " असा अधिकृत ठपका ठेवून त्याला कायद्यात बसवले .
रानावनात राहणारा , आपली पारंपारिक कारागिरी जपणारा , छत्रपति सारख्या राजाच्या आदेशावर शत्रूवर तुटून पडणारा , नैसर्गिक शूर वीर असलेला हा वडार समाज हा अचानक कायमचाच " गुन्हेगार " झाला .
छत्रपति शिवाजी महाराज जर असते तर त्यांनी वडार समाजाला " गुन्हेगार समाज " असे संबोधले असते का हो ?
आज २०१४ मध्ये हि वडार समाजाला महाराष्ट्रातील आपले अस्तित्व सिद्ध करा असे महाराष्ट्र सरकार सांगत आहे . १९६१ च्या रहिवाशी असल्याची अट घालत आहे . हे रयतेचे राज्य आहे का हो ?
इथे जनतेला मोफत व सक्तीचे आणि समान शिक्षण अत्यंत गरजेचे असताना हे कागोद्पत्री घोडे कोण नाचवत आहेत हो ?
इथे मराठा असून कुणबी बनून लोक निवडणुका जिंकत आहेत , आपली जात , आपले आई बाप बदली करत आहेत , शिवाजी महाराजांच्या काळात हे चालले असते का हो ?
इथले सरकार व इथली प्रस्थपित झालेली मंडळी हि त्रिवार धिक्कार करण्यासारखी आहेत . शिवाजी महाराजांना सुद्धा अखेच्या काळात या राजकारणी लोकांनी अक्षरश त्रस्त केले होते अशी हि निगरगट लोक आहेत . सत्तेची सर्व सूत्रे यांना स्वताकडे हवी असतात . कागद पत्रांचा खेळ करून कायदे करून कायद्याच्या कचाट्यात पकडून हे लोक जनतेला , प्रजेला वेठीस धरत असतात .
आज आपल्या देशात फक्त नावालाच लोकशाही आहे . चाललेली आहे ती हुकुमशाही पण नाही परंतु गुंड शाही नक्की आहे . तोच इथे चांगले आयुष्य जगतो आहे . सफेद कपड्यातील गुंड जागोजागी झालेले आहेत . ते डल्ले मारत आहेत , कुणाची कुणाला आजीबात फिकीर नाही , हा देश लुटमारीचा देश आहे का नाही .
ज्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतात तो फक्त नावातच पुरोगामित्व जपून आहे परंतु या महाराष्ट्राचे कपाळ कलंकित झालेले आहे . या महाराष्ट्राला डाग लागलेले आहेत , हा महाराष्ट्र नको त्या गोष्टीनी डागाळलेला आहे . इथे सर्व जाती धर्मांना आपल्यात सामावून घेतले जात नाही , इथे नरेंद्र दाभोलकर यांच्या सारख्यांची हत्त्या दिवसा ढवळ्या होत आहे . सामाजिक समतोल इथे नाही . गरीब व श्रीमंत या मध्ये भयंकर दरी निर्माण झालेली आहे . सर्व मंडळी कातडी बचाव हे धोरण अवलंबत आहेत .
- - - - आणि म्हणूनच श्री छत्रपति शिवाजी महाराजांची आज प्रकर्षाने आठवण होत आहे . आज असा रयतेचा राजा होणे नाही . सर्व सामान्य जातींना व व्यक्तींना प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा हा महान धैर्यवान नेता होणे नाही .
वडार समाजाला खर्या अर्थाने ऐतेहासिक खुणा निर्माण करून ओळख प्राप्त करून दिली त्या छत्रपति शिवाजी महाराज यांचे वडार समाजावर खूप उपकार आहेत आणि म्हणूनच प्रत्येक वडार समाज बांधवाला शिवाजी महाराजा बद्दल नितांत आदर तर आहेच परंतु आम्ही तेवढा आभिमान देखील बाळगत असतो .
छत्रपति शिवाजी महाराज यांचा गौरवपूर्ण इतिहास व त्यांनी निर्माण केलेल्या वास्तुमुळे जो पर्यंत शिवाजी महाराजांचे नाव या पृथ्वी तलावर राहणार आहे , जो पर्यंत महाराष्ट्रातील किल्ले, दुर्ग , राजवाडे , महाल अस्तित्वात राहणार आहेत तो पर्यंत त्यांना जोडून हे सर्व बांधणीत वडार समाजाचे नाव त्याला लागून येणार आहे . शिवाजी महाराजामुळे वडारसमाज हि प्रतिष्ठा जपून राहणार आहे .
त्यामुळेच आम्हाला छत्रपति शिवाजी महाराज यांचे ज्या ज्या वेळी नाव निघेल त्या त्या वेळी आमची छाती अभिमानाने फुगेल आम्ही छत्रपतींचा जयजयकार केल्याशिवाय राहणार नाही .
जय शिवराय ! ! !
जय बजरंग . . . जय वडार .
No comments:
Post a Comment